शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती, जिल्हा नियोजन बैठकीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 09:02 IST

वीजपुरवठा न तोडण्याची पालकमंत्र्यांची सूचना

ठळक मुद्देदुष्काळाबाबत उपाययोजना तातडीने करा अशी मागणी जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३ हजार ९३ कोटी पालकमंत्री देशमुख यांनी वीजपुरवठा न तोडण्याची सूचना केली. 

सोलापूर : जिल्ह्यात जून व जुलै महिन्यातील पर्जन्यमान ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाले व आता जून ते सप्टेंबर महिन्याचा विचार करता सरासरीपेक्षा खूपच पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. टंचाईस्थितीतील स्थलांतर, रोजगार, चारापाणी, पीक परिस्थितीचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. 

 पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीला झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे, खासदार शरद बनसोडे, आमदार गणपतराव देशमुख, बबनदादा शिंदे, भारत भालके, नारायण पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.

बैठकीत आयत्यावेळच्या विषयात आमदार गणपतराव देशमुख यांनी पावसाअभावी निर्माण झालेल्या जिल्ह्यातील टंचाई स्थितीकडे लक्ष वेधले. टंचाई ठरविण्याचे नियम केंद्र सरकारने बदलले आहेत. त्यानुसार ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे. उजनीच्या पाण्याचे नियोजन व्हायला हवे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तिसंगी, बुद्धेहाळ तलाव भरण्याबाबत विचार व्हावा. कृष्णेतील पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली.

आमदार भारत भालके यांनीही दुष्काळ व हुमणीच्या संकटावर शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी केली. अशात वीज कंपनीने थकबाकी वसुलीसाठी मोहीम उघडली आहे. डीपी बंद ठेवण्यात येत असून, थकबाकीदार शेतकºयांना ५ व ३ हजार वीज बिल मागितले जात आहे. म्हैसाळ योजनेतून शिरनांदगी ओढ्यात पाणी सोडण्याबाबत पत्र दिले आहे.

दुष्काळाबाबत उपाययोजना तातडीने करा अशी मागणी केली. आमदार नारायण पाटील यांनी पाणीटंचाईचा कृती आराखडा करा अशी मागणी केली. यावर आमदार गणपतराव देशमुख यांनी वीज कंपनीने शेतकºयांना बिले वाटप केली नाहीत आणि थकबाकीची मागणी कशी केली जात आहे असा सवाल केला. त्यावर वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३ हजार ९३ कोटी असल्याचे सांगितले. सध्या विजेची मागणी वाढली असून, दररोज रोखीने वीज खरेदी करावी लागत असल्याने थकबाकी वसुलीबाबत कंपनीने आदेश दिल्याचे स्पष्ट केले. त्यावर सदस्यांनी कारखान्यांनी बिले दिली नाहीत, थकबाकी कोठून भरावी असा सवाल केला. त्यावर पालकमंत्री देशमुख यांनी वीजपुरवठा न तोडण्याची सूचना केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीFarmerशेतकरी