शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सावलीही सोडणार १० मे रोजी साथ; दुपारी १२.२३ वाजता सावली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 17:24 IST

शून्य सावली दिसण्याची वेळ (१० मे दुपारी)

सोलापूर : दुपारी रस्त्याने चालताना आपली सावलीही आपल्याबरोबर चालत असल्याचा अनुभव येतो. निसर्ग आणि भूगोलातील काही शास्त्रीय घडामोडींमुळे सावलीनेही आपली साथ सोडल्याचा मे महिन्यात अनुभवता येणार आहे. सोलापुरात मंगळवारी आपली सावली गायब होणार आहे.

राज्यात ३ मेपासून २८ मेपर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा किंवा मिनिटांचा फरक असणार आहे.

महाराष्ट्रात ३ ते २८ मेपर्यंत शून्य सावली दिवस आहेत. दुपारी १२ ते १२:३० या कालावधीत शून्य सावली ही वैज्ञानिक घटना अनुभवता येईल. भारतात शेवटी मध्य प्रदेशातील भोपाळजवळून २३.५० अंशांवरून कर्कवृत्त जाते. त्यामुळे हा प्रदेश शून्य सावलीचा शेवटचा भूभाग असतो. भारतात २३.५० अंशांच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावलीचा दिवस नसतो. कारण तेथे डोक्यावर लंबरूप सूर्यकिरणे पडू शकत नाहीत. महाराष्ट्रात मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे सावली गायब झाल्याचे पाहायला मिळते.

 

----------

सावली जाते कुठे?

सूर्य डोक्यावरून जात असतो, तेव्हा उन्हातील व्यक्ती किंवा वस्तूची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. मात्र, ज्यावेळी काही क्षण ही सावली गायब होते, त्याला ‘शून्य सावली’ असे म्हणतात. सध्या उत्तरायण असल्याने कडाक्याचे ऊन पडले असून, राज्यातील विविध शहरे व ग्रामीण भागात हा अनुभव दरदिवशी घेता येणे शक्य आहे.

 

सोलापुरात मंगळवारी (दि. १०) दुपारी १२.२३ वाजता शून्य सावलीचा प्रत्यय येईल. ही खगोलीय घटना असून, विज्ञान व खगोलप्रेमींनी पाहावी. सोलापूर विज्ञान केंद्रातर्फे ही खगोलीय घटना दाखविण्यात येणार असून, याबाबतचे विश्लेषणही आम्ही करणार आहोत.

- राहुल दास, संग्रहालय अभिरक्षक, सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूर.

------

  • शून्य सावली दिसण्याची वेळ (१० मे दुपारी)
  • सोलापूर शहर १२.२३
  • मंगळवेढा १२.२४
  • सांगोला १२.२५
  • मोहोळ १२.२४
  • अक्कलकोट १२.२१
  • पंढरपूर १२.२५
  • बार्शी १२.२३
  • करमाळा १२.२५
  • माळशिरस १२.२६
  • माढा १२.२४ 
टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरण