शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चिंता कायम; सोलापूर जिल्ह्याचा मृत्यूदर घसरला; मात्र राज्यात आजही अव्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:58 IST

लॉकडाऊननंतरची स्थिती; मुंबई, पुणे, ठाणे शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर तीन ते चार टक्क्यांनी जास्त

ठळक मुद्देमुंबई शहरातील कोरोनाचा मृत्यूदर ५.६१ टक्के, पुण्याचा मृत्यूदर अडीच टक्केठाणे शहराचा मृत्यूदर ३.३५ टक्के तर औरंगाबाद शहरातील मृत्यूदर ४.६३ टक्केसोलापूर शहरातील मृत्यूदर २२ जुलै रोजी ८.२१ टक्के, सोलापुरातील वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय

राकेश कदम

सोलापूर : जूनअखेर दहा टक्क्यांवर गेलेला जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर आता सहा टक्क्यांवर आला आहे. मात्र हा मृत्यूदरही आजच्या घडीला राज्यात सर्वाधिक असल्याचे दिसते. चिंतेची बाब म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर तीन ते चार टक्क्यांनी जास्त आहे. 

मुंबई, पुणे शहरात मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळले. सोलापूर शहरात १२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. एप्रिल आणि मे महिन्यात फारशी रुग्णवाढ दिसत नव्हती. २२ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचे ४८८ रुग्ण होते तर ३४ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूदर ६९८ टक्के होता. जून महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला. 

१५ दिवसांतच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली. ७ जून रोजी जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ८.६७ टक्के होता. पुन्हा १५ दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याची स्थिती होती. जिल्ह्याचा मृत्यूदर ८.५१ टक्क्यांवर होता. २७ जून रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर दहा टक्क्यांवर होता. या दिवसांत मध्यप्रदेशातील झाशी पहिल्या क्रमांकावर तर पंचकुला दुसºया क्रमाकांवर होते. हा शहरांचा मृत्यूदर अनुक्रमे १०.७ टक्के आणि १०.४ टक्के तर सोलापूरचा मृत्यूदर १० टक्के असल्याचे वृत्त देशभरातील वेबसाईट्सवर प्रकाशित झाले होते. सात जुलै रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर ८.९८ टक्के झाला. १५ दिवसांनंतर २२ जुलै रोजी मृत्यूदर ६.०२ टक्क्यांवर पोहोचल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट  होते. जळगाव जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे. 

मुंबईपेक्षा सोलापूर शहराचा मृत्यूदर अधिकमुंबई शहरातील कोरोनाचा मृत्यूदर ५.६१ टक्के, पुण्याचा मृत्यूदर अडीच टक्के आहे. ठाणे शहराचा मृत्यूदर ३.३५ टक्के तर औरंगाबाद शहरातील मृत्यूदर ४.६३ टक्के आहे. एप्रिल आणि मे महिन्यात या शहरातील स्थिती चिंताजनक होती. परंतु, या शहरांमधील मृत्यूदर घटत असल्याचे दिसते. सोलापूर शहरातील मृत्यूदर २२ जुलै रोजी ८.२१ टक्के आहे. मुंबई हे दाट लोकवस्तीचे शहर मानले जाते. मुंबईपेक्षा सोलापुरातील वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय आहे.

प्रशासन काय म्हणते महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आरोग्य मंत्र्यांना दिलेल्या अहवालात काही कारणे नमूद केली आहेत. जिल्ह्यातील मृतांमध्ये ६० वर्षांवरील ६५ टक्के रुग्ण आहेत. हे रुग्ण अखेरच्या दिवसांत उपचारासाठी दाखल झाले. या रुग्णांना इतरही गंभीर आजार होते. दाट लोकवस्तीच्या भागातील नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांचा लवकर मृत्यू होतोय. यासाठी पालिकेने ज्येष्ठ नागरिकांची अँटिजेन टेस्ट मोहीम हाती घेतली असून, ज्येष्ठ नागरिकांवर दर आठ दिवसाला लक्ष ठेवले जाणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल