शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सोलापूर जिल्हा बँकेच्या थकबाकीचा आलेख वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:06 IST

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शेती व बिगरशेतीसाठी वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच आहे.

ठळक मुद्देबिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली शेती कर्जाच्या थकबाकीत भरच पडत आहे

सोलापूर: जिल्हा बँकेची शेतीसाठीच्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच असून, जिल्हाभरातील १५ मार्चपर्यंत अवघी २० टक्के वसुली झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याची अवघी ६ टक्के वसुली झाल्याचे आकडेवारी सांगते.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शेती व बिगरशेतीसाठी वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी वरचेवर वाढतच आहे. साखर कारखान्यांकडील थकबाकी येत नसल्याने बँकेने कारखान्यांचा ताबा घेणे व त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली जात असताना शेती कर्जाच्या थकबाकीत भरच पडत आहे.

या आर्थिक वर्षात १५ मार्च २०१८ पर्यंत जिल्ह्याची शेती कर्जाची वसुली अवघी २०.८९ टक्के इतकी आहे. मोहोळ तालुक्याची वसुली ३९.८० टक्के इतकी असून, जिल्ह्यात वसुलीत मोहोळ तालुका प्रथम क्रमांकावर आहे. माळशिरस तालुका ३४.५४ टक्के वसुली करुन जिल्ह्यात दुसºया क्रमांकावर आहे. उत्तर सोलापूर तालुक्याची वसुली ही २९ टक्के असून, हा तालुका तिसºया क्रमांकावर आहे. माढा तालुक्याची वसुली २४.२४ तर करमाळा तालुक्याची वसुली २१.७२ टक्के इतकी आहे. सांगोला तालुका वसुलीत सहाव्या क्रमांकावर असून, या तालुक्याची वसुलीची टक्केवारी २०.८२ इतकी आहे.

पंढरपूर तालुक्याची वसुली मागील वर्षीप्रमाणेच असून, २०.५८ टक्के इतकी आहे. बार्शी तालुका १६.८९ टक्के वसुली करुन आठव्या क्रमांकावर तर अक्कलकोट तालुका १५.२८ टक्के वसुली करुन नवव्या स्थानी आहे. मंगळवेढ्याची वसुली अवघी १२.४७ टक्के इतकी असून, दक्षिण सोलापूर तालुक्याची वसुली ६.१० टक्के इतकी आहे. 

दहा कारखान्यांची दिली वसुलीच्जिल्ह्यातील यावर्षी गाळप घेतलेल्या ३० पैकी अवघ्या १० साखर कारखान्यांनी शेतकºयांकडील शेती कर्जाच्या वसुलीसाठी सहकार्य केले आहे. गाळपासाठी आलेल्या उसातून जिल्हा बँकेचे कर्ज कपात करुन विठ्ठलराव शिंदे, सहकार महर्षी, पांडुरंग श्रीपूर, लोकनेते बाबुरावआण्णा पाटील, सिद्धनाथ शुगर, आदिनाथ करमाळा, मकाई करमाळा, कूर्मदास माढा व विठ्ठल शुगर म्हैसगाव या कारखान्यांनी बँकेला वसुली दिली तर इंद्रेश्वर बार्शी व फॅबटेक या कारखान्यांनी काहीअंशी सहकार्य केल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. 

कर्जमाफीच्या चर्चेने कर्जच भरेनात...

  • - २०११-१२ व १२-१३ या दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. 
  • - दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पन्नात घट झाल्याने बँकेची थकबाकी वाढल्याचे कारण सांगितले जात होते.
  • - मागील वर्षभरापासून कर्जमाफीच्या मागणीला जोर आल्याने संपूर्ण कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकºयांनी कर्ज भरले नाही.
  • - आता कर्जमाफी झाल्याने जिल्हा बँकेला ३३० कोटी रुपये आले असले तरी नव्याने कर्ज घेणारे थकबाकीत गेले आहेत.
  • - मागील वर्षी याच कालावधीची वसुली १८.९० टक्के होती. यावर्षी कर्जमाफीची ३३० कोटी इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होऊनही वसुलीची टक्केवारी २०.८९ इतकी आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी