शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

Solapur: कमी पावसाचा फटका भूजल पातळीला बसणार,भूजलाच्या नोंदी घेण्यास सुरुवात

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 21, 2023 14:12 IST

Solapur: पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. याचा परिणाम हा भूजल पातळीवर होत आहे. सध्या भूजल पातळीची तपासणी सुरु असून ऑक्टोबर महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.

: ऑक्टोबर महिन्यात येणार अहवाल

- शीतलकुमार कांबळेसोलापूर - पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. याचा परिणाम हा भूजल पातळीवर होत आहे. सध्या भूजल पातळीची तपासणी सुरु असून ऑक्टोबर महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.

भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून मे २०२३ मध्ये शेवटचे भूजल पातळी मोजण्यात आली होती. पाच वर्षांची तुलना केली असता जिल्ह्यातील पाण्याची पातळी ही ०.५८ मीटरने वाढली होती. आता पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा भूजल पातळीचे निरीक्षण होणार आहे. याबाबतची माहिती ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.

मागील काही वर्षामध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मृदा जलसंधारणाचे काम चांगले झाले होते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी बऱ्याच ठिकाणी अडले. मागील पाच वर्षांची तुलना करता जिल्ह्याच्या भूजल पाणी पातळीत अडीच फुटाने वाढ झाली होती. यंदाच्या वर्षी भूजल पातळी कमी झाल्यास शेती व पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भूजल पातळी ही पावसावर अवलंबून असते. यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडला आहे. जमिनीत म्हणावे तितके पाणी मुरले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी भूजल पातळी खाली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची निश्चित माहिती भूजल सर्व्हेक्षण केल्यानंतरच मिळेल.- मुश्ताक शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा

टॅग्स :water shortageपाणीकपातSolapurसोलापूर