शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

अंगणात गुपचूप लग्न पडलं महागात; नवरीचा भाऊ निघाला कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:41 IST

अक्कलकोट तालुक्यातील प्रकार; लग्नासाठी आलेले चाळीस जण क्वारंटाईन

ठळक मुद्देहंजगी येथील दयानंद काशिनाथ पाटील यांनी आपल्या राहत्या घरी रविवारी ३१ मेच्या भल्या पहाटे अंगणात शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकलेहंजगी गावचा नवरा तर कर्नाटकातील कपनिवर्गी (ता. इंडी, जिल्हा विजयपूर) येथील नवरी यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होतेआतापर्यंत सुमारे ४० लोकांना क्वारंटाईन केले आहे. संबंधितावर तपासाअंती कायदेशीर कारवाई होणार

अक्कलकोट : लॉकडाऊन असतानाही प्रशासनाची परवानगी न घेता एका कुटुंबाने राहत्या घरासमोरच्या अंगणात गुपचूप लग्न उरकले. त्यामध्ये कर्नाटकातून आलेल्या पाहुण्यांपैकी नवरीचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह निघाला. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणातील तब्बल ४० जणांना प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

हंजगी येथील दयानंद काशिनाथ पाटील यांनी आपल्या राहत्या घरी रविवारी ३१ मेच्या भल्या पहाटे अंगणात शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकले. हंजगी गावचा नवरा तर कर्नाटकातील कपनिवर्गी (ता. इंडी, जिल्हा विजयपूर) येथील नवरी यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. मात्र, तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये सतत वाढ होत असल्याने अखेर घरच्या घरी लग्नकार्य उरकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रविवारी पहाटे दोन्ही बाजूची पाहुणे मंडळी एकत्रित आली. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अक्षता टाकून पाहुणे जेवणावळी करून निघून गेले, अशी चर्चा आहे. याची गावातील कोरोना नियंत्रण समितीसह कोणालाच माहिती नाही. या लग्नाला हंजगी परिसरातील जेऊर, दोड्याळ यासह अनेक गावच्या पै-पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या लग्नाला उपस्थित राहिलेल्या कर्नाटकातील नवरीच्या भावाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याची माहिती अक्कलकोट तहसील प्रशासनाला मिळाली. यामुळे दोन दिवसांत ४० हून अधिक जणांना तहसीलदार अंजली मरोड यांच्या आदेशानुसार क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.

भाऊ आला होता कर्नाटकातून..- नवरीचे आई, वडील मुंबई येथे वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे ते कर्नाटकातील कपनिवर्गी (ता. इंडी, जिल्हा विजयपूर) या आपल्या मूळगावाकडे राहण्यास आले होते. ते रेड झोनमधून आल्याने त्या कुटुंबातील नवरीसह सर्वांना स्थानिक कोरोना नियंत्रण समितीने क्वारंटाईन केले होते. त्या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी नवरीसह काही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. आई, वडील व भावाचे रिपोर्ट येणे बाकी होते. त्याचा विचार न करता होम क्वारंटाईन असतानाही ते हंजगी येथे लग्नाला आले होते. दरम्यान, सोमवारी इंडी येथील प्रशासनाकडून अक्कलकोटच्या तहसीलदारांना मोबाईलद्वारे नवरीचा भाऊ पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून अलर्ट होऊन अक्कलकोट प्रशासनाने कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. 

हंजगीत विनापरवाना  एका जोडप्याचे लग्न करण्यात आले आहे. त्या ठिकाणी उपस्थितांपैकी कर्नाटकातून आलेल्यांमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा समावेश होता. म्हणून आतापर्यंत सुमारे ४० लोकांना क्वारंटाईन केले आहे. संबंधितावर तपासाअंती कायदेशीर कारवाई होणार आहे.- तुकाराम राठोड, सपोनि, दक्षिण पोलीस ठाणे,

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकmarriageलग्न