शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जे सांडपाणी उजनीतून उचलायच म्हणतात ते पाणीच उजनीत येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:22 IST

मंगळवारी ११ मे रोजी प्रा. बंडगर पुण्याच्या खालील बाजूस भीमा नदीवर असलेल्या कोल्हापूर ...

मंगळवारी ११ मे रोजी प्रा. बंडगर पुण्याच्या खालील बाजूस भीमा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या सहा साखळी बंधाऱ्यापैकी शेवटच्या असलेल्या पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील बंधाऱ्यावर जाऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

पुढे बोलताना बंडगर म्हणाले की, पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातून १६.५ टी. एम. सी. पाण्याचा हिशेब सांगताना मुंढव्याजवळ जुना मुठा कालव्यातून खडकवासला कॅनालमध्ये ६.५ टी. एम. सी. पाणी लाभक्षेत्रासाठी सोडले जाते असे सांगते. तसेच पुरंदर योजनेतून ४ टी. एम. सी. पाणी सोडले जाते असल्याचे सांगते.

उर्वरित ५ टी. एम. सी. सांडपाणी भीमा नदीवाटे उजनीत येते व हे पाणी उजनीतून उचलून आम्ही खडकवासला कॅनालमधे शेटफळ गडे येथे खडकवासला कालव्यात सोडून खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करणार असल्याचे सांगून सोलापूर जिल्ह्याची फसवणूक करत आहेत.

कारण जे ५ टी एम सांडपाणी पाणी उजनीत येत असल्याचे सांगितले जाते ते प्रत्यक्षात उजनीत येत नसल्याचे बंडगर यांचे म्हणणे आहे. याच स्पष्टीकरण देताना ते सांगतात की, सिद्धटेक ते पुणे दरम्यान एकूण सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे १५ ऑक्टोबरनंतर बंद केले जातात. त्यामुळे पाणी खाली येतच नाही. जागोजागी भीमेच्या तीरावर हजारो एकर शेतीसाठी हजारो शेतीपंप असून, हेच सांडपाणी दोन्ही तीरावरील शेतीला दिले जात आहे. दौंडसारख्या मोठ्या शहराला तसेच तीरावरील सर्व गावांना याच पाण्यातून पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे उजनीत १५ऑक्टोबरनंतर सांडपाणीच येत नाही. या सहा बंधारा साखळीत सध्या कसलेच पाणी नसल्याचे प्रत्यक्ष पाहणी करून आल्यानंतर बंडगर यानी सांगितले.

त्यामुळे उजनीतून मूळ सिंचन आराखड्यातूनच सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी सरकार नेणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सांडपाण्याला काय, उजनीमध्ये वेगळा कप्पा आहे की काय, असा खोचक प्रश्नही यानी केला.

सरकारला आवाहन करताना बंडगर म्हणाले की, सरकारने लोकांची दिशाभूल थांबवावी. विनाकारण संघर्ष वाढवू नये. आणखी संघर्ष समिती व सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर बैठक लावावी. चर्चेने मार्ग निघतात.

आणखी जे पाच टीएमसी सांडपाणी सरकारला इंदापूरला न्यायचे आहे ते पेठ वडगाव येथील बंधाऱ्यावर बॅरेज उभारून न्यावे. म्हणजे पुनर्वसनाचा पण प्रश्न उद्भ‌वत नाही. आणि वरील नदीकाठावरील दौंडसह सर्व घटकांना पाणी मिळेल.

मात्र उजनीतून पाणी उचलण्यास आपला विरोध आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत राहील.

फोटो ओळी :

भीमा नदीवरील पेडगाव (ता.श्रीगोंदा) येथील साखळी बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे.

---