शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

सोलापूर जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती, जिल्हा नियोजन बैठकीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 09:02 IST

वीजपुरवठा न तोडण्याची पालकमंत्र्यांची सूचना

ठळक मुद्देदुष्काळाबाबत उपाययोजना तातडीने करा अशी मागणी जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३ हजार ९३ कोटी पालकमंत्री देशमुख यांनी वीजपुरवठा न तोडण्याची सूचना केली. 

सोलापूर : जिल्ह्यात जून व जुलै महिन्यातील पर्जन्यमान ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाले व आता जून ते सप्टेंबर महिन्याचा विचार करता सरासरीपेक्षा खूपच पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. टंचाईस्थितीतील स्थलांतर, रोजगार, चारापाणी, पीक परिस्थितीचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. 

 पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीला झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे, खासदार शरद बनसोडे, आमदार गणपतराव देशमुख, बबनदादा शिंदे, भारत भालके, नारायण पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.

बैठकीत आयत्यावेळच्या विषयात आमदार गणपतराव देशमुख यांनी पावसाअभावी निर्माण झालेल्या जिल्ह्यातील टंचाई स्थितीकडे लक्ष वेधले. टंचाई ठरविण्याचे नियम केंद्र सरकारने बदलले आहेत. त्यानुसार ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे. उजनीच्या पाण्याचे नियोजन व्हायला हवे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तिसंगी, बुद्धेहाळ तलाव भरण्याबाबत विचार व्हावा. कृष्णेतील पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली.

आमदार भारत भालके यांनीही दुष्काळ व हुमणीच्या संकटावर शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी केली. अशात वीज कंपनीने थकबाकी वसुलीसाठी मोहीम उघडली आहे. डीपी बंद ठेवण्यात येत असून, थकबाकीदार शेतकºयांना ५ व ३ हजार वीज बिल मागितले जात आहे. म्हैसाळ योजनेतून शिरनांदगी ओढ्यात पाणी सोडण्याबाबत पत्र दिले आहे.

दुष्काळाबाबत उपाययोजना तातडीने करा अशी मागणी केली. आमदार नारायण पाटील यांनी पाणीटंचाईचा कृती आराखडा करा अशी मागणी केली. यावर आमदार गणपतराव देशमुख यांनी वीज कंपनीने शेतकºयांना बिले वाटप केली नाहीत आणि थकबाकीची मागणी कशी केली जात आहे असा सवाल केला. त्यावर वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३ हजार ९३ कोटी असल्याचे सांगितले. सध्या विजेची मागणी वाढली असून, दररोज रोखीने वीज खरेदी करावी लागत असल्याने थकबाकी वसुलीबाबत कंपनीने आदेश दिल्याचे स्पष्ट केले. त्यावर सदस्यांनी कारखान्यांनी बिले दिली नाहीत, थकबाकी कोठून भरावी असा सवाल केला. त्यावर पालकमंत्री देशमुख यांनी वीजपुरवठा न तोडण्याची सूचना केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीFarmerशेतकरी