शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी नसणाºया ९७० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 10:14 IST

प्रणिती शिंदे यांची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून दिले निवेदन

ठळक मुद्देराज्य सरकारने या विद्यार्थ्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडलीपंधरा दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार ९७0 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत तसेच त्यांना शिष्यवृत्तीही मिळेल

सोलापूर : विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने राज्यातील ९७0 अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द न करता त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी राज्याचे शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांच्याकडे मुंबई येथे केली. याप्रकरणी विद्यार्थ्यांची बाजू न्यायालयात सरकारकडून मांडण्यात आली असून त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित न ठेवण्याची भूमिका घेण्यात येईल असे आश्वासन तावडे यांनी दिले. 

उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊनच शिक्षणाची कास धरतात; मात्र यंदा तंत्रशिक्षण संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने ९७0 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने ३१ आॅगस्ट २0१८ रोजी परिपत्रक काढले. त्यानुसार ३१आॅगस्ट २0१८ नंतर जातवैधता प्रमाणपत्र जमा न केलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात न घेताच ही कारवाई करण्यात आली. केवळ अभियांत्रिकीच नाही तर औषधनिर्माण शास्त्र, वास्तूशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, एम.आर्च, एम.ई. थेट व्दितीय वर्ष प्रवेश अशा सर्वच विद्यार्थ्यांवर जे जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करू शकलेले नाहीत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, अशी भूमिका आ. शिंदे यांनी घेतली.

 ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज सादर केला होता, त्यांना गुणवत्तेने इतर प्रवर्गातून प्रवेश मिळाला असेल तर अशा विद्यार्थ्यांना जात वैधता व आवश्यकतेनुसार क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केले नसले तरी त्यांचे प्रवेश कॅटेगरी कन्व्हर्शन शुल्क रक्कम दोनशे रुपये आकारून त्या त्या प्रवर्गातून बदल करण्याची मुभा मिळाली आहे; मात्र ३0 आॅगस्टपर्यंत ज्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करू शकलेले नाहीत त्यांना मात्र पुढील शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे.  विद्यार्थीहित लक्षात घेता या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी आ. शिंदे यांनी केली.

लवकरच निर्णय - तावडे- यासंदर्भात विनोद तावडे यांनी सांगितले की,  राज्य सरकारने या विद्यार्थ्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. पंधरा दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. ९७0 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत तसेच त्यांना शिष्यवृत्तीही मिळेल.यावेळी गणेश डोंगरे, ऐश्वर्या बिंगी, प्रणाली गुजर, कीर्ती पोतदार, आफरीद शेख, संदीप दुस्सा  आदीसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.  

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणVinod Tawdeविनोद तावडेPraniti Shindeप्रणिती शिंदे