शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

सोलापुरातील मार्कंडेय उद्यानात साकारले सावरकरांचे शिल्पचरित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:32 IST

स्मारक समितीचा उपक्रम : जयंतीदिनी शिल्पे पाहण्यासाठी सोलापूरकरांची गर्दी

ठळक मुद्देहा प्रकल्प साकारण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २५ लाख रूपयांचा निधी दिला होताया शिल्पचरित्रामध्ये सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेतमागील दोन - तीन वर्षांपासून तो परिसर सावरकर स्मारकच्या वतीने विकसित करण्यात येत आहे

यशवंत सादूल

सोलापूर : स्वातंत्र्य लढ्यात भारतमातेच्या मुक्तीसाठी आपल्या आयुष्याची तेवीस वर्षे अंदमान, रत्नागिरीसारख्या काळकोठडीत शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सोलापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मार्कंडेय उद्यान येथे विश्वनाथ बेंद्रे आणि अन्य सावरकर भक्तांच्या प्रयत्नाने त्यांचा पुतळा मे १९८६ मध्ये उभारण्यात आला. 

मागील दोन - तीन वर्षांपासून तो परिसर सावरकर स्मारकच्या वतीने विकसित करण्यात येत आहे. सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्पे साकारून स्वातंत्र्य चळवळीचा जाज्वल्य इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.

हा प्रकल्प साकारण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २५ लाख रूपयांचा निधी दिला होता. सावरकर स्मारक समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आपटे यांनी २५ लाख रूपये, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार भाई गिरकर या यांनी प्रत्येकी दहा लाख रूपये, रोहिणी तडवळ, सोलापूर महापालिका यांनी तीस लाखांचा निधी दिलेला आहे.

या शिल्पचरित्रामध्ये सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत. यामध्ये परदेशी कपड्यांची होळी ही घटना आहे. सावरकर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना विदेशी कपड्यांची होळी करण्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांची भेट घेतली. स्वातंत्र्य चळवळीत लढणाºया विविध क्षेत्रातील देशभक्तांना एकत्र करून विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली़ सावरकर व टिळक यांच्यासमोर होळीचे चित्र शिल्पातून दाखविण्यात आले आहे.

सावरकरांना पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर बोटीतून फ्रान्समार्गे अंदमानला घेऊन जाताना त्यांनी बोटीतून उडी मारून मातृभूमीला परत येण्यासाठी केलेला प्रयत्न शिल्पातून साकारण्यात आला आहे.

अंदमानमध्ये खडा बेडी, दंडा बेडी, पायात सळईने जखडून ठेवणे असे हाल ब्रिटिशांकडून होत असत. अशा परिस्थितीत असतानाही सुचलेले काव्य कागदावर उतरून ठेवत असत़ त्यालाही मनाई केली जात असे. त्यामुळे कोळशाने, सराटाच्या काड्यांनी भिंतीवर काव्य लिहून ते पाठ करून ठेवत असत़ हा प्रसंग भित्तीशिल्पातून साकारला आहे़ जेलमध्ये दररोज पंचवीस लिटर तेल काढण्याची शिक्षा दिली जात होती. नाहीतर २५ फटके मारले जात होते़ भारतमातेचा जयजयकार केला तरी फटक्यांची शिक्षा दिली जात असे़ हा करूण प्रसंग शिल्पातून दाखविला आहे.

ब्रायटनच्या समुद्र किनाºयावर फिरत असताना मातृभूमीची तीव्र आठवण झाल्याने सुचलेले अजरामर काव्य ‘सागरास’ व ‘जयोस्तुते’ यासारखे काव्य व प्रखर राष्ट्रवादी, विज्ञानवादी विचार शिल्पाच्या रूपात कोरून ठेवलेले आहेत़

प्रणाम भारतमातेस- स्वातंत्र्योत्तर  काळात भारताच्या प्रगतीमध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे योगदान लाभले अशा राजकारणी, सैन्यदल, तंत्रज्ञान, अंतराळ या व्यक्तींचे भित्तीशिल्पातून दर्शन घडविले आहे. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, अब्दुल कलाम, सर विश्वेश्वरय्या, डॉ़ होमी भाभा, लालबहादूर शास्त्री, कल्पना चावला, जनरल माणकेशॉ आदींचा समावेश आहे.

पतित पावन मंदिराची स्थापना- मागासवर्गीय व हिंदू समाजातील वैचारिक दरी दूर करून त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न सावरकरांनी केले. त्यांना मंदिरात प्रवेश देण्यासोबत रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना केली.

टॅग्स :SolapurसोलापूरVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरPrakash Javadekarप्रकाश जावडेकरVinod Tawdeविनोद तावडेchandrakant patilचंद्रकांत पाटील