शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

धक्कादायक; प्रेम अन् रागातून सोलापुरातील मुली, महिला होत आहेत गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 17:37 IST

बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले : रागाच्या भरात गेले निघून, पोलिसांनी आणले शाेधून

सोलापूर : किरकोळ भांडण असो, प्रेम प्रकरण असो किंवा अन्य कोणत्याही कारणावरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सात पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वाढल्या असून, त्यात महिला व मुलींची संख्या सर्वात जास्त आहे.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात पोलीस ठाणे आहेत. गेल्या वर्षभरात १२५ लोक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रारीमध्ये १५ वर्षांपासून ६० वर्षांपर्यंतच्या मुली व महिलांचा समावेश आहे. मुली व महिला घरातील किरकोळ वादातून निघून गेल्या आहेत, तर बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून बेपत्ता झाल्याचे पुढे आले आहे. काही मुली व महिलांचा शोध लवकर लागला, तर काहींचा वर्ष झालेतरी पत्ता लागला नाही.

घरातील भांडण, मुलांकडून होणारा त्रास याला कंटाळून वृद्ध पुरुष, महिलांनी घर सोडलं आहे. काही जणांचा शोध लागला, त्यात काही लोक आत्महत्या केल्याचेही पुढे आले आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येतो. अनेकजण मिळून आले त्यांना पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. हद्दवाढ भागात काही महिला या प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचेही उघडकीस आले आहे.

राग अन् प्रेम...

= घरातील वाद मिटत नाही, आईवडील, मुलगा, सून, नातू आदी नातेवाईक ऐकत नाहीत. आपल्याशी कोणी जुळवून घेत नाहीत. सतत आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्याने मानसिक तणावाखाली घर सोडलं आहे. अल्पवयीन असो किंवा वयात आलेल्या मुली प्रेम प्रकरणातून घर सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. राग अन् प्रेम या दोन गोष्टींमुळेच घरातून बेपत्ता होण्याच प्रमाण वाढले आहे.

 

पोलीस ठाणे                                    बेपत्ता             शोध

  • फौजदार चावडी पोलीस ठाणे             १८             १६
  • जेलरोड पोलीस ठाणे                         १७             १५
  • सदर बझार पोलाीस ठाणे                        १९             १५
  • विजापूर नाका पोलीस ठाणे             २१             २०
  • सलगवस्ती पाेलीस ठाणे                         १२             ११
  • जोडभावी पेठ पोलीस ठाणे             १३             १२
  • एमआयडीसी पोलीस ठाणे             २५             २१
  •  

पोलिसांमुळे पुन्हा गळा भेट

- किरकोळ वादातून एक वृद्ध महिला घरातून निघून गेली हाेती. विजापूर नाका पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतला, तब्बल तीन महिन्यांनंतर महिला ग्रामीण भागात मिळून आली. सुनांसोबत निर्माण झालेल्या मतभेदामुळे ती घरातून निघून गेली होती. शेवटी पोलिसांनी तिचा शोध घेऊन पुन्हा मुलांना आईची भेट घडवून आणली.

 

लहान मूल असो किंवा वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचे फोटो सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाणे व त्या पलीकडे जिल्ह्याबाहेरच्या पोलिसांना पाठवले जातात. त्यामुळे बेपत्ता झालेल्या बहुतांश लोकांचा शोध लागतो.

डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस