शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे दोन खासदार, सहा आमदार निवडून येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:38 IST

भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा विश्वास, महामेळाव्याची जय्यत तयारी

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघातून अनेक नावे चर्चेतबाजार समितीमधील अनेक कायदे शेतकºयांच्या हितासाठीजिल्ह्यातील भाजपा प्रासंगिक करारात अडकला

राकेश कदम 

सोलापूर : आगामी निवडणुकीत जिल्ह्यातून भाजपाचे दोन खासदार आणि सहा आमदार निवडून येतील, अशी व्यूहरचना करीत आहोत. भाजपा ही चालू गाडी आहे. मित्रपक्ष बनलेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी लवकरात लवकर या गाडीत यावे. जे येतील त्यांचे सीट पक्के आहे; अन्यथा पर्यायी माणसेही तयार आहेत, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी व्यक्त केला. 

मुंबईच्या बीकेसी मैदानावर ६ एप्रिल रोजी भाजपाचा राज्यस्तरीय महामेळावा होतोय. जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्याला जाणार आहेत. त्याच्या जिल्हास्तरीय तयारीत गुंतलेल्या शहाजी पवार यांनी बुधवारी सायंकाळी ‘लोकमत’शी संवाद साधला. भाजपा हा केडर बेस पक्ष असल्याचे सांगून पवार म्हणाले, २९ मार्च ते ४ एप्रिल या काळात आम्ही जिल्ह्यात ह्यचलो बुथ की ओरह्ण हे अभियान राबविले. शासनाच्या योजना घराघरांत पोहोचविण्याबरोबर बुथ स्तरावरील यंत्रणा मजबूत केली जात आहे. 

जिल्ह्यातील २९०० बुथपैकी २६०० बुथवर पोहोचलो आहोत. अनगर, मोहिते-पाटलांच्या भागात माणसं मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र लोकांत मिसळून आम्ही यंत्रणा उभी करतोय. या भेटीत लोक चांगल्या गोष्टी सांगतात, तशा उणिवाही सांगतात. या उणिवा अनेक वर्षांपासून आहेत. त्याला भाजपा जबाबदार नाही. पण त्या  प्रदेश पातळीवर पोहोचविल्या जात आहेत. 

शहर मध्यसह सहा मतदारसंघांवर लक्ष- जिल्ह्यातील भाजपा प्रासंगिक करारात अडकला आहे. या मुद्यावर पवार म्हणाले, १९८० साली भाजपाचे दोनच खासदार होते. लोकांच्या विचारात बदल झाला. आमचे मित्रपक्ष बनलेली जिल्ह्यातील नेतेमंडळी भाजपामध्ये येणार होती, ती का आली नाहीत, हे मला सांगणे अवघड आहे. खरं तर या मंडळींनी लवकरात लवकर भाजपामध्ये यावे. ते येतील की नाही हे सुध्दा निवडणुकीपूर्वी तीन-चार महिने आधीच कळेल. परंतु, प्रदेश पातळीवरुन एकाच मतदारसंघात तीन पर्याय निश्चित करण्यात आले आहेत. शहर मध्य, अक्कलकोट, मोहोळ आणि इतर तीन मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.

पालकमंत्री का बोलले माहीत नाही- बाजार समितीमधील अनेक कायदे शेतकºयांच्या हितासाठी नसून व्यापाºयांच्या हिताचे आहेत. ते बदलावेत यासाठी मी सुभाष बापूंकडे आग्रह करतोय. शेतकºयांच्या हितासाठी आम्ही बाजार समितीची निवडणूक लढविणार आहोत. शासनाने सामाईक खात्यावर एकाच शेतकºयाला मतदानाचा अधिकार दिला होता. यामुळे ४५ हजार शेतकरी वंचित राहणार होते. परंतु, मी माझ्या कार्यकर्त्यांना आमच्याच शासनविरोधात उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. माझ्या पुढाकारामुळे सर्वच शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. पालकमंत्री स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे बोलले, ते का बोलले मला माहीत नाही. परंतु, आम्ही सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि खासदार शरद बनसोडे यांचा सल्ला घेऊनच निवडणूक लढविणार आहोत. वेळ आली तर बाजार समितीबाबत खूप बोलणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेला पक्ष देईल त्या उमेदवारासोबत आम्ही- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अनेक नावे चर्चेत आहेत. अमर साबळे यांचे नाव आम्ही वर्तमानपत्रातूनही वाचले आहे. इतर लोकही संपर्कात आहेत. विद्यमान खासदारही काम करीत आहेत. परंतु, पक्षाकडून जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचे काम आम्ही करु, असेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपाLoksabhaलोकसभाPoliticsराजकारण