शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सोलापूर जिल्ह्यात पाणलोटच्या कामास कृषी खात्याचा निरुत्साह, दोन वर्षात दोन कोटी खर्च तर साडेचार कोटी शिल्लक: खर्च होत नसल्याने दुसरीकडे वर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:19 IST

पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी कृषी खात्याचा निरुत्साह असून उत्तर तालुक्यातील सात गावांसाठीची तब्बल चार कोटी ५१ लाख ३ हजार रुपये शिल्लक आहेत. जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून निधीची मागणी करण्याची सूचना आल्यानंतर उत्तरच्या कार्यालयाकडून सतत नकारघंटा असल्याने चार कोट रुपये इतर तालुक्याला दिले असल्याचे सांगण्यात आले. 

ठळक मुद्देपावसाचा थेंब न् थेंब पडलेल्या जागेवरच जमिनीत जिरला पाहिजे, ही शासनाची संकल्पना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून कामासाठी पैसे मागणी करण्याबाबत विचारणा केल्यानंतर उत्तर तालुका कृषी कार्यालयाकडून नकारघंटाउत्तरचा चार कोटींचा निधी अक्कलकोटला वर्ग करण्यात आला. 

अरुण बारसकरआॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी कृषी खात्याचा निरुत्साह असून उत्तर तालुक्यातील सात गावांसाठीची तब्बल चार कोटी ५१ लाख ३ हजार रुपये शिल्लक आहेत. जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून निधीची मागणी करण्याची सूचना आल्यानंतर उत्तरच्या कार्यालयाकडून सतत नकारघंटा असल्याने चार कोट रुपये इतर तालुक्याला दिले असल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या चांगल्या व शेतकरी उपयोगी कार्यक्रमाला कशी आडकाठी आणावी, याचे उत्तम उदाहरण उत्तर तालुका कृषी कार्यालयाच्या कारभाराकडे पाहिल्यानंतर दिसून येते. पावसाचा थेंब न् थेंब पडलेल्या जागेवरच जमिनीत जिरला पाहिजे, ही शासनाची संकल्पना आहे. यातूनच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून पाणलोट विकासासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी, बीबीदारफळ, नान्नज, रानमसले, गावडीदारफळ , पडसाळी व वांगी या गावांची निवड पाणलोटसाठी झाली आहे. या गावांसाठी कोणती कामे कोणत्या वर्षी करावयाची, याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. गावाच्या भौगोलिक क्षेत्रानुसार निधीही मंजूर केला आहे. मात्र त्याप्रमाणे कामे करण्यास कृषी खात्याची यंत्रणा तयार नाही. त्यामुळे कंपार्ट बंडिंग, सिमेंट नाला बंडिंग, चर खोदाई आदीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी चार कोटी ५१ लाख ३ हजार रुपये शिल्लक आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून कामासाठी पैसे मागणी करण्याबाबत विचारणा केल्यानंतर उत्तर तालुका कृषी कार्यालयाकडून नकारघंटा येते. त्यामुळे उत्तरचा चार कोटींचा निधी अक्कलकोटला वर्ग करण्यात आला. ----------------------------रानमसलेचा सर्वाधिक पैसा शिल्लक - अकोलेकाटीचे ३४ लाख ९२३ रुपये, बीबीदारफळचे एक कोटी १६ लाख ३१ हजार ५४५ रुपये, नान्नजचे एक कोटी ११ लाख ५३ हजार ११५ रुपये, रानमसल्याचे एक कोटी १६ लाख ५६ हजार ६८७ रुपये, गावडीदारफळचे ३० लाख ६५ हजार १८६ रुपये, पडसाळीचे ३१ लाख १६ हजार १५२ रुपये, वांगीचे ९ लाख ८६ हजार ६७९ रुपये असे चार कोटी ५१ लाख रुपये शिल्लक आहेत.  अवघा दोन कोटी खर्च- पाणलोटसाठी निवडलेल्या गावासाठी प्रति हेक्टरी १२ हजार रुपये केंद्रशासन देते. यापैकी प्रति हेक्टरी ६ हजार ७२० रुपये पाणलोटच्या कामासाठी तर अन्य उपक्रमासाठी उर्वरित रक्कम खर्च करावयाची आहे. त्याप्रमाणे अकोलेकाटीसाठी ५६ लाख ३९ हजार, बीबीदारफळसाठी एक कोटी ८० लाख ७७ हजार, नान्नजसाठी एक कोटी २६ लाख २० हजार, रानमसलेसाठी एक कोटी ४६ लाख ३५ हजार, गावडीदारफळसाठी ७१ लाख २७ हजार, पडसाळीसाठी ५१ लाख एक हजार व वांगीसाठी १९ लाख ६३ हजार असे ६ कोटी ५१ लाख ६२ हजार रुपये मंजूर असून पैकी दोन वर्षात दोन कोटी ५९ हजार रुपयेच खर्च झाले आहेत. ----------------उत्तर तालुक्यात कामे झाली नाहीत; मात्र अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निधी खर्च झाला नाही तर शेतकºयांचे नुकसान होणार आहे. जबाबदारी निश्चित करुन कारवाई करु. - बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Solapurसोलापूर