शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

धक्कादायक; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सात दिवसानंतर प्रेत उकरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:56 IST

सोलापूर : पतीने केलेल्या मानसिक छळ आणि मारहाणीतून पेटवून घेतलेल्या विवाहित महिलेचे प्रेत उकरुन शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले. रईसा ...

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत पंचनामासात दिवसांनंतर उकरून केले शवविच्छेदनपेटवून घेतलेल्या विवाहित महिलेचे प्रेत 

सोलापूर: पतीने केलेल्या मानसिक छळ आणि मारहाणीतून पेटवून घेतलेल्या विवाहित महिलेचे प्रेत उकरुन शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले. रईसा गफूर शेख (वय ३२, रा. मोदीखाना, सोलापूर) असे मयतेचे नाव आहे. मयतेच्या नातलगांच्या विनंतीवरुन मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी हे प्रेत उकरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस सूत्रांनुसार, यातील मयत रईसा गफूर शेख हिचा पेशाने वकील असलेल्या गफूर शेख याच्याशी २८ मार्च २००९ रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या काही कालावधीनंतर पती-पत्नीची किरकोळ कारणावरुन भांडणे होऊ लागली. वेळोवेळी मारहाणही सुरु झाली. वडिलांकडून अडीच लाख रुपये हुंडा आणण्यासाठी आणि आईच्या नावावर असलेले घर नावावर करण्यासाठी तगादा लावला. शेवटी रईसाच्या वडिलांनी मुलीचा संसार सुखी व्हावा म्हणून अडीच लाख रुपयेही दिले. यानंतरही मारहाण सुरुच होती. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून रईसाने ११ नोव्हेंबर २०१८ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. 

गंभीर भाजलेल्या रईसाला सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. घरी आल्यावर एक महिन्याने ३ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या नातलगांनी मोदी कब्रस्तान येथे दफनविधी केला. यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मोदी पोलीस ठाण्यामध्ये रईसाचा मृत्यू झाल्याचे सांगून तिच्या मृत्यूचे कारण कळावे म्हणून पोलिसांकडे विनंती केली. यावरुन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोदी कब्रस्तान येथे वैद्यकीय अधिकारी विनोद राठोड, नातेवाईकांसमक्ष तिचा मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे सायंकाळी रईसाच्या मृतदेहाचे विच्छेदन केले. वैद्यकीय अहवालानंतर तिचे कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

मृत्यूच्या कारणासाठी केले पोस्टमार्टेम- मयत रईसा आणि आरोपी गफूर शेख यांचा प्रेमविवाह झालेला होता त्यामुळे ते स्वतंत्र राहत होते. लग्नांच्या काही दिवसानंतर दोघांमध्य कुरबूर होऊन भांडणे व्हायची. यातूनच रईसाने मनस्ताप सहन न झाल्याने पेटवून घेतले. माहेरच्या लोकांनी तिच्यावर रुग्णालयात उपचार करुन घरी आणल्यानतर तिचा मृत्यू झाला. मात्र संबंधित प्रकार हा पतीने दिलेल्या त्रासामुळेच रईसाचा मृत्यू झाला असून, तिच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी  सात दिवसानंतर पोस्टमार्टेम करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल