शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 10:31 IST

२६/११ हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण : वर्षभरात २२ मॉक ड्रील्स; गर्दीच्या ठिकाणी वॉच

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयात एक एटीएस व क्युआरटी ही दोन पथके कार्यरत वर्षभरात २२ प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेण्यात आली सोलापुरात सुरक्षा व्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नेहमी प्रयत्न

संताजी शिंदेसोलापूर : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाºया २६ नोव्हेंबर २00८ च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईसारखा प्रकार घडल्यास शहरात प्रत्युत्तर देऊन दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वर्षभरात २२ प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेण्यात आली आहेत. 

मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला आठवला की आजही अंगाचा थरकाप उडतो.  या घटनेला दहा वर्षे पूर्ण होताहेत.  या थरार उडवणाºया घटनेमतध्ये ३४ परदेशी नागरिकांसह १९७ लोक यामध्ये ठार झाले होते. ८00 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. त्यात सोलापुरातील नागरिकांचाही समावेश आहे. सोलापुरात सुरक्षा व्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नेहमी प्रयत्न केला जातो. शहरातील भाजी मार्केट परिसर,गर्दीचे ठिकाण असलेल्या बाजारपेठा, चित्रपटगृहे, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी पोलिसांची करडी नजर असते. या परिसरात जर दहशतवादी हल्ला झालाच तर पोलीस यंत्रणा कशी सतर्क असली पाहिजे व या कृत्याचा बिमोड कसा करायचा, याची प्रात्यक्षिके वारंवार घेतली जातात. 

पोलीस आयुक्तालयात एक एटीएस (अ‍ॅन्टी टेरेरीस्ट स्कॉड) पथक व क्युआरटी (जलद प्रतिसाद पथक) ही दोन पथके कार्यरत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरक्षा विभागामार्फत प्रात्यक्षिके करून दहशतवादी हल्ल्याचा विरोध कसा करता येईल, हे दाखवून दिले जाते. एस.टी.स्टॅन्ड परिसरात दहशतवादी अतिरेकी आले आहेत, त्यांनी काही प्रवाशांना ओलीस ठेवले आहे, तेव्हा एसटी आगार प्रमुखाचा फोन १00 नंबर किंवा संबंधित पोलीस स्टेशनला जातो. तेथून हा संदेश कंट्रोलला जातो आणि अगदी काही मिनिटांत पोलीस एसटी स्टॅन्ड परिसराचा ताबा घेतात. दहशतवाद्यांशी संवाद साधत त्यांना शिताफीने अटक करतात. या सर्व प्रक्रियेसाठी परिसरातील प्रत्येक व्यक्तीची कशी मदत आवश्यक आहे आणि पोलिसांना काय सहकार्य केले पाहिजे याची माहिती मिळते. अशा पद्धतीने प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेतली जातात. 

बॉम्ब असलेली बॅग अन् पोलिसांची सतर्कता...- भर बाजारपेठेत, सिनेमागृहात किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणी एक बेवारस बॅग पोलिसांकडूनच ठेवली जाते, अचानक कंट्रोलला फोन येतो आणि माहिती मिळते. अवघ्या काही मिनिटांत एटीएस आणि क्युआरटीचे पोलीस बेवारस बॅगेजवळ जातात. श्वान पथकाकडून तपासणी होते, डिटेक्टर मशीनने बॅगेचा अंदाज घेतला जातो. परिसरातील लोकांना तत्काळ तेथून हलविले जाते. बॉम्ब निकामी करणारे पोलीस पद्धतशीरपणे बॅग उघडतात आणि सुटकेचा नि:श्वास घेतात.

अशा पद्धतीची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. दहशतवादी हल्ला यासारख्या कारवाया रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एटीएस व क्युआरटी ही दोन पथके नेहमी सज्ज असतात. सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाºयांना  वारंवार सूचना दिल्या जातात. साध्या वेषात पोलीस कर्मचारी फिरून माहिती घेत असतात. शहरातील प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर पोलिसांचे लक्ष असते. नागरिकांनीही तितकेच सावध असायला पाहिजे,असे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस