शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकांची याचिका फेटाळली; प्रशासक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:10 IST

सोलापूर : संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईसाठी संचालकांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ ...

ठळक मुद्देमुंबईत निर्णय : बरखास्तीविरोधातील याचिका उच्च न्यायालयात निकालीसंचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईसाठी संचालकांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार खात्याने ३० मे  २०१८ रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले

सोलापूर : संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईसाठी संचालकांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईला आव्हान देणाºया याचिका उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इंद्रजित महंती व सूरज कोतवाल यांनी गुरुवारी निकाली काढल्या.

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार खात्याने ३० मे  २०१८ रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. या कारवाईला राजन पाटील, शिवानंद पाटील व भारत सुतकर या तीन  संचालकांनी ३० जून रोजी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.ही याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाने फेटाळल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील प्रशासक कायम राहणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची  थकबाकी वरचेवर वाढत असल्याने  मार्च २०१८ मध्ये एनपीए ३९ टक्क्यांवर पोहोचला होता. २०१६-१७ या वर्षीच्या आर्थिक ताळेबंदानुसार जिल्हा बँकेची थकबाकी वरचेवर वाढत असल्याने आर्थिक सुधारणा होणे आवश्यक असल्याचा ठपका नाबार्डने तपासणीनंतर ठेवला होता.

बँकेच्या कामकाजाबाबत ३१ मार्च १७ च्या स्थितीवर नाबार्डने गंभीर दोष असल्याचे सांगितले होते.  बँकेविरोधात सहकार कायदा कलम ११० अ अन्वये कारवाई करण्याबाबत ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी सहकार आयुक्तांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या अनुषंगाने सहकार कायदा कलम ११० अ नुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने २१ मे  २०१८ रोजी सहकार आयुक्त कार्यालयाला कळविले. या अहवालाच्या अनुषंगाने सहकार कायदा कलम ११० अ नुसार बँकेचे संचालक मंडळ ३० मे रोजी बरखास्त करण्यात आले होते.

 या कारवाईला संचालक शिवानंद पाटील, राजन पाटील व भारत सुतकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, नाबार्डने केलेली तपासणी कारवाईचा कालावधी हा मागील संचालक मंडळाच्या कालावधीचा असल्याने याला आम्ही जबाबदार नाही असे शिवानंद पाटील यांनी याचिकेत म्हटले होते. भारत सुतकर यांच्या याचिकेतही याच मुद्याचा समावेश होता. याचिकाकर्त्यांच्या वतीने कारवाई करण्याअगोदर संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचा मुद्दा मांडला होता.

तशी गरज नसल्याचे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने गुरुवारी संपूर्ण याचिका निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. वाय.एस. जहागीरदार, अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी, अ‍ॅड. माधव थोरात यांनी काम पाहिले. 

न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे, परंतु प्रशासकांच्या कालावधीत बँकेत आर्थिक सुधारणा झालेल्या दिसत नाहीत. शेतकºयांचे कर्ज वाटप ठप्प आहे. थकबाकीचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. - राजन पाटीलमाजी चेअरमन, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रCourtन्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट