शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

धक्कादायक; प्रेम अन् रागातून सोलापुरातील मुली, महिला होत आहेत गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 17:37 IST

बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले : रागाच्या भरात गेले निघून, पोलिसांनी आणले शाेधून

सोलापूर : किरकोळ भांडण असो, प्रेम प्रकरण असो किंवा अन्य कोणत्याही कारणावरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सात पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वाढल्या असून, त्यात महिला व मुलींची संख्या सर्वात जास्त आहे.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात पोलीस ठाणे आहेत. गेल्या वर्षभरात १२५ लोक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रारीमध्ये १५ वर्षांपासून ६० वर्षांपर्यंतच्या मुली व महिलांचा समावेश आहे. मुली व महिला घरातील किरकोळ वादातून निघून गेल्या आहेत, तर बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून बेपत्ता झाल्याचे पुढे आले आहे. काही मुली व महिलांचा शोध लवकर लागला, तर काहींचा वर्ष झालेतरी पत्ता लागला नाही.

घरातील भांडण, मुलांकडून होणारा त्रास याला कंटाळून वृद्ध पुरुष, महिलांनी घर सोडलं आहे. काही जणांचा शोध लागला, त्यात काही लोक आत्महत्या केल्याचेही पुढे आले आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येतो. अनेकजण मिळून आले त्यांना पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. हद्दवाढ भागात काही महिला या प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचेही उघडकीस आले आहे.

राग अन् प्रेम...

= घरातील वाद मिटत नाही, आईवडील, मुलगा, सून, नातू आदी नातेवाईक ऐकत नाहीत. आपल्याशी कोणी जुळवून घेत नाहीत. सतत आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्याने मानसिक तणावाखाली घर सोडलं आहे. अल्पवयीन असो किंवा वयात आलेल्या मुली प्रेम प्रकरणातून घर सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. राग अन् प्रेम या दोन गोष्टींमुळेच घरातून बेपत्ता होण्याच प्रमाण वाढले आहे.

 

पोलीस ठाणे                                    बेपत्ता             शोध

  • फौजदार चावडी पोलीस ठाणे             १८             १६
  • जेलरोड पोलीस ठाणे                         १७             १५
  • सदर बझार पोलाीस ठाणे                        १९             १५
  • विजापूर नाका पोलीस ठाणे             २१             २०
  • सलगवस्ती पाेलीस ठाणे                         १२             ११
  • जोडभावी पेठ पोलीस ठाणे             १३             १२
  • एमआयडीसी पोलीस ठाणे             २५             २१
  •  

पोलिसांमुळे पुन्हा गळा भेट

- किरकोळ वादातून एक वृद्ध महिला घरातून निघून गेली हाेती. विजापूर नाका पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतला, तब्बल तीन महिन्यांनंतर महिला ग्रामीण भागात मिळून आली. सुनांसोबत निर्माण झालेल्या मतभेदामुळे ती घरातून निघून गेली होती. शेवटी पोलिसांनी तिचा शोध घेऊन पुन्हा मुलांना आईची भेट घडवून आणली.

 

लहान मूल असो किंवा वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचे फोटो सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाणे व त्या पलीकडे जिल्ह्याबाहेरच्या पोलिसांना पाठवले जातात. त्यामुळे बेपत्ता झालेल्या बहुतांश लोकांचा शोध लागतो.

डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस