शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘स्मार्ट सिटी’तून सुशोभीकरणाला हातभार; वंचित हद्दवाढ भागाला मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:57 IST

सोलापूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन; शहराचे रूप बदलत आहे, भविष्याचे नियोजन गरजेचे

ठळक मुद्देमहापालिका आर्थिक अडचणीत असली तरी केंद्र शासनाच्या विविध योजना आणि स्मार्ट सिटी योजनेतून तिला बळ मिळालेनगरसेवक विकास निधीपासून वंचित असले तरी शहरात एक हजार कोटी रुपयांची पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत

राकेश कदम

सोलापूर : सोलापूर महापालिकेचा आज ५६ वा वर्धापन दिन. आज महापालिका आर्थिक अडचणीत असली तरी केंद्र शासनाच्या विविध योजना आणि स्मार्ट सिटी योजनेतून तिला बळ मिळाले. नगरसेवक विकास निधीपासून वंचित असले तरी शहरात एक हजार कोटी रुपयांची पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. भविष्यात पाणीपुरवठा, विभागीय कार्यालयांमधील ढिसाळ कारभार, आरक्षित जमिनींवरील अतिक्रमण आदी विषयांवर विशेष काम करणे अपेक्षित आहे. 

महापालिकेची स्थापना १ मे १९६४ रोजी झाली. तीन वेळा महापालिकेची हद्दवाढ झाली. शहर झपाट्याने विस्तारत आहे. सध्या महापालिका आर्थिक संकटात असून, कर्मचाºयांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर येतो आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढत आहे. स्मार्ट सिटी योजनेतून ७५० कोटी रुपये मिळाले आहेत. गेली १५ वर्षे हद्दवाढ भागात भुयारी गटार, पाणीपुरवठा, दिवाबत्तीच्या समस्यांवरुन ओरड सुरू होती. अमृत योजना आणि स्मार्ट सिटी योजनेतून हद्दवाढ भागात भुयारी गटार योजनेची कामे सुरू झाली आहेत.

पथदिव्यांवरील जुने दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून हद्दवाढ भागात नव्याने पोल आणि एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. गावठाण भागात नव्याने भुयारी गटार आणि भूमिगत वायरिंगचे काम सुरू आहे. हुतात्मा बाग, खंदक बाग, उद्यान विभागाची बाग या बागांचा कायापालट करण्यात आला आहे. होम मैदान आणि रंगभवन चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, हे दोन्ही परिसर आता सोलापूरकरांसाठी विरंगुळ्याचे परिसर ठरले आहेत. प्रशासनाने डिजिटल कामाची कास धरली आहे. विविध करांचे डिजिटल पेमेंट, बांधकाम विभागात आॅनलाईन परवान्याची प्रक्रिया सुरू आहे. 

महापालिकेची वाटचाल - १८५० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा मंजूर झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी थॉमस चार्ल्स लॉफमन यांच्या प्रयत्नाने १ आॅगस्ट १८५२ मध्ये म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. पहिल्या बोर्डाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाºयांना नेमण्यात आले. १ मे १९६४ साली सोलापूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. ही महाराष्ट्रातील चौथी महापालिका होती. महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९६९ साली झाली. त्यावेळी ६५ वॉर्ड होते.

१९७८ साली पहिली हद्दवाढ होऊन महापालिकेचे क्षेत्र २५.३३ चौ.कि.मी. झाले. एक एप्रिल १९८९ रोजी दुसरी हद्दवाढ होऊन महापालिकेचे क्षेत्र ३३.३ चौ.कि.मी. झाले. १९९२ मध्ये नवीन वॉर्डरचना झाली. ८७ वॉर्ड निश्चित झाले. ५ मे १९९२ रोजी झालेल्या हद्दवाढीमध्ये ११ गावांचा शहर हद्दीत समावेश झाला. या हद्दवाढीनंतर १९९७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. यावेळी वॉर्डरचना करण्यात आली. यात ९० वॉर्ड करण्यात आले. २००२ मध्ये ९८ वॉर्ड आणि पाच स्वीकृत सदस्य होते. सध्या २६ प्रभाग असून १०२ नगरसेवक आहेत. पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. 

यावर आणखी काम अपेक्षित 

  • - अनियमित पाणीपुरवठा ही शहराची प्रमुख समस्या आहे. नव्याने उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईन प्रस्तावित करण्यात आली आहे. ही योजनाही आर्थिक संकटात आहे. हे संकट दूर व्हायला हवे. 
  • - स्वच्छ भारत मिशन आणि स्मार्ट सिटी योजनेतून घनकचरा व्यवस्थापनाचे चांगले काम सुरू आहे. मात्र शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर पडलेला कचरा उचलला जात नाही. घंटागाड्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
  • - महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळतात. मात्र आरोग्य केंद्र परिसराला पालिकेने भंगाराचे रुप दिले आहे. आरोग्य केंद्राचा परिसर चांगला करणे गरजेचे आहे. 
  • - अनेक आरक्षित जमिनींचे संपादन झालेले नाही. त्यामुळे या जागा लाटण्याचे काम शहरातील राजकीय मंडळी करीत आहेत. भविष्यातील गरज ओळखून काही महत्त्वाच्या आरक्षणांचे विषय मार्गी लावण्याची गरज आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका