शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आतापर्यंत दोन लाख ४२ हजार शेतकºयांना पीकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 13:49 IST

सोलापूर जिल्हा; हप्ता भरलेल्या शेतकºयांच्या विम्यासाठी शिफारस करणार, जिल्हाधिकाºयांची माहिती

ठळक मुद्देखरीप हंगाम २0१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यात दोन लाख ४२ हजार ८८१ शेतकºयांना २२५ कोटी २0 लाख रुपये वितरीत करण्यात आलेयंदाच्या वर्षाची पीक विमा योजनेची अंतिम मुदत २४ जुलै २0१९ पर्यंत असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकºयांनी सहभाग घ्यावाजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजना जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक

सोलापूर : विमा हप्ता भरलेला असूनही तांत्रिक कारणामुळे विमा हप्ता कंपनीकडे जमा झाला नाही, या कारणावरून ज्या शेतकºयांना विम्याचा लाभ नाकारण्यात आला; अशा शेतकºयांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, अशी शिफारस राज्य समितीकडे करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजना जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, शेतकरी प्रतिनिधी गोरख घाडगे, नान्नजकर उपस्थित होते.  

विमा हप्ता भरतांना महा-ई-सेवा केंद्रावर अंतिम मुदतीवेळी जास्त गर्दी होते. यामुळे अनेकवेळा वेबसाईट बंद पडणे, कनेक्टिव्हीटीअभावी महा-ई-सेवा केंद्र व्यवस्थित न चालणे  अशा  तांत्रिक अडचणी उद्भवतात यामुळे शेतकºयांचा विमा हप्ता   महा-ई-सेवा केंद्राकडून कपात   केला जातो; मात्र विमा कंपनीकडे जमा होत नाही. यामध्ये शेतकºयांचा काहीही दोष नाही. अशा शेतकºयांना विमा योजनेचा  लाभ मिळावा, याबाबत राज्यस्तरीय समितीस शिफारस करावी,  अशी मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केली. त्यावर जिल्हाधिकारी  डॉ. भोसले यांनी राज्य समितीकडे अशी शिफारस केली जाईल असे सांगितले. 

खरीप हंगाम २0१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यात दोन लाख ४२ हजार ८८१ शेतकºयांना २२५ कोटी २0 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षाची पीक विमा योजनेची अंतिम मुदत २४ जुलै २0१९ पर्यंत असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकºयांनी सहभाग घ्यावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी केले.

अन्यथा बँक अधिकाºयांवर फौजदारी- सांगोला येथील ४३५ शेतकºयांनी भारतीय स्टेट बँकेकडे विमा हप्ता भरला होता.  पण बँकेने तो वेळेत विमा कंपनीकडे सादर केला नाही. त्यामुळे हे शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिले होते; मात्र आता शेतकºयांचे प्रस्ताव स्वीकारले असून लवकरच विमा रक्कम  देण्याचे आश्वासित केले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाºयांनी  दिली. मात्र शेतकºयांना विमा रक्कम न मिळाल्यास संबंधित बँक अधिकारी अथवा विमा कंपनी अधिकारी यापैकी जे दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी दिला. 

बँकेने द्यावी विम्याची रक्कम- सांगोला तालुक्यातील जगन्नाथ साळुंखे यांनी एचडीएफसी बँकेकडून डाळिंब पिकासाठी कर्ज घेतले होते. कर्ज घेतल्यावर पिकाचा विमा हप्ता एचडीएफसी बँकेने भरणे अपेक्षित असताना रक्कम कपात न केल्याने संबंधित शेतकरी विमा रकमेपासून वंचित राहिले. याला एचडीएफसी बँक पूर्ण जबाबदार असून बँकेने साळुंखे यांना पीक विमा मंजूर रक्कम व्याजासहित द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय