शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

सोलापूर जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती, जिल्हा नियोजन बैठकीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 09:02 IST

वीजपुरवठा न तोडण्याची पालकमंत्र्यांची सूचना

ठळक मुद्देदुष्काळाबाबत उपाययोजना तातडीने करा अशी मागणी जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३ हजार ९३ कोटी पालकमंत्री देशमुख यांनी वीजपुरवठा न तोडण्याची सूचना केली. 

सोलापूर : जिल्ह्यात जून व जुलै महिन्यातील पर्जन्यमान ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाले व आता जून ते सप्टेंबर महिन्याचा विचार करता सरासरीपेक्षा खूपच पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. टंचाईस्थितीतील स्थलांतर, रोजगार, चारापाणी, पीक परिस्थितीचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. 

 पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीला झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे, खासदार शरद बनसोडे, आमदार गणपतराव देशमुख, बबनदादा शिंदे, भारत भालके, नारायण पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.

बैठकीत आयत्यावेळच्या विषयात आमदार गणपतराव देशमुख यांनी पावसाअभावी निर्माण झालेल्या जिल्ह्यातील टंचाई स्थितीकडे लक्ष वेधले. टंचाई ठरविण्याचे नियम केंद्र सरकारने बदलले आहेत. त्यानुसार ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे. उजनीच्या पाण्याचे नियोजन व्हायला हवे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तिसंगी, बुद्धेहाळ तलाव भरण्याबाबत विचार व्हावा. कृष्णेतील पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली.

आमदार भारत भालके यांनीही दुष्काळ व हुमणीच्या संकटावर शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी केली. अशात वीज कंपनीने थकबाकी वसुलीसाठी मोहीम उघडली आहे. डीपी बंद ठेवण्यात येत असून, थकबाकीदार शेतकºयांना ५ व ३ हजार वीज बिल मागितले जात आहे. म्हैसाळ योजनेतून शिरनांदगी ओढ्यात पाणी सोडण्याबाबत पत्र दिले आहे.

दुष्काळाबाबत उपाययोजना तातडीने करा अशी मागणी केली. आमदार नारायण पाटील यांनी पाणीटंचाईचा कृती आराखडा करा अशी मागणी केली. यावर आमदार गणपतराव देशमुख यांनी वीज कंपनीने शेतकºयांना बिले वाटप केली नाहीत आणि थकबाकीची मागणी कशी केली जात आहे असा सवाल केला. त्यावर वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३ हजार ९३ कोटी असल्याचे सांगितले. सध्या विजेची मागणी वाढली असून, दररोज रोखीने वीज खरेदी करावी लागत असल्याने थकबाकी वसुलीबाबत कंपनीने आदेश दिल्याचे स्पष्ट केले. त्यावर सदस्यांनी कारखान्यांनी बिले दिली नाहीत, थकबाकी कोठून भरावी असा सवाल केला. त्यावर पालकमंत्री देशमुख यांनी वीजपुरवठा न तोडण्याची सूचना केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीFarmerशेतकरी