शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद नको; गनिमी काव्याने आंदोलन करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 11:12 IST

सरकारशी लढणारच;  मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

सोलापूर : कोरोनामुळे सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बंद पुकारल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. गोरगरीब शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे लोकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी फिजीकल डिस्टन्सिंग पाळून साखळी मोर्चा काढणे, गनिमी काव्याने आंदोलने करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी दिली. आमची लढाई सरकारशी आहे. न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी सरकारवर दबाव वाढवू, असेही त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी  शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे, दास शेळके, सुनील रसाळे, श्रीकांत घाडगे, तुकाराम मस्के, मिलिंद भोसले, विजय पोखरकर, अमोल भोसले, वाय.पी. पवार, संजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलीप कोल्हे म्हणाले, मराठा आरक्षणात शासन कुठे कमी पडले याची समिक्षा होणे आवश्यक आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीने आरक्षणासाठी आत्महत्या करणे, जीव धोक्यात घालू नये. समाजातील आणखी बळी आपल्याला नको आहेत. आपल्याला ही लढाई नेटाने पुढे न्यायची आहे. समाजातील कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये याची काळजी सर्वांना घ्यायची आहे. परंतु, समाजाच्या प्रश्नाची तीव्रता शासनाला लक्षात यावी यासाठी गनिमी काव्याने आंदोलन करावे. समाजाचा पुन्हा एकदा मोर्चा काढायचा. फिजीकल डिस्टिन्सिंग पाळून हा मोर्चा काढण्यात यावा. मागील मोर्चावेळी सर्व समाजाने मराठा समाजाला साथ दिली होती. कोरोनाच्या अडचणीच्या काळात बंद केल्यास इतर समाजाचेही नुकसान होणार आहे. मराठा समाज हा आपल्या न्याय हक्कासाठी लढायला मागे सरकणार नाही, मात्र इतरांचे नुकसान होऊ देणार नाही, असेही कोल्हे म्हणाले. उद्या पुन्हा बैठकमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे. समाज बांधवांनी या बैठकीला हजर राहावे, असे आवाहन प्रताप चव्हाण आणि तुकाराम मस्के यांनी केले. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न...मराठा समाजातील तरुणांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाकडून होत असल्याचा आरोप राम जाधव आणि किरण पवार यांनी केला. आम्ही समाजासाठी आंदोलन करतोय. पण पोलिसांकडून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे. याविरुध्द आवाज उठविण्यात येणार असल्याचे जाधव आणि पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा