शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

सांगोला विधानसभा मतदारसंघ; पक्षाने लादलेला उमेदवार आम्हास मान्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:34 PM

गणपतराव देशमुख यांनीच निवडणूक लढविण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी

ठळक मुद्देसांगोला विधानसभा मतदारसंघातून आ. गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणाकार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता थेट आ. देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन एकदा आम्ही सांगतो म्हणून तुम्हीच उभे राहावे, अशी विनंती करून त्यांनी गळ घातली

सांगोला : ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यांनी ती परत करावी व आ. गणपतराव देशमुख यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी़ कार्यकर्ते त्यांना मताधिक्क्याने निवडून देतील, असा निर्धार शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी सर्वानुमते करण्यात आला. जर त्यांनी उमेदवारी परत नाही केली तर होणाºया दुष्परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. कार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता थेट आ. देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन एकदा आम्ही सांगतो म्हणून तुम्हीच उभे राहावे, अशी विनंती करून त्यांनी गळ घातली.

सांगोला विधानसभा मतदारसंघातून आ. गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेकापचे राज्य चिटणीस आ. जयंत पाटील व आ. गणपतराव देशमुख यांनी केली़ तेव्हा पक्षाने लादलेला उमेदवार आम्हास मान्य नाही असाही सूर आळवला होता. 

दरम्यान, तालुक्यातील पुरोगामी युवक संघटना व आ. गणपतराव देशमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रविवारीच सोशल मीडियावर संभाव्य उमेदवाराविषयी नाराजी व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी पुन्हा सोमवारी मेळावा घेतला.  या मेळाव्यास इच्छुक उमेदवारांपैकी माजी झेडपी सदस्य बाबासाहेब करांडे, अ‍ॅड. सचिन देशमुख व चंद्रकांत देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, बाळासाहेब पाटील, शिवाजी बनकर, बाळासाहेब एरंडे, अ‍ॅड. मारुती ढाळे, अ‍ॅड. धनंजय मेटकरी, अजित गावडे, अनिल शिंदे, चंद्रकांत सरतापे, अंकुश येडगे, दीपक रुपनर, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक गोडसे, अशपाक शेख, सर्जेराव वाघ, संजय शिंगाडेसह निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

दबावतंत्र नसून नेतृत्वावर विश्वास- निष्ठावंतांचे हे दबावतंत्र नसून विद्यमान नेतृत्व कायम रहावे, यासाठी कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला आहे. ज्यांना आ. देशमुख यांचा वारसदार म्हणून निवडला आहे ते शेकापचे किती पिढ्यांचे कार्यकर्ते आहेत, असा सवाल उपस्थित करून आबासाहेबांनी कार्यकर्त्यांना वाºयावर सोडायला नको होते. निष्ठा दाखवण्याची हीच वेळ आहे, आबा नसतील तर मतदानाला येणार नाही, वारसदार नेमण्यापेक्षा त्यांनीच निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली़ केवळ पैशासाठी त्यांना उमेदवारी दिली आहे असा आरोप करीत त्यांनी स्वत: होऊन उमेदवारी परत नाही केली तर निष्ठावंत कार्यकर्ते निवडणुकीत काय करायचे ते ठरवतील. होणाºया दुष्परिणामाला ते स्वत: जबाबदार राहतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला़

टॅग्स :SolapurसोलापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकsangole-acसांगोल