शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

श्रमिक ट्रेनमधील परप्रांतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘आरपीएफ’ पोलिसांवर...!

By appasaheb.patil | Updated: May 29, 2020 13:12 IST

मध्य रेल्वे विभागात १५०० जवान तैनात; लॉकडाऊन काळातही सुरक्षा बलाच्या जवानांची अहोरात्र केली प्रवाशांची सेवा

ठळक मुद्देगरजू प्रवाशांना, कंत्राटी कामगारांना भोजन, मास्क पुरवठा करण्यासाठी दररोज सुमारे १ हजार आरपीएफ कर्मचारी तैनात सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औषधोपचाराची गरज असणाºया प्रवाशांना पुढील स्थानकात रेल्वेचे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचेही काम

सुजल पाटील 

सोलापूर : कोरोना विषाणू या साथीच्या आजाराविरुद्ध सर्व देशभर सुरू असलेल्या युद्धाच्या वेळी मध्य रेल्वेचारेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) सामाजिक जाणीव आणि प्रतिबंध या प्रत्येक बाबतीत अग्रभागी आहे. रेल्वे अधिकाºयांसमवेत खांद्याला खांदा लावून उभे असलेले आरपीएफचे कर्मचारी, श्रमिक प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी, अपघात टाळण्यासाठी, हजारो मजुरांना अन्नपुरवठा करण्याबरोबरच ३५० श्रमिक ट्रेनमधून पाच लाखांहून अधिक मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी १ हजार ५०० जवान अहोरात्र रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकावर तैनात राहून आपले कर्तव्य बजाविल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

लॉकडाऊन काळातही रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्रवाशांना मार्गदर्शन करणे, महिला व मुलांना मदत करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधी सल्लामसलत करणे व त्यांना सुरक्षित प्रवासासाठी आरपीएफ जवान लॉकडाऊन काळातही कार्यरत आहेत. कोणत्याही सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औषधोपचाराची गरज असणाºया प्रवाशांना पुढील स्थानकात रेल्वेचे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचेही काम केले आहे. 

दरम्यान, गरजू प्रवाशांना, कंत्राटी कामगारांना भोजन, मास्क पुरवठा करण्यासाठी दररोज सुमारे १ हजार आरपीएफ कर्मचारी तैनात करण्यात येत असल्याचेही मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले.  

परप्रांतीयांना घेऊन जाणाºया  गाड्यांना एस्कॉर्ट करणे, प्रवाशाने मास्क घातला की नाही यावर नजर ठेवणे, ट्रेनमध्ये आत जाताना, ट्रेनमधील प्रवासात आणि  सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन केले जाते की नाही यावर लक्ष ठेवण्याचेही काम आरपीएफ जवान करीत आहेत.  यासाठी १ हजार ५०० हून अधिक आरपीएफ जवान तैनात करण्यात आल्याचे आरपीएफने सांगितले.

३७ हजार २०० मजुरांना जेवणाचे डबेच्मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाने एकत्रित येऊन निधी संकलित केला. या जमा झालेल्या निधीतून आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात बेघर, निराधार, गरीब अशा ३७ हजार २०० लोकांना जेवणाचा डबा दिला. याशिवाय रेल्वे स्थानकावर श्रमिक ट्रेनने प्रवास करणाºया प्रवाशांच्या सुरक्षेचीही जबाबदारी ते अहोरात्र पार पाडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जवानांनी बनविले मास्क...- या संकटाच्या काळात आरपीएफच्या कर्मचाºयांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन  कोरोना आजारापासून आरपीएफच्या जवानांना वाचविण्याच्या आणि मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना पूरक ठरण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण मास्क बनविले. आतापर्यंत १३ हजार ९१९ मास्क, १ हजार ५२२ फेस शिल्ड कव्हर आणि ४३४ शिल्डो मास्क बनविले. 

आपल्या दलाचे मनोबल उंचावणे आणि त्यास धैर्याने तोंड देण्याची तयारी ठेवली आहे. दैनंदिन कामकाजावर मध्य रेल्वेचे अधिकारी पुढाकार घेऊन नियमितपणे परिस्थितीचा आढावा घेत आहेत. जवान व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मोबाईल फोन, वेब सक्षम सेवा, वेबिनार इत्यादींद्वारे संवाद साधण्यात येत आहे. -शैलेश गुप्ता,विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग 

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस