शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेच्या थकबाकीचा आलेख वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:06 IST

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शेती व बिगरशेतीसाठी वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच आहे.

ठळक मुद्देबिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली शेती कर्जाच्या थकबाकीत भरच पडत आहे

सोलापूर: जिल्हा बँकेची शेतीसाठीच्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच असून, जिल्हाभरातील १५ मार्चपर्यंत अवघी २० टक्के वसुली झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याची अवघी ६ टक्के वसुली झाल्याचे आकडेवारी सांगते.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शेती व बिगरशेतीसाठी वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच आहे. साखर कारखान्यांकडील थकबाकी येत नसल्याने बँकेने कारखान्यांचा ताबा घेणे व त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली जात असताना शेती कर्जाच्या थकबाकीत भरच पडत आहे.

या आर्थिक वर्षात १५ मार्च २०१८ पर्यंत जिल्ह्याची शेती कर्जाची वसुली अवघी २०.८९ टक्के इतकी आहे. मोहोळ तालुक्याची वसुली ३९.८० टक्के इतकी असून, जिल्ह्यात वसुलीत मोहोळ तालुका प्रथम क्रमांकावर आहे. माळशिरस तालुका ३४.५४ टक्के वसुली करुन जिल्ह्यात दुसºया क्रमांकावर आहे. उत्तर सोलापूर तालुक्याची वसुली ही २९ टक्के असून, हा तालुका तिसºया क्रमांकावर आहे. माढा तालुक्याची वसुली २४.२४ तर करमाळा तालुक्याची वसुली २१.७२ टक्के इतकी आहे. सांगोला तालुका वसुलीत सहाव्या क्रमांकावर असून, या तालुक्याची वसुलीची टक्केवारी २०.८२ इतकी आहे.

पंढरपूर तालुक्याची वसुली मागील वर्षीप्रमाणेच असून, २०.५८ टक्के इतकी आहे. बार्शी तालुका १६.८९ टक्के वसुली करुन आठव्या क्रमांकावर तर अक्कलकोट तालुका १५.२८ टक्के वसुली करुन नवव्या स्थानी आहे. मंगळवेढ्याची वसुली अवघी १२.४७ टक्के इतकी असून, दक्षिण सोलापूर तालुक्याची वसुली ६.१० टक्के इतकी आहे. 

दहा कारखान्यांची दिली वसुलीच्जिल्ह्यातील यावर्षी गाळप घेतलेल्या ३० पैकी अवघ्या १० साखर कारखान्यांनी शेतकºयांकडील शेती कर्जाच्या वसुलीसाठी सहकार्य केले आहे. गाळपासाठी आलेल्या उसातून जिल्हा बँकेचे कर्ज कपात करुन विठ्ठलराव शिंदे, सहकार महर्षी, पांडुरंग श्रीपूर, लोकनेते बाबुरावआण्णा पाटील, सिद्धनाथ शुगर, आदिनाथ करमाळा, मकाई करमाळा, कूर्मदास माढा व विठ्ठल शुगर म्हैसगाव या कारखान्यांनी बँकेला वसुली दिली तर इंद्रेश्वर बार्शी व फॅबटेक या कारखान्यांनी काहीअंशी सहकार्य केल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. 

कर्जमाफीच्या चर्चेने कर्जच भरेनात...

  • - २०११-१२ व १२-१३ या दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. 
  • - दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पन्नात घट झाल्याने बँकेची थकबाकी वाढल्याचे कारण सांगितले जात होते.
  • - मागील वर्षभरापासून कर्जमाफीच्या मागणीला जोर आल्याने संपूर्ण कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकºयांनी कर्ज भरले नाही.
  • - आता कर्जमाफी झाल्याने जिल्हा बँकेला ३३० कोटी रुपये आले असले तरी नव्याने कर्ज घेणारे थकबाकीत गेले आहेत.
  • - मागील वर्षी याच कालावधीची वसुली १८.९० टक्के होती. यावर्षी कर्जमाफीची ३३० कोटी इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होऊनही वसुलीची टक्केवारी २०.८९ इतकी आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी