शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सोलापूर जिल्हा बँकेचा कर्ज वाटपाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:28 IST

खरिपासाठी १६१ कोटींचे कर्ज : मागील वर्षापेक्षा ५२ कोटींचे अधिक वाटप 

ठळक मुद्देकर्जमाफीतील शेतकºयांना हवंय कर्ज  सांगोला तालुक्याची वसुली ८० टक्के २८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज दिले

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपाचा धडाका लावला असून, सोमवारपर्यंत २१ हजार ७९५ शेतकºयांना १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये खरीप हंगामासाठी वाटप केले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९३ लाख ९२ हजार रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकºयांना कर्ज मिळत नाही, अशी ओरड करुन जिल्ह्यातील शेतकरी थकले होते. बँकेचे प्रशासन व पदाधिकारी पैसे नसल्याचे कारण सांगत होते. एकीकडे थकबाकी वसुली होत नव्हती व दुसरीकडे नव्याने कर्जही मिळत नव्हते. पर्यायाने शेतकरी जिल्हा बँकेऐवजी अन्य बँकांकडून आपली आर्थिक गरज भागवत आहे. ३० मे रोजी प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर शेतकºयांना कर्ज वाटप करण्यावर भर दिला जात आहे. ९ जुलैपर्यंत जिल्हाभरात १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये पीक कर्ज २१ हजार ७९५ शेतकºयांना वाटप केले आहे. मेअखेरला अवघे ४८ कोटी ७२ लाख ६० हजार रुपये कर्ज वाटप झाले होते. 

मागील सव्वा महिन्यात कर्ज वाटपाची आकडेवारी १६१ कोटींवर गेली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९४ लाख रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे. शेतकºयांची संख्याही वाढली असून, मेअखेरला ४ हजार ९२९ शेतकºयांना कर्ज वाटले होते. ते सोमवार, दिनांक ९ जुलैपर्यंत २१ हजार ७९५ इतके झाले आहे. महिनाभरात १६ हजार ८६६ शेतकºयांना बँक कर्ज वाटू शकली. 

कर्जमाफीतील शेतकºयांना हवंय कर्ज 

  • - प्रशासकाच्या सव्वा महिन्याच्या कालावधीत झाले १६ हजार ८६६ शेतकºयांना ११२ कोटी २५ लाख ११ हजार रुपये पीक कर्ज वाटप़
  • - खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेला २८४ कोटी ७९ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत १६० कोटी ९८ लाख रुपये म्हणजे ५६.५२ टक्के कर्ज वाटप केले आहे.
  • - संपूर्ण कर्जमाफी झालेल्यांपैकी ४ हजार १०० शेतकºयांनी ४५ कोटी ४० लाख, एकरकमी परतफेड योजनेतील ५ हजार १३० शेतकºयांनी ५२ कोटी ३३ लाख, प्रोत्साहनचा फायदा मिळालेल्यांपैकी ३० हजार शेतकºयांनी २८५ कोटी असे एकूण ३९ हजार २३० शेतकºयांनी ३८२ कोटी ७२ लाख ६० हजार रुपयांची नव्याने कर्ज मागणी केली आहे. 
  •  

कर्जमाफीतील शेतकºयांशिवाय..- एकरकमी परतफेड केलेल्यांपैकी ३ हजार ५८ शेतकºयांना २७ कोटी ७४ लाख, प्रोत्साहनचा लाभ घेतलेल्यांपैकी १५ हजार ५२१ शेतकºयांना १०४ कोटी ५० लाख ८७ हजार रुपये असे कर्जमाफीतील १८ हजार ५७९ शेतकºयांना १३२ कोटी २४ लाख ९१ हजार रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. याशिवाय ३२१६ शेतकºयांना २८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज दिले आहे. एकूणच जिल्ह्याची वसुली म्हणावी तितकी नाही. सांगोला तालुक्याची वसुली ८० टक्के असली तरी अन्य तालुके मागेच आहेत. वसुलीशिवाय कर्ज वाटप अशक्य आहे. यासाठीच बैठकांतून सूचना दिल्या जात आहेत.-अविनाश देशमुखप्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना