शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

कर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 09:12 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : शेतीकर्ज थकबाकीवर ३२५ कोटींची एनपीएमध्ये तरतूद

ठळक मुद्देसंचालक मंडळाची संबंधित युनिटकडे ९५० कोटी रुपये इतकी थकबाकी मागील वर्षी ३१ टक्के असलेला एनपीए या आर्थिक वर्षात ३९ टक्के झाला थकबाकीमुळे बँक अधिक आर्थिक अडचणीत आली

सोलापूर : राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजाणी करण्यासाठी मिळालेल्या ४२६ कोटी रूपयांतून  सोलापूर जिल्हा बँकेने आपली देणी भागविल्यामुळे आर्थिक वर्ष सन २०१६ - १७ मध्ये  ६१ कोटी ५५ लाख रुपये तोट्यात असलेली जिल्हा बँक यावर्षी काहीशी सावरली आहे. मात्र शेतीकर्जाच्या थकबाकीपोटी ३२५ कोटींची ‘एनपीए’साठी तरतूद करावी लागली, अशी माहिती बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी दिली.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक यावर्षी सावरली ती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे. मागील वर्षात बँकेला ६१ कोटी ५५ लाख रुपये तोटा झाला होता. यावर्षी  बँकेला कर्जमाफीचे ४२६ कोटी रुपये शासनाकडून आले. यामध्ये जवळपास ५७ कोटी रुपये नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपोटी दिले आहेत. यावर्षी बँकेला व्यावसायिक नफा ३ कोटी ७८ लाख रुपये झाला असला तरी शेती व बिगरशेतीच्या थकबाकीवर एनपीएत तरतूद केल्याने बँकेचा तोटा २७ कोटी ५४ लाख १५ हजार रुपये झाला आहे. शेती कर्जावरील थकबाकीवर मागील वर्षी २६१ कोटी तरतूद केली होती.

 ती यावर्षी ३२५ कोटी एवढी केली आहे. शेती कर्जावर मागील वर्षीपेक्षा ६३ कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद करावी लागल्याने २४.४३ टक्के एनपीएत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. बिगरशेतीसाठीच्या थकबाकीवर मागील वर्षीपेक्षा अवघ्या ५ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे किसन मेटे यांनी सांगितले.शासनाकडून पैसा येण्यास विलंब...

  • - जून २०१७ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे शासनाकडून ६३ कोटी ९७ लाख रुपये अद्यापही मिळाले नाहीत. ही रक्कम बँकेला मिळाली असती तर बँकेचा एनपीए कमी झाला असता असे बँकेचे माजी अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले. कर्जमाफी जाहीर करुन १५ महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून पैसे येण्यास विलंब होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

एनपीए ३९ टक्क्यांवर..- संचालक मंडळाची संबंधित युनिटकडे ९५० कोटी रुपये इतकी थकबाकी असून ती वरचेवर वाढतच आहे. शेतकºयांकडील थकबाकीही वरचेवर वाढत असल्याने बँकेचा एनपीए मागील वर्षीच्या तुलनेत वाढला आहे.  मागील वर्षी ३१ टक्के असलेला एनपीए या आर्थिक वर्षात ३९ टक्के झाला आहे. थकबाकीमुळे बँक अधिक आर्थिक अडचणीत आली असती मात्र कर्जमाफीची रक्कम बँकेला मिळाल्याने बँक काहीअंशी सावरली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र