शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिंदे, देशमुखांचे बोरामणी विमानतळाकडे बोट दाखवणे ही सोलापूरकरांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:15 IST

केतन शहा यांची टीका : बेकायदेशीर चिमणीला अभय देण्याचे काम का करता ?

ठळक मुद्देविमानतळाच्या विषयावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी बोलायला हवे‘सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे’ कार्यक्रमातील दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर चार्टर्ड अकौंटंट श्रीनिवास वैद्य यांनीही कडाडून टीका केली बोरामणी विमानतळासाठी किमान ८०० कोटी रुपये लागतील. कधी मिळतील एवढे पैसे?

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार सुभाष देशमुख यांनी होटगी रोडऐवजी बोरामणी विमानतळाकडे बोट दाखवणे म्हणजे सोलापूरकरांची दिशाभूल आहे. यातून शहरातील दोन पिढ्यांचं नुकसान होतंय, अशी टीका विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी केली. 

महाराष्टÑ साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेच्या वतीने रविवारी सायंकाळी शिंदे आणि देशमुख यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांना सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणीबाबत प्रश्न विचारण्यात आला. दोघांनीही बोरामणी विमानतळाला प्राधान्य द्यायचा सूर आळवला. त्यावर शहा म्हणाले, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी बेकायदेशीर असून ती पाडून टाका, असे न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असताना आमचे नेते या चिमणीला अभय देत आहेत. 

आमदार सुभाष देशमुख यांनी धर्मराज काडादी यांची भेट घेतल्याचे सांगितले. कारखाना इतरत्र हलवावा. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळवून देतो वगैरे गोष्टी सांगितल्या. मग पुढे काय झाले? कोण करणार पाठपुरावा? कसा होणार विकास? भाजपने मागील वर्षात सोलापूरच्या विमानतळासाठी पैसे दिले नाहीत, असे सुशीलकुमार शिंदे यांनी मुलाखतीत सांगितले. वास्तविक भाजप सरकारने होटगी रोड विमानतळासाठी ३० कोटी रुपये दिले होते. या निधीतून विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम झाले. उद्या सुद्धा या विमानतळावरून विमानसेवा सुरू होते. बोरामणी विमानतळासाठी किमान ८०० कोटी रुपये लागतील. कधी मिळतील एवढे पैसे? तुम्ही मुंबईत, सोलापुरात चार्टर प्लेन घेऊन येता तेव्हा किमान चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो. उद्या विमानसेवा सुरू झाली तर तुमचाही खर्च वाचेल. सोलापुरातून चार लाख तरुण मुले स्थलांतरित झालीत. विमानसेवा नसल्यामुळे उद्योजक यायला तयार नाहीत. तरीही आमचे नेते लोकांची दिशाभूल करतात याचे वाईट वाटते, असेही केतन शहा म्हणाले. 

शिंदे ‘बोरामणी’तून बाहेर पडत नाहीत; देशमुख ‘होटगी रोड’ विमानतळात जात नाहीत : वैद्य- ‘सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे’ कार्यक्रमातील दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर चार्टर्ड अकौंटंट श्रीनिवास वैद्य यांनीही कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, या मुलाखतीत सगळ्यात कहर करणारा विषय होता तो होटगी रोड विमानतळाचा. सुशीलकुमार शिंदे बोरामणीच्या विमानतळाच्या परिसरातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. सुभाष देशमुख होटगी रोड विमानतळाच्या प्रवेशद्वारातून आत जाण्यास तयार नाहीत. त्यातच चिमणीवर दोघांचे अतोनात प्रेम दिसून आले. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना बेकायदेशीरपणे ही चिमणी उभी केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही चिमणी बेकायदेशीर असल्याचे शिक्कामोर्तब झालेले आहे. अशा या बेकायदेशीर चिमणीला सुभाष देशमुख पाठराखण करतात, ही लाजिरवाणी बाब आहे.

नुसतेच या बेकायदेशीर चिमणीचे समर्थन करून ते थांबले नाहीत तर सरकारी पैसा कारखाना हलविण्यासाठी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. हा तर कहरच झाला. कोणीही कसेही बेकायदेशीरपणे वागावे आणि त्याला सरकारी यंत्रणेत पाठबळ द्यावे. यातलाच हा प्रकार झाला. ज्या सभागृहात कायदे बनतात त्याच सभागृहातील सदस्य जर बेकायदेशीर बांधकामांना पाठबळ देत असतील तर पहिल्यांदा त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा. त्या-त्या सदनामध्ये बसण्याचा यांना नैतिक अधिकार नाही आणि कायदेशीरपण नाही. सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळ आणि तेथील विमानसेवेबाबत जे विचार मांडले ते तर न पटणारे आहेत, असे यांनी नमूद केले आहे.

कुठे आहेत खासदार?- विमानतळाच्या विषयावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी बोलायला हवे. त्यांनीच लोकसभेत या विषयावर प्रश्न विचारायला हवे. पण आमचे खासदार कुठे असतात आम्हालाच माहीत नाही, अशी टीकाही शहा यांनी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेAirportविमानतळ