शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
3
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
4
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
5
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
6
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
7
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
8
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
9
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
10
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

सोलापूर जिल्ह्यात १३ कोटी भरुन २८०६ शेतकरी झाले कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 2:36 PM

एकरकमी परतफेड योजनेचा घेतला लाभ, सोलापूर जिल्हा बँकेची झाली ४६ कोटी वसुली

ठळक मुद्दे२८०६ शेतकºयांनी पैसे भरल्याने कर्जमुक्त झाले जिल्हा बँकेची ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये इतकी वसुली

सोलापूर : एकरकमी परतफेड योजनेंतर्गत जिल्ह्यातील २८०६ शेतकºयांनी दीड लाखावरील १३ कोटी ३ लाख १२ हजार ३४१ रुपये इतकी रक्कम भरल्याने शासनाकडून ३३ कोटी ३२ लाख ६८ हजार २४९ रुपये मिळाले आहेत. यामुळे जिल्हा बँकेची ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये इतकी वसुली झाली आहे.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांची कर्जमाफी केली आहे. यामध्ये थकबाकीदारांना सरसकट दीड लाख रुपयांचा फायदा दिला जाणार असल्याने दीड लाखावरील रक्कम शेतकºयांनी भरावयाची आहे. ३१ मार्चपर्यंत दीड लाखावरील रक्कम शेतकºयांना भरण्याची अंतिम मुदत शासनाने दिली आहे. जिल्हा बँकेच्या २१७ शाखांमध्ये विकास सोसायट्यांमार्फत दीड लाखावरील रक्कम भरणा करुन घेतली जात आहे.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत भरणा करुन घेण्याचे काम सुरू होते. दीड लाखावरील पात्र १६ हजार २२७ शेतकºयांपैकी २८०६ पात्र शेतकºयांनी सायंकाळपर्यंत भरणा केला होता. या शेतकºयांनी १३ कोटी ३ लाख १२ हजार ३४१ रुपयांचा भरणा केला असल्याने शासनाने दीड लाखाप्रमाणे ३३ कोटी ३२ लाख ६८ हजार २४९ रुपये जमा केले आहेत. जिल्हा बँकेची ओटीएसच्या रुपाचे ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये वसुली झाली आहे. 

मंगळवेढ्याचे अवघे ८५ खातेदार- मंगळवेढ्याच्या पात्र ७६६ पैकी ८५ शेतकºयांनीच रक्कम भरणा केली आहे़ बार्शीच्या ६६१, करमाळ्याच्या ५९६, माढ्याच्या ३३२, उत्तर तालुक्यातील २२९, मोहोळच्या २२४, दक्षिण तालुक्यातील १६७, पंढरपूरच्या १५२, सांगोल्याच्या १२६, अक्कलकोटच्या १२०, माळशिरसच्या ११४ याप्रमाणे २८०६ शेतकºयांनी पैसे भरल्याने कर्जमुक्त झाले आहेत. 

कर्जमुक्त होण्याची शेतकºयांना ही संधी आहे. १६ हजार २२७ शेतकºयांना यात भाग घेता येत असून शेतकºयांनी दीड लाखावरील पैसे भरावेत. दीड लाखाची शासनाकडून रक्कम आलेली आहे.- राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक