शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सिद्धाराम म्हेत्रे यांची भाजप नेत्यांसमवेत चाय पे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:43 IST

राजकीय भेटीगाठी आता उघड; दत्ता तानवडे, आनंद तानवडे, शिवशरण खेडगींसह नेते आले भेटीला

ठळक मुद्देअक्कलकोट येथे आमदार सिद्धाराम म्हेत्रे व भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासमवेत एक तासभर ‘चाय पे चर्चा’ झाल्याने तालुक्यात याची चर्चा सुरू गेल्या दीड महिन्यापासून ‘चोरी चोरी, चुपके चुपके’ चालू असलेले राजकीय कार्यक्रम आता उघड होत आहेत.

अक्कलकोट : अक्कलकोट येथे आमदार सिद्धाराम म्हेत्रे व भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासमवेत एक तासभर ‘चाय पे चर्चा’ झाल्याने तालुक्यात याची चर्चा सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून ‘चोरी चोरी, चुपके चुपके’ चालू असलेले राजकीय कार्यक्रम आता उघड होत आहेत. त्यामुळे आजच्या घटनेवरून आ. म्हेत्रे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उघड झाले आहे.

सोमवारी सकाळी अचानकपणे ए-वन चौकातील जुन्या बँक आॅफ इंडियासमोर खुर्च्या टाकण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला याची कोणालाच माहिती नव्हती. टप्प्याटप्प्याने भाजप व काँग्रेसचे काही नेते, पदाधिकारी आले. त्यानंतर आ. सिद्धाराम म्हेत्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय तानवडे, अक्कलकोटच्या नगराध्यक्षा शोभा खेडगी यांचे पती शिवशरण खेडगी, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, झेडपीचे पक्षनेते आनंद तानवडे, नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे, शिवसिद्ध बुळळा, गुरुसिद्ध प्रचंडे, प्रमोद मोरे यांच्यासह मल्लिकार्जुन पाटील, महेश इंगळे, अमोल भोसले, विलास गव्हाणे, सिद्धार्थ गायकवाड, जयहिंदचे बब्रुवान माने-देशमुख, सद्दाम शेरीकर, एजाज मुतवल्ली, वकील बागवान, रईस टिनवाला, काशिनाथ गोळ्ळे, विश्वनाथ भरमशेट्टी आले.

ए-वन चौकातील ‘चाय पे चर्चा’ योगायोगाने: तानवडेशहरातील ए-वन चौकातील ए-वन हॉटेलसमोर भाजप नेत्यांबरोबर भाजपच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे आमदार यांच्याबरोबर ‘चाय पे चर्चा’ नियोजित नसून ही योगायोगाने घडलेली घटना असल्याचे मत जिल्हा परिषदेचे पक्षनेता आनंद तानवडे यांनी व्यक्त केले आहे.

अक्कलकोट शहरात शिवा संघटनेचा मेळावा मल्लिकार्जुन मंदिर परिसरत आयोजित केला होता. त्या मेळाव्याच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली निघाली होती. त्या रॅलीचे स्वागत करून रॅलीत सहभागी होण्याकरिता ए-वन चौकात पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम बिराजदार व विद्यमान सदस्य विलास गव्हाणे हे दोघे ए-वन चौकातील ए-वन हॉटेलमध्ये चहा घेत असताना तुकाराम बिराजदार यांना भाजप नेत्यांच्या फोनवरून तुम्ही कुठे आहात, अशी विचारणा झाली. त्यावेळी भाजपचे नेते दत्ता तानवडे, शिवशरण खेडगी यांच्यापाठोपाठ भाजपचे अनेक जण ए-वन चौकात जमा झाले असता, त्याचवेळी विलास गव्हाणे यांना देखील आमदार म्हेत्रे यांचा फोन आला. कुठे आहात ए-वन चौकात असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जयहिंदचे बब्रुवान माने देशमुख, अशी एकेक नेतेमंडळी एकत्रित आली. त्याअगोदर चहाची आॅर्डर देण्यात आली होती. योगायोगाने आलेल्या सर्व नेतेमंडळींना चहा देण्यात आला. चहा घेत असतानाच राजकीय चर्चेला उधाण आले.

शिवा संघटनेच्या रॅलीच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या नेत्यांबरोबर लोकांचीही गर्दी वाढत गेली. त्यामुळे काँग्रेसचे आमदार म्हेत्रे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असल्याने योगायोगाने आज घडलेली ‘चाय पे चर्चा’ ही घटना सोशल मीडियावर वाºयासारखी पसरल्याने चर्चेला आणखीनच उधाण आले. परंतु ही ‘चाय पे चर्चा’ नियोजित नसून योगायोग असल्याचे पक्षनेते आनंद तानवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसBJPभाजपा