शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

शाळा म्हणजे संस्कार केंद्र...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 13:01 IST

शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे एक संस्कार केंद्र असते. मुलांची ‘पहिली शाळा’ ही ...

शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे एक संस्कार केंद्र असते. मुलांची ‘पहिली शाळा’ ही आईच असते. परंतु, ज्यावेळी मुलगा चार-पाच वर्षांचा होतो, तेव्हा प्रत्येक पालक आपल्या पाल्याचा एखाद्या चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा प्रयत्न करतात. सर्वजण चांगली शाळा शोधत असतात. परंतु, चांगली शाळा म्हणजे काय हो ? मोठी इमारत, मोठे अंगण, बगिचा, पिण्याचे पाणी एवढंच? तर नाही. या तर आवश्यक आहेतच, या सर्व सोयी असल्या तर आपण त्या शाळेला चांगली शाळा म्हणू. पण आदर्श शाळा म्हणता येणार नाही.

आदर्श शाळा ही नुसती शाळा नसून ते एक विद्यार्थी घडविण्याचे केंद्र असते. आदर्श शाळेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला, अनुभवी, प्रेमळ शिक्षक वर्ग - शिकवणारे शिक्षक आदर्श असतील तर शाळासुद्धा आदर्श बनते. आणि अशा शाळेत विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिकविण्याचे काम सुरू असते. चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास ज्या शाळेत होतो ती आदर्श शाळा ठरते. कारण फक्त शिक्षण घ्यायचे असेल तर ते कुठेही मिळते. पण विद्यार्थ्यांमधील खेळाडूवृत्ती, कला, संशोधक वृत्ती इ. बºयाच गुणांना वाव मिळवून देण्यासाठी मंच तयार करून देणे व त्यांना योग्य व्यक्तीकडून योग्य वेळी मार्गदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांकडे वेळच नाही, आपल्या पाल्यांसाठी. पालकांची मानसिकता बदललेली आहे. ते शिक्षकांवरच पूर्णपणे अवलंबून आहेत. चांगल्या शाळेत प्रवेश करूनसुद्धा कुठे ना कुठे कोचिंगसुद्धा लावतात. कोचिंग लावून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. एवढंच नव्हे तर कोचिंगच्या शिक्षकांऐवजी पुन्हा शाळेच्या शिक्षकांवरच त्यांच्या सर्व आशा असतात.

अशा सर्व परिस्थितीत केवळ पालकांना दोष देऊन चालणार नाही तर यावर तोडगा काढावा लागेल आणि हेसुद्धा शाळेचेच काम आहे; म्हणजे आदर्श शाळेचेच काम आहे. अशा स्थितीत ज्या शाळेतील शिक्षक हे शिक्षक व पालक अशी दुहेरी भूमिका निभावतात, ते शिक्षक व ती शाळा आदर्श शाळा ठरते.

योग्य शिक्षण मिळाले, सुप्त गुणांचा विकास झाला, पण विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये नसतील तर त्याचा काय फायदा? शिक्षण तर जीवन जगण्याची कला शिकविते, माणसाला माणूस बनविते़ आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस प्रगती तर करत आहे परंतु, त्याच्यामधील मानवता हळूहळू नष्ट होत आहे. स्वार्थी वृत्ती वाढत आहे. स्पर्धेच्या युगात चांगले-वाईट यातील फरक न समजून घेता प्रत्येक व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशावेळी तो दुसºयांना सोबत न घेता त्यांना खाली पाडून स्वत: पुढे कसे जाता येईल याचाच विचार करत आहे आणि हे सर्व घडत आहे ते मुलांमधील मूल्य शिक्षणाच्या अभावामुळे, म्हणून मुलांना लहानपणापासूनच मूल्य शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे आणि जी शाळा विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देण्यात यशस्वी ठरते तीच आदर्श शाळा बनते. एकंदरीत विद्यार्थ्यांना भौतिक सोयी-सुविधा देण्याबरोबर योग्य शिक्षण, योग्य संस्कार, त्यांच्यामधील सुप्त गुणांचा विकास करणारी शाळाच आदर्श शाळा ठरते.- संयोगिता सुभाष गुरुजी,(लेखिका या शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा