शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

जे सांडपाणी उजनीतून उचलायच म्हणतात ते पाणीच उजनीत येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:22 IST

मंगळवारी ११ मे रोजी प्रा. बंडगर पुण्याच्या खालील बाजूस भीमा नदीवर असलेल्या कोल्हापूर ...

मंगळवारी ११ मे रोजी प्रा. बंडगर पुण्याच्या खालील बाजूस भीमा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या सहा साखळी बंधाऱ्यापैकी शेवटच्या असलेल्या पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील बंधाऱ्यावर जाऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

पुढे बोलताना बंडगर म्हणाले की, पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातून १६.५ टी. एम. सी. पाण्याचा हिशेब सांगताना मुंढव्याजवळ जुना मुठा कालव्यातून खडकवासला कॅनालमध्ये ६.५ टी. एम. सी. पाणी लाभक्षेत्रासाठी सोडले जाते असे सांगते. तसेच पुरंदर योजनेतून ४ टी. एम. सी. पाणी सोडले जाते असल्याचे सांगते.

उर्वरित ५ टी. एम. सी. सांडपाणी भीमा नदीवाटे उजनीत येते व हे पाणी उजनीतून उचलून आम्ही खडकवासला कॅनालमधे शेटफळ गडे येथे खडकवासला कालव्यात सोडून खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करणार असल्याचे सांगून सोलापूर जिल्ह्याची फसवणूक करत आहेत.

कारण जे ५ टी एम सांडपाणी पाणी उजनीत येत असल्याचे सांगितले जाते ते प्रत्यक्षात उजनीत येत नसल्याचे बंडगर यांचे म्हणणे आहे. याच स्पष्टीकरण देताना ते सांगतात की, सिद्धटेक ते पुणे दरम्यान एकूण सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे १५ ऑक्टोबरनंतर बंद केले जातात. त्यामुळे पाणी खाली येतच नाही. जागोजागी भीमेच्या तीरावर हजारो एकर शेतीसाठी हजारो शेतीपंप असून, हेच सांडपाणी दोन्ही तीरावरील शेतीला दिले जात आहे. दौंडसारख्या मोठ्या शहराला तसेच तीरावरील सर्व गावांना याच पाण्यातून पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे उजनीत १५ऑक्टोबरनंतर सांडपाणीच येत नाही. या सहा बंधारा साखळीत सध्या कसलेच पाणी नसल्याचे प्रत्यक्ष पाहणी करून आल्यानंतर बंडगर यानी सांगितले.

त्यामुळे उजनीतून मूळ सिंचन आराखड्यातूनच सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी सरकार नेणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सांडपाण्याला काय, उजनीमध्ये वेगळा कप्पा आहे की काय, असा खोचक प्रश्नही यानी केला.

सरकारला आवाहन करताना बंडगर म्हणाले की, सरकारने लोकांची दिशाभूल थांबवावी. विनाकारण संघर्ष वाढवू नये. आणखी संघर्ष समिती व सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर बैठक लावावी. चर्चेने मार्ग निघतात.

आणखी जे पाच टीएमसी सांडपाणी सरकारला इंदापूरला न्यायचे आहे ते पेठ वडगाव येथील बंधाऱ्यावर बॅरेज उभारून न्यावे. म्हणजे पुनर्वसनाचा पण प्रश्न उद्भ‌वत नाही. आणि वरील नदीकाठावरील दौंडसह सर्व घटकांना पाणी मिळेल.

मात्र उजनीतून पाणी उचलण्यास आपला विरोध आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत राहील.

फोटो ओळी :

भीमा नदीवरील पेडगाव (ता.श्रीगोंदा) येथील साखळी बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे.

---