शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

सोलापूर जिल्हा बँकेचा कर्ज वाटपाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:28 IST

खरिपासाठी १६१ कोटींचे कर्ज : मागील वर्षापेक्षा ५२ कोटींचे अधिक वाटप 

ठळक मुद्देकर्जमाफीतील शेतकºयांना हवंय कर्ज  सांगोला तालुक्याची वसुली ८० टक्के २८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज दिले

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपाचा धडाका लावला असून, सोमवारपर्यंत २१ हजार ७९५ शेतकºयांना १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये खरीप हंगामासाठी वाटप केले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९३ लाख ९२ हजार रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकºयांना कर्ज मिळत नाही, अशी ओरड करुन जिल्ह्यातील शेतकरी थकले होते. बँकेचे प्रशासन व पदाधिकारी पैसे नसल्याचे कारण सांगत होते. एकीकडे थकबाकी वसुली होत नव्हती व दुसरीकडे नव्याने कर्जही मिळत नव्हते. पर्यायाने शेतकरी जिल्हा बँकेऐवजी अन्य बँकांकडून आपली आर्थिक गरज भागवत आहे. ३० मे रोजी प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर शेतकºयांना कर्ज वाटप करण्यावर भर दिला जात आहे. ९ जुलैपर्यंत जिल्हाभरात १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये पीक कर्ज २१ हजार ७९५ शेतकºयांना वाटप केले आहे. मेअखेरला अवघे ४८ कोटी ७२ लाख ६० हजार रुपये कर्ज वाटप झाले होते. 

मागील सव्वा महिन्यात कर्ज वाटपाची आकडेवारी १६१ कोटींवर गेली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९४ लाख रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे. शेतकºयांची संख्याही वाढली असून, मेअखेरला ४ हजार ९२९ शेतकºयांना कर्ज वाटले होते. ते सोमवार, दिनांक ९ जुलैपर्यंत २१ हजार ७९५ इतके झाले आहे. महिनाभरात १६ हजार ८६६ शेतकºयांना बँक कर्ज वाटू शकली. 

कर्जमाफीतील शेतकºयांना हवंय कर्ज 

  • - प्रशासकाच्या सव्वा महिन्याच्या कालावधीत झाले १६ हजार ८६६ शेतकºयांना ११२ कोटी २५ लाख ११ हजार रुपये पीक कर्ज वाटप़
  • - खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेला २८४ कोटी ७९ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत १६० कोटी ९८ लाख रुपये म्हणजे ५६.५२ टक्के कर्ज वाटप केले आहे.
  • - संपूर्ण कर्जमाफी झालेल्यांपैकी ४ हजार १०० शेतकºयांनी ४५ कोटी ४० लाख, एकरकमी परतफेड योजनेतील ५ हजार १३० शेतकºयांनी ५२ कोटी ३३ लाख, प्रोत्साहनचा फायदा मिळालेल्यांपैकी ३० हजार शेतकºयांनी २८५ कोटी असे एकूण ३९ हजार २३० शेतकºयांनी ३८२ कोटी ७२ लाख ६० हजार रुपयांची नव्याने कर्ज मागणी केली आहे. 
  •  

कर्जमाफीतील शेतकºयांशिवाय..- एकरकमी परतफेड केलेल्यांपैकी ३ हजार ५८ शेतकºयांना २७ कोटी ७४ लाख, प्रोत्साहनचा लाभ घेतलेल्यांपैकी १५ हजार ५२१ शेतकºयांना १०४ कोटी ५० लाख ८७ हजार रुपये असे कर्जमाफीतील १८ हजार ५७९ शेतकºयांना १३२ कोटी २४ लाख ९१ हजार रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. याशिवाय ३२१६ शेतकºयांना २८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज दिले आहे. एकूणच जिल्ह्याची वसुली म्हणावी तितकी नाही. सांगोला तालुक्याची वसुली ८० टक्के असली तरी अन्य तालुके मागेच आहेत. वसुलीशिवाय कर्ज वाटप अशक्य आहे. यासाठीच बैठकांतून सूचना दिल्या जात आहेत.-अविनाश देशमुखप्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना