शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

धक्कादायक; चिठ्ठी अन् व्हिडीओ बहिणीच्या मोबाईलवर पाठवून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 16:58 IST

मम्मीला कॉल केला.. तुझ्या हातचा शेवटचा चहा पिऊन आलोय,

सुस्ते : उद्योगधंदासाठी पैसे उपलब्ध नसल्याने व कामात सतत अपयश येत असल्याने एका तरुणाने आयुष्याला कंटाळून १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घर सोडला. त्यानंतर मम्मी आज तुझ्या हातचा शेवटचा चहा पिऊन आलोय, असे म्हणत आईला फोन केला. त्यानंतर ४.१३ वाजता आत्महत्या करित असून माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी व व्हिडिओ ५.४५ वाजता बहीण गौरी भोसले व सोमनाथ सालविठ्ठल यांच्या मोबाईलवर पाठवून जगाचा निरोप घेतला.

ओंकार नारायण सालविठ्ठल (वय २७, रा. सुस्ते) असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार सालविठ्ठल याचे शिक्षण एमबीएपर्यंत पूर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. घरची परिस्थिती हलाकीची, वडील विठ्ठल साखर कारखान्यात नोकरी करत आहेत. घरच्या परिस्थितीचे भान ठेवून ओंकार नोकरीसाठी प्रयत्न करत होता. नोकरी भेटत नव्हती, नोकरीवर न अवलंबता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करायचा निश्चय केला होता. वडिलांची पावणेसहा एकर जमीन आहे. जमिनीवर बँकेचे कर्ज असल्यामुळे दुसरे कर्ज मिळत नव्हते. यामुळे आईवडिलांच्या जीवावर किती दिवस बसून खायचं, ही गोष्ट ओंकारला खटकत होती. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. त्याला अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र १९ एप्रिल रोजी ओंकारचे निधन झाल्याची माहिती वडील नारायण सालविठ्ठल यांनी दिली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

................

घरातील कर्ताधर्ता मुलगा गेला

शेतीत खर्च करून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतात पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने बँकेच्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. बँका दुसरे कर्ज देत नाहीत. मुलाला स्वतःचा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु पैसे न मिळाल्याने घरातील कर्ताधर्ता मुलगा गेल्याची खंत मयत ओंकार सालविठ्ठलचे वडील नारायण सालविठ्ठल यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूPandharpurपंढरपूर