शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

धक्कादायक; प्रेम अन् रागातून सोलापुरातील मुली, महिला होत आहेत गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 17:37 IST

बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले : रागाच्या भरात गेले निघून, पोलिसांनी आणले शाेधून

सोलापूर : किरकोळ भांडण असो, प्रेम प्रकरण असो किंवा अन्य कोणत्याही कारणावरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सात पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वाढल्या असून, त्यात महिला व मुलींची संख्या सर्वात जास्त आहे.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात पोलीस ठाणे आहेत. गेल्या वर्षभरात १२५ लोक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रारीमध्ये १५ वर्षांपासून ६० वर्षांपर्यंतच्या मुली व महिलांचा समावेश आहे. मुली व महिला घरातील किरकोळ वादातून निघून गेल्या आहेत, तर बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून बेपत्ता झाल्याचे पुढे आले आहे. काही मुली व महिलांचा शोध लवकर लागला, तर काहींचा वर्ष झालेतरी पत्ता लागला नाही.

घरातील भांडण, मुलांकडून होणारा त्रास याला कंटाळून वृद्ध पुरुष, महिलांनी घर सोडलं आहे. काही जणांचा शोध लागला, त्यात काही लोक आत्महत्या केल्याचेही पुढे आले आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येतो. अनेकजण मिळून आले त्यांना पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. हद्दवाढ भागात काही महिला या प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचेही उघडकीस आले आहे.

राग अन् प्रेम...

= घरातील वाद मिटत नाही, आईवडील, मुलगा, सून, नातू आदी नातेवाईक ऐकत नाहीत. आपल्याशी कोणी जुळवून घेत नाहीत. सतत आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्याने मानसिक तणावाखाली घर सोडलं आहे. अल्पवयीन असो किंवा वयात आलेल्या मुली प्रेम प्रकरणातून घर सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. राग अन् प्रेम या दोन गोष्टींमुळेच घरातून बेपत्ता होण्याच प्रमाण वाढले आहे.

 

पोलीस ठाणे                                    बेपत्ता             शोध

  • फौजदार चावडी पोलीस ठाणे             १८             १६
  • जेलरोड पोलीस ठाणे                         १७             १५
  • सदर बझार पोलाीस ठाणे                        १९             १५
  • विजापूर नाका पोलीस ठाणे             २१             २०
  • सलगवस्ती पाेलीस ठाणे                         १२             ११
  • जोडभावी पेठ पोलीस ठाणे             १३             १२
  • एमआयडीसी पोलीस ठाणे             २५             २१
  •  

पोलिसांमुळे पुन्हा गळा भेट

- किरकोळ वादातून एक वृद्ध महिला घरातून निघून गेली हाेती. विजापूर नाका पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतला, तब्बल तीन महिन्यांनंतर महिला ग्रामीण भागात मिळून आली. सुनांसोबत निर्माण झालेल्या मतभेदामुळे ती घरातून निघून गेली होती. शेवटी पोलिसांनी तिचा शोध घेऊन पुन्हा मुलांना आईची भेट घडवून आणली.

 

लहान मूल असो किंवा वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचे फोटो सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाणे व त्या पलीकडे जिल्ह्याबाहेरच्या पोलिसांना पाठवले जातात. त्यामुळे बेपत्ता झालेल्या बहुतांश लोकांचा शोध लागतो.

डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस