शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Solapur: कमी पावसाचा फटका भूजल पातळीला बसणार,भूजलाच्या नोंदी घेण्यास सुरुवात

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 21, 2023 14:12 IST

Solapur: पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. याचा परिणाम हा भूजल पातळीवर होत आहे. सध्या भूजल पातळीची तपासणी सुरु असून ऑक्टोबर महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.

: ऑक्टोबर महिन्यात येणार अहवाल

- शीतलकुमार कांबळेसोलापूर - पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. याचा परिणाम हा भूजल पातळीवर होत आहे. सध्या भूजल पातळीची तपासणी सुरु असून ऑक्टोबर महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.

भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून मे २०२३ मध्ये शेवटचे भूजल पातळी मोजण्यात आली होती. पाच वर्षांची तुलना केली असता जिल्ह्यातील पाण्याची पातळी ही ०.५८ मीटरने वाढली होती. आता पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा भूजल पातळीचे निरीक्षण होणार आहे. याबाबतची माहिती ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.

मागील काही वर्षामध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मृदा जलसंधारणाचे काम चांगले झाले होते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी बऱ्याच ठिकाणी अडले. मागील पाच वर्षांची तुलना करता जिल्ह्याच्या भूजल पाणी पातळीत अडीच फुटाने वाढ झाली होती. यंदाच्या वर्षी भूजल पातळी कमी झाल्यास शेती व पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भूजल पातळी ही पावसावर अवलंबून असते. यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडला आहे. जमिनीत म्हणावे तितके पाणी मुरले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी भूजल पातळी खाली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची निश्चित माहिती भूजल सर्व्हेक्षण केल्यानंतरच मिळेल.- मुश्ताक शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा

टॅग्स :water shortageपाणीकपातSolapurसोलापूर