शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धक्कादायक; पश्चिम महाराष्ट्र अन् खान्देशात सामूहिक शेततळ्यांची योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 18:34 IST

प्रचलित जिल्ह्यांना वगळल्याचा प्रशासनाचा निर्वाळा

सोलापूर : मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या पश्चिम महाराष्ट्र व खान्देशात सामूहिक शेततळ्यांची योजना बंद केली आहे. यामुळे नाइलाजाने अवघे ५० हजार अनुदान असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज करावा लागत आहे. सामूहिक शेततळ्यांची योजना प्रचलितपेक्षा नवीन जिल्ह्यात राबवली जात असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून महत्त्वाकांक्षी सामूहिक शेततळ्याची योजना सुरू झाली होती. शेतकऱ्यांकडून या योजनेच्या सामूहिक शेततळ्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. ५ लाख रुपये अनुदान मिळत असल्याने मोठे शेततळे, तार कंपौंड, अस्तरीकरण आदी काम होत होते. पाण्याचा अधिक साठा होत असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज येत होते.

दोन वर्षे (१५- १६ व १६-१७) सामूहिक शेततळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान द्यावे लागल्याने २०१७-१८ पासून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या शेततळ्यांचे अनुदान पश्चिम महाराष्ट्र तसेच खान्देशातील जिल्ह्यांसाठी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र व खान्देशातील काही जिल्ह्यांत सामूहिक शेततळ्यांसाठी सर्वसाधारण संवर्गातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नाही; मात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जात असल्याचे सांगण्यात आले.

 

दोन वर्षांत ४०१ शेततळ्यांची कामे...

सोलापूर जिल्ह्यात २०१५-१६ व १६-१७ या दोन वर्षांत ४०१ सामूहिक शेततळ्यांचीही कामे झाली. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांची मागणी असूनही अनुदान मिळाले नाही. सामूहिक शेततळ्यांची जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

 

राज्यातील प्रचलित जिल्ह्यांपेक्षा नवीन जिल्ह्यांना सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना सामूहिक शेततळ्यांसाठी अनुदान दिले जात आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना मागणीनुसार सर्वच जिल्ह्यांना अनुदान वितरित केले जाते. केंद्र सरकार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी राज्याला दरवर्षी १७८ कोटी रुपये देते.

- डाॅ. कैलास मोटे, संचालक, फलोत्पादन

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी