शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

धक्कादायक; गतिरोधकाने घेतला युवकाचा बळी; पोलिसांमध्ये मात्र धाप लागल्याची नोंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 10:43 IST

मृत्युविषयी उलटसुलट चर्चा : शवविच्छेदन अहवाल आल्यावरच कारण समजणार

सोलापूर : भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत राहणाऱ्या ओंकार भीमाशंकर पद्मगोंडा या २४ वर्षीय तरुणाचा बळी गतिरोधकाने घेतला की, घरात असतानाच धाप लागल्याने मृत्यू झाला, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. शवविच्छेदन झाले म्हणजे अपघाताचाच प्रकार असल्याचे काहींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, पीएम रिपोर्ट अन् त्याच्या सोबतच्या मित्रांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी सांगितले.

मार्केट यार्डासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या गतिरोधकांची उंची खूपच अधिक आहे. रविवारी रात्री याच रस्त्यावरून येत असताना, ओंकार पद्मगोंडा हा दुचाकीवरून पडला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला तातडीने एका रुग्णालयात दाखल केले. हाताला खरचटल्याने तेथील डॉक्टरांनी मलमपट्टी केली आणि औषधे लिहून दिली. त्यानंतर, ओंकारला घरी आणले. घटनास्थळापासून ते रुग्णालय अथवा रुग्णालयत ते घरापर्यंतच्या मार्गावर त्याला उलट्या झाल्याचेही सांगण्यात येते. नाकातून रक्तस्त्राव झाल्याचेही काहींनी सांगितले.

घरी आल्यावर ओंकारला पुन्हा त्रास सुरू झाला. त्यानंतर, घरातील लोकांनी त्याला तातडीने त्याच रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याच डॉक्टरांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यास खबर देऊन धाप लागल्याचे कारण सांगितले. मग धाप लागून मृत्यू जरी झाला, तरी शवविच्छेदन कसे झाले, असा प्रश्नही ओंकारच्या वडिलांच्या काही मित्रांनी केला. ओंकार याच्या पश्चात वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

सोबतच्या मित्रांची चौकशी होणार

ओंकार हा दुचाकीवरून कुठल्या मित्रासमवेत गेला. त्याच्यासोबत अन्य दुचाकीवर इतर मित्र होते का, याबाबत माहिती घेण्यात येईल. मित्रांची चौकशी करून नेमका प्रकार उजेडात आणण्यात येईल, घटना कुठे घडली. ती आमच्या की जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत याचीही माहिती घ्यावी लागणार असल्याचे जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी सांगितले.

अनेकांचे बळी गेले...

मार्केट यार्डात जाण्यासाठी दोन प्रमुख प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावरून जाणे म्हणजे जणू तारेवरची कसरत. मार्केट यार्डात दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. अपघात होऊ नये, म्हणजे ज्या पद्धतीने उंच गतिरोधक आहेत, त्याच गतिरोधकाने अनेकांचे बळी गेले. काही जणांना अपंगत्व आले. ओंकारचा बळी याच गतिरोधकाने घेतल्याचे यार्डातील व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस