शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
2
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
3
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
4
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
5
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 
6
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
7
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
8
Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, ३०० अंकांपेक्षा जास्त घसरण; Nifty २५००० च्या खाली, NBFC Stocks आपटले
9
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
10
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
11
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
12
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
13
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
14
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
15
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
16
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
17
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
18
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
19
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
20
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब

सिद्धेश्वर, हुतात्मा, उद्यान, कोणार्कसह मुंबई एक्स्प्रेसचे वेटिंग अडीचशेच्या पुढे

By appasaheb.patil | Updated: October 31, 2022 11:33 IST

प्रवासी गाड्या हाऊसफुल्ल; दिवाळीनंतर नोकरदारांचा परतीचा प्रवास

सोलापूर : आनंदाचा सण म्हणजे दिवाळी.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, सोलापूरहून पुणे, मुंबई, हैदराबादकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकिटाचा आधार घ्यावा लागत आहे. सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी ही २०० पेक्षाही जास्त झाली आहे.

दिवाळी असल्यामुळे बाहेरगावी असलेली अनेक कुटुंबे आपल्या गावी येतात. त्यामुळे त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवले होते. २० ऑक्टोबरपासून रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवासी आता परतीच्या प्रवासाला लागले असून, आरक्षण तिकिटे काढण्यास स्थानकावरील खिडकीवर जाऊन चौकशी करताना त्यांना २०० पेक्षा अधिक वेटिंग असलेली तिकिटे मिळत आहेत.

----------

मुंबई-पुण्याला जाणाऱ्या सर्वच गाड्यांना सर्वाधिक गर्दी

सोलापूरहून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सर्वाधिक गर्दी आहे. सिद्धेश्वर, हुतात्मा, विशाखापट्टम, भुवनेश्वर, गदग, हैदराबाद, कर्नाटक आदी एक्स्प्रेस गाड्यांना हाऊसफुल्ल गर्दी आहे. मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्यांमध्येही दिवाळीच्या दिवसांमध्ये जागा उपलब्ध नाही. रेल्वेचे प्रवासी अन्य पर्यायी मार्गाने प्रवास करीत आहेत.

--------

ट्रॅव्हल्सलाही वाढली गर्दी...

रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने सोलापुरातील अनेक रेल्वे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवासाला पसंती देत आहेत. पुणे, मुंबईला जाणाऱ्या सर्वच कंपन्यांचे ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल आहेत. अन्य राज्यातून सोलापूरमार्गे जाणाऱ्या अनेक गाड्यांही सोलापुरात न थांबता थेट पुणे, मुंबईकडे जात आहेत. शिवाय अनेक प्रवासी खासगी बस, खासगी गाड्यांचाही आधार घेत आहेत.

-------

रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने रेल्वेचे प्रवासी आता खासगी गाड्यांमधून प्रवास करू लागले आहेत. अन्य सण, उत्सवकाळात विशेष गाड्या चालविणारे रेल्वे प्रशासन दिवाळीत विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय का घेत नाही? रेल्वेचे लाखाे प्रवाशांनी एसटी, खासगी ट्रॅव्हल्स व अन्य वाहनांनी प्रवास केला.

- राजाभाऊ जाधव, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर

---------

यंदा दिवाळीतील गर्दी लक्षात घेता सोलापूरच्या रेल्वे प्रशासनाने एकही विशेष रेल्वे गाडी चालविली नाही. आहे त्या गाड्यांमधून लोकांनी प्रवास केला. दरम्यान, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने लोकांनी अन्य वाहनांचा आधार घेत प्रवास केला. दिवाळीत विशेष गाड्या चालवायला हव्या होत्या.

- राजेंद्र कांबळे, रेल्वे प्रवासी

---------

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेDivaliदिवाळी