शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

धक्कादायक; मतिमंद मुलाला फास देऊन वृद्ध माताही लोखंडी ॲंगलला लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 18:28 IST

सोलापुरातील शिवगंगा नगरातील घटना : जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नोंद

सोलापूर : ४२ वर्षाचा मुलगा मतिमंद आहे, आपल्या पश्चात त्याचं कसं होणार? हा प्रश्न मनाला भेडसावत असलेल्या वृद्ध आईने प्रथमत: त्याला साडीने गळफास दिला. मुलगा लटकताच आईनेही गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. हा दुर्दैवी प्रकार सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आला.

मयत उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक (वय ६२) ही आपला पती सिद्धेश्वर पुराणिक, मोठा मुलगा दिग्विजय (वय ४२ रा. शिवगंगा नगर, शेळगी), मृत्युंजय, धनंजय व अंजनेय यांच्यासमवेत शिवगंगा नगरात राहत होत्या. मोठा मुलगा हा लहानपणापासून मतिमंद होता. मृत्युंजय व धनंजय हे दोघे मंदिरात पुजारी आहेत. चार नंबरचा मुलगा अंजनेय हा एका कारखान्यात कामाला आहे. दिग्विजय हा मतिमंद असल्याने काही काम करत नव्हता, वडील सिद्धेश्वर यांच्या पायाला मार लागल्याने तेही घरात बसून असतात. आई उमादेवी हीदेखील घरकाम करत होती. तिन्ही मुलांची लग्ने झाली हाेती, त्यामुळे त्यांची चिंता आईला नव्हती. मोठा मुलगा मतिमंद असल्याने त्याचे लग्न झाले नव्हते.

रविवारी रात्री दोघांनी जेवण केले, त्यानंतर ते झोपण्यासाठी घराच्या गच्चीवर गेले. धनंजय हे सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी जाण्याकरिता पहाटे उठले होते. तेव्हा त्यांना आपला मोठा भाऊ व आई दोघे जिन्याच्या लोखंडी ॲंगलला गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ ही माहिती जोडभावी पेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात दाेघांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

पतीनेही घेतला होता आत्महत्येचा निर्णय

० मुलगा दिग्विजय हा आजारी होता, त्यामुळे त्याला दवाखान्याला घेऊन जायचे होते. आई उमादेवी यांनी त्याला दवाखान्याला घेऊन जाण्यासाठी दोन नंबरच्या मुलाकडे पैशाची मागणी केली होती. मुलाने आपल्याकडे पैसे नाहीत असे म्हटले होते. आम्ही जिवंत आहाेत तर मतिमंद मुलाची ही अवस्था आहे. जर आम्ही मरण पावलो तर याचे कसे होणार, यावर उमादेवी व सिद्धेश्वर या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली होती. पती-पत्नीने मुलाला सोबत घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सिद्धेश्वर यांच्या पायाला लागल्यामुळे ते गच्चीवर जाऊ शकले नाहीत. त्यामुळे उमादेवी यांनी मुलाला घेऊन आत्महत्या केली अशी चर्चा शिवगंगा नगर परिसरात सुरू होती.

शिवगंगा परिसरात हळहळ

० दिग्विजय हा अत्यंत गरीब स्वभावाचा होता. तो उपद्रवी नव्हता. सकाळी उठणे, अंघोळ करून व जेवण करून घराबाहेर जात होता. बऱ्याच वेळा तो आपल्या घरासमोर बसत होता किंवा परिसरात फिरून येत होता. आई उमादेवी हीदेखील शांत स्वभावाची होती. दोघांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी