शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकास महाकेंद्रे कार्यान्वित करावीत: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 21:05 IST

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण केल्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संताजी शिंदे-सोलापूर: कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास झाला. परंतु आता काळ बदलला आहे. शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार रोजगाराभिमुख कौशल्य विकास शिक्षणास प्राधान्य मिळाले आहे. म्हणून रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकासाची महाकेंद्रे कार्यान्वित करावीत असे प्रतिपादन संस्थेचे माजी विद्यार्थी व विद्यमान कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले. सम्राट चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण केल्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मनपाचे उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य केतनभाई शहा, उद्योजिका माधुरी पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश पवार, जैन सोशल ग्रुप सेंटरचे अध्यक्ष संजय शहा, डॉ.श्रीकांत येळेगावकर, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, डॉ. नभा काकडे, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा. उत्तमराव हुंडेकर, वसंत नागणे, काशीबाई ढेरे, मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाट, नितीन अनवेकर, विठ्ठल कस्तुरे, मल्लिकार्जुन हुंजे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. म्हणून कौशल्य विकासाची केंद्रे शिक्षणसंस्थांनी सुरू करावीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वालवडकर यांनी केले सूत्रसंचलन गजानन गोरे यांनी केले तर आभार केतनभाई शहा यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Solapurसोलापूर