शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

धक्कादायक; मतिमंद मुलाला फास देऊन वृद्ध माताही लोखंडी ॲंगलला लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 18:28 IST

सोलापुरातील शिवगंगा नगरातील घटना : जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नोंद

सोलापूर : ४२ वर्षाचा मुलगा मतिमंद आहे, आपल्या पश्चात त्याचं कसं होणार? हा प्रश्न मनाला भेडसावत असलेल्या वृद्ध आईने प्रथमत: त्याला साडीने गळफास दिला. मुलगा लटकताच आईनेही गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. हा दुर्दैवी प्रकार सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आला.

मयत उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक (वय ६२) ही आपला पती सिद्धेश्वर पुराणिक, मोठा मुलगा दिग्विजय (वय ४२ रा. शिवगंगा नगर, शेळगी), मृत्युंजय, धनंजय व अंजनेय यांच्यासमवेत शिवगंगा नगरात राहत होत्या. मोठा मुलगा हा लहानपणापासून मतिमंद होता. मृत्युंजय व धनंजय हे दोघे मंदिरात पुजारी आहेत. चार नंबरचा मुलगा अंजनेय हा एका कारखान्यात कामाला आहे. दिग्विजय हा मतिमंद असल्याने काही काम करत नव्हता, वडील सिद्धेश्वर यांच्या पायाला मार लागल्याने तेही घरात बसून असतात. आई उमादेवी हीदेखील घरकाम करत होती. तिन्ही मुलांची लग्ने झाली हाेती, त्यामुळे त्यांची चिंता आईला नव्हती. मोठा मुलगा मतिमंद असल्याने त्याचे लग्न झाले नव्हते.

रविवारी रात्री दोघांनी जेवण केले, त्यानंतर ते झोपण्यासाठी घराच्या गच्चीवर गेले. धनंजय हे सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी जाण्याकरिता पहाटे उठले होते. तेव्हा त्यांना आपला मोठा भाऊ व आई दोघे जिन्याच्या लोखंडी ॲंगलला गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ ही माहिती जोडभावी पेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात दाेघांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

पतीनेही घेतला होता आत्महत्येचा निर्णय

० मुलगा दिग्विजय हा आजारी होता, त्यामुळे त्याला दवाखान्याला घेऊन जायचे होते. आई उमादेवी यांनी त्याला दवाखान्याला घेऊन जाण्यासाठी दोन नंबरच्या मुलाकडे पैशाची मागणी केली होती. मुलाने आपल्याकडे पैसे नाहीत असे म्हटले होते. आम्ही जिवंत आहाेत तर मतिमंद मुलाची ही अवस्था आहे. जर आम्ही मरण पावलो तर याचे कसे होणार, यावर उमादेवी व सिद्धेश्वर या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली होती. पती-पत्नीने मुलाला सोबत घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सिद्धेश्वर यांच्या पायाला लागल्यामुळे ते गच्चीवर जाऊ शकले नाहीत. त्यामुळे उमादेवी यांनी मुलाला घेऊन आत्महत्या केली अशी चर्चा शिवगंगा नगर परिसरात सुरू होती.

शिवगंगा परिसरात हळहळ

० दिग्विजय हा अत्यंत गरीब स्वभावाचा होता. तो उपद्रवी नव्हता. सकाळी उठणे, अंघोळ करून व जेवण करून घराबाहेर जात होता. बऱ्याच वेळा तो आपल्या घरासमोर बसत होता किंवा परिसरात फिरून येत होता. आई उमादेवी हीदेखील शांत स्वभावाची होती. दोघांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी