शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

"मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:30 IST

Markadwadi : मारकडवाडीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sharad Pawar on CM Devendra Fandnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सोलापुरातील मारकडवाडी हे गाव देशभरात चर्चेत आलं आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटाने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे जानकर गटाच्या काही ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचे नियोजन केलं होतं. मात्र प्रशासनाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. शरद पवार यांनीही या वादात उडी घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आता मारकडवाडीतूनच शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला विरोध करत सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात काही ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी उत्तमराव जानकर गटाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र ही मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला आणि जानकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे मारकडवाडी ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर भाष्य केलं.

रविवारी शरद पवार हे मारकडवाडीत पोहोचले होते. यावेळी शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणाऱ्या मारकडवाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकूण घेतले. "निवडणुकीमध्ये कोणी जिंकतं तर कोणी हरतं. पण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेवर साशंकता आहे आणि मतदारांना विश्वास वाटत नाही. आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका लढवतो. मतदार मतदानासाठी जातात आणि आत्मविश्वासाने बाहेर पडतात पण काही निकालांमुळे लोकांमध्ये शंका निर्माण झाली आहे," असं शरद पवार म्हणाले.

"आज जगात कुठेच ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारताच याचा वापर का सुरू आहे.  तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकाने तुमच्याविरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या. याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ," असंही शरद पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

"मी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांनी हे करणे योग्य नाही. मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणे, तुमचे म्हणणे ऐकून घेणे चुकीचे आहे? लोकांच्या मनात काही शंका आहेत. त्याबद्दल जाणून घेणे, त्याचे निरसन करणे चुकीच आहे का?” असा सवाल शरद पवारांनी केला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत शरद पवारांवर भाष्य केलं होतं. “पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल. तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmalshiras-acमाळशिरसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस