शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धक्कादायक! सोन्यासाठी डोक्यात दगड घालून मुलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 23:50 IST

बापलेकांना दारूची सवय असल्याने दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती.

Solapur Crime: 'दारूच्या नादात सोन्याचा बदाम का आणला?' या कारणावरून बापलेकात भांडण झाले. याचे पर्यवसान पित्याने डोक्यात दगड घालून खून करण्यात झाले. सोमनाथ किरण ठाकरे (वय २८, रा. कोरफळे, ता. बार्शी) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवार, ३ मार्च रोजी रात्री ७ वाजेच्या दरम्यान गावाजवळच शेतात वडील राहतात त्या वस्तीवर घडली. याबाबत मयताची पत्नी स्वाती सोमनाथ ठाकरे (वय १९, रा. कोरफळे) हिने तालुका पोलिसात फिर्याद दिली असून सासरे किरण गोविंद ठाकरे (वय ६५) यांच्याविरुद्ध बी. एन. एस. १०३ : १ : प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. याची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पिता हा कोरफळे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतातील वस्तीवर राहत असून मयत मुलगा व पत्नी गावात असलेल्या घरी राहत होते. बापलेकांना दारूची सवय असल्याने दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. त्या दिवशी मयताने मुलाच्या गळ्यातील सोन्याचा बदाम मोडून गाडीचा हप्ता भरावयाचा आहे तो दे म्हणाला. यावर पत्नीने तो बदाम सासऱ्याजवळ दिल्याचे सांगताच मयत मुलगा वस्तीवर पित्याकडे गेला. 

मुलाचा सोन्याचा बदाम तुम्ही का आणला? असे विचारताच बापानेच मुलाच्या डोक्यात दगड फेकून मारला. तो खाली पडताच पुन्हा मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घालून जीवे ठार मारल्याची घटना घडली. पोलिसानी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भालेराव करत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी