शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धक्कादायक; चिमुरड्यांसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना

By appasaheb.patil | Updated: September 30, 2022 19:20 IST

बार्शी तालुक्यातील कुसळंबमधील घटना : विद्युत मोटारी लावून काढले मृतदेह

कुसळंब/सोलापूर : एका विवाहितेने पोटच्या दोन चिमुरड्यांना घेऊन स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. २०१७ मध्ये याच विहिरीत पहिल्या पत्नीने दोन चिमुरडींना घेऊन आत्महत्या केली होती.

रोहिणी ऊर्फ अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २२), अनिष बाबासाहेब काशिद (वय दीड वर्ष) व अक्षरा बाबासाहेब काशीद (वय चार महिने) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. विद्युत मोटारी लावून सायंकाळी चार वाजता तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

नोव्हेंबर २०१९ मध्ये बाबासाहेब काशीद यांनी खडकोणी येथील दिलीप शिंदे यांची मुलगी रोहिणी ऊर्फ अनुराधा हिच्याशी दुसरा विवाह केला. शुक्रवारी घटनेदिवशी पती बाबासाहेब हे कामानिमित्त तर सासरे प्रभाकर हे बार्शीला बँकेतून पगार आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, रोहिणी हिने सकाळी १० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास दोन चिमुरड्यांना घेऊन उडी घेऊन आत्महत्या केली.

------------त्याच विहिरीत पहिल्या पत्नीचीही आत्महत्या ...

कुसळंब येथील बाबासाहेब काशीद यांची पहिली पत्नी अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २३) हिने आदिती काशीद (वय ५) व अक्षरा काशीद (वय ३) या दोन मुलींना स्वत:च्या कमरेला साडीने बांधून घेऊन २७ जुलै २०१७ रोजी स्वत:च्या शेतातील त्याच विहिरीत आत्महत्या केली होती. तेव्हा जाचहाट व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी