शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे उरकले आॅक्टोबरच्या पावसाने पुन्हा झोडपले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:46 IST

२५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान: खरिपाचे नुकसान तर रब्बीची पिके धोक्यात

ठळक मुद्देकाढणीला आलेल्या उडीद, मूग, सूर्यफूल, मका, बाजरी आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटलेआकडेवारी हाती आल्यावर २५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले

सोलापूर :  सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे बुधवारी पूर्ण होत असतानाच वादळी पावसाने झोडपल्याने हाती आलेल्या खरीप पिकांचे नुकसान तर पेरणी झालेली रब्बीची पीके धोक्यात आली आहेत. अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. 

सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात जिल्ह्याला पावसाने झोडपले. यामध्ये काढणीला आलेल्या उडीद, मूग, सूर्यफूल, मका, बाजरी आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी खात्यामार्फत  सुरू करण्यात आले होते. प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले होते. पण बुधवारी सर्व तालुक्यातून आकडेवारी हाती आल्यावर २५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. 

खळ्यात कुजल्या राशीसप्टेंबरमधील पिकांच्या नुकसानीची आकडेवारी जुळवत असतानाच मंगळवारी रात्रीपासून पुन्हा जिल्ह्याला पावसाने झोडपले. जिल्ह्यात संततधार कायम असून, सप्टेंबर महिन्यापेक्षा या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन शेतातच राहिले तर काढलेले धान्य खळ्यात कुजले आहे. 

शेततळी रिकामी करासंततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक तलाव भरले आहेत. त्यामुळे सांडवे मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अनेक शेतक?्यांच्या शेतात शेततळी आहेत. सततच्या पावसाने या शेततळ्यांना धोका असून, यातील पाणी शेतकºयांनी रिकामे करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

कांदा, ऊस भुईसपाटअशीच परिस्थिती मका, भुईमुगाची झाली आहे. गेल्या आठवड्यात पावसाने उसंत दिल्यावर ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीच्या उगवणीला फटका बसणार आहे. याचबरोबर शेतात पाणी साचून राहिल्याने कांदा व ऊस आडवा झाला आहे. तूर, द्राक्ष, डाळिंब, केळी, बोर, सीताफळ, भाजीपाल्यांनाही फटका बसला आहे. 

पुन्हा पंचनामे होणारसप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ही आकडेवारी शासनाला पाठविण्यात येणार आहे. आता मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मोठा फटका बसला आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर पंचनामे करण्यात येतील अशी माहिती कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीfloodपूर