शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र म्हणजे भाजप-शिंदे सरकारचा २०० काेटींचा जुमला, प्रशांत बाबर यांचा आराेप

By राकेश कदम | Updated: November 28, 2023 17:38 IST

बाबर म्हणाले, राज्य सरकारने २४ नाेव्हेंबर राेजी साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्यात आल्याचा आदेश काढला.

साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र हा भाजप आणि शिंदे सरकारचा २०० काेटींचा जुमला आहे. अन्न उत्कृष्टता अभियानातील प्रशिक्षण केंद्र बारामतीला जाण्यास भाजपचे साेलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार जबाबदार आहेत, असा आराेप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत गेला.

बाबर म्हणाले, राज्य सरकारने २४ नाेव्हेंबर राेजी साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्यात आल्याचा आदेश काढला. या आदेशाबाबत आम्ही कृषी अधिकारी आणि बारामतीमधील एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ( एडिटी) या महाविद्यालयाकडून माहिती घेतली. यातून अनेक गाेष्टी उघड झाल्याचे बाबर म्हणाले. 

प्रकल्पाची किंमत २०० काेटी आहे का?

राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पाैष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्याच्या महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरू केले. त्यासाठी सरकारने २०० काेटी रुपयांची तरतूद केल्याचे शासनाने १७ एप्रिल २०२३ राेजी जाहीर केले. हा निधी संपूर्ण राज्यासाठी आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी केवळ साेलापूरसाठी आहे, अशा जाहिराती केल्या. यासाठी आपण शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाचे १७ एप्रिल २०२३ चे परिपत्रक बघू शकताे. या २०० काेटींचे विवरण पाच वेगवेगळ्या याेजनांव्दारे केले जाणार आहे.१. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पाेषण अभियानातंर्गत सर्व जिल्ह्यात कामे करणे - ११० काेटी२.आत्मा याेजनेतून सर्व जिल्ह्यात कामे करणे ५ काेटी३.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पानुसार काम करणे ५ काेटी४.प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया याेजनेतून व मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया याेजना राबविणे (साेलापूर, ठाणे, नंदूरबार) - ५० काेटी रुपये५. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत साेलापूर व अन्य जिल्हे ३० काेटीअसा पध्दतीने खर्च हाेणार आहे. हा खर्च मार्च २०२४ पर्यंत करायचा आहे.

साेलापूरला नेमके किती पैसे मिळणार आहेत?

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तत प्रकल्पांतर्गत (SMART) शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पौष्टीक तृणधान्य प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल तृणधान्यांच्या मुल्यसाखळी विकासासाठी विशेष विस्तार कार्यक्रमाचे आयोजन, पायाभूत सुविधांची उभारणी, प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया उद्योग उभारणी, ब्रॅडींग, मार्केटींगच्या सूविधा उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR) हैदराबाद या संस्थेसोबत सामंजस्य करार करून सोलापूर येथे तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणा-या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांची क्षमता बांधणी करण्यासाठी "श्री अन्न (Millets) उत्कृष्टता केंद्र" स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी रूपये ३० कोटी निधी मंजूर झाला हाेता.या ३० काेटीं खर्चाचे नियाेजन लावा असे आदेश केंद्र सरकारने, राज्याच्या कृषी विभागाने, सरकारने भाजप नेत्यांना, आमदारांना, जिल्हा प्रशासनाला केली हाेती. परंतु, हे नियाेजन लावण्यात साेलापूरचे भाजप नेते अपयशी ठरले.

का वळवला निधी?

हा निधी मार्च २०२४ पर्यंत खर्च करणे आवश्यक आहे. या निधी खर्चाचे नियाेजन साेलापुरात न लागल्यामुळे बारामती येथील एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट - एडिटी या महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी लागणारी मशिनरी देण्यासाठी ३ काेटी ९१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भाजप नेत्यांनी साेलापूरला २०० काेटी रुपये मंजूर झाल्याचा कागांवा केला. आता आम्ही उघड भूमिका घेतली आहे. भाजपच्या नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्हयात ३ ते ४ काेटी रुपयांचे काम हाेउ शकलेले नाही, असा आराेपही प्रशांत बाबर यांनी केला.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस