शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

रखडलेल्या तीनही राष्ट्रीय महामार्गातील अडथळे दूर

By admin | Updated: August 17, 2014 23:39 IST

केंद्रीय वन्यजीव बोर्डाकडून ग्रीन सिग्नल: विजापूर, तुळजापूर, हैदराबादकडे जाणारे महामार्ग होणार चारपदरी

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सोलापूरला अक्कलकोट-गुलबर्गा तसेच संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाची भेट मिळाली आहे़ या दौऱ्यामुळेच बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सोलापूर- विजापूर, सोलापूर- हैदराबाद तसेच सोलापूर- येडशी (तुळजापूर रोड) या महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे़ १२ आॅगस्ट रोजी केंद्रीय वन्यजीव बोर्डाने (नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड) या तीनही महामार्गांना पर्यावरण विषयक मंजुरी दिली आहे़ त्यामुळे येत्या तीन वर्षांत सोलापुरातील पाचही प्रमुख मार्ग चौपदरीकरणाच्या माध्यमातून जोडले जातील असे दिसते़सोलापूर ते पुणे हा महामार्ग आय.एल. अ‍ॅण्ड एफ.एस. या आंतरराष्ट्रीय कंपनीने पूर्ण केला़ त्याचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटनही झाले़ हे भव्यदिव्य काम पाहूनच शहराच्या प्रगतीबद्दल अनेकांनी सकारात्मक चर्चा सुरू केली़ सोलापूर ते विजापूर या कामाचे चौपदरीकरण देखील मंजूर होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला मात्र कोंडी ते हत्तूर हा बायपास माळढोक परिक्षेत्रातून जात असल्यामुळे तो रखडला होता़ सद्गुरु इंजिनिअरिंग या कंपनीने हे सुमारे ९०० कोटींचे कामही घेतले होते मात्र वेळेत पर्यावरण विषय राज्य आणि केंद्र शासनाने मंजुरी न दिल्यामुळे त्या कंपनीने आपला ठेका रद्द केला होता़ त्यामुळे पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे़ आता पर्यावरणविषयक मंजुरी मिळाल्यामुळे बायपाससह विजापूररोडचे चौपदरीकरण होण्यातील अडथळा दूर झाला आहे़ लवकरच या कामाचा ठेका निश्चित केला जाणार आहे़सोलापूर ते येडशी मार्गावर देखील रामलिंगजवळ वनखात्याच्या जागेतून ६ किलोमीटर रस्ता जातो तोही मंजुरीविना रखडला होता़ सोलापूर ते संगारेड्डी या ९२३ कोटींच्या कामाचा ठेका कोस्टल श्रेयी कंपनीला मिळाला असून, हा रस्ता देखील १० किलोमीटर वनखात्याच्या हद्दीतून जातो त्यामुळे या तीनही मार्गावरील वनखात्याने रस्ता करण्यास पंतप्रधान येण्यापूर्वी अवघे चार दिवस अगोदर मंजुरी दिली आहे़ केंद्रीय रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोलापूर-अक्कलकोट- गाणगापूर- गुलबर्गा या मार्गाचे आणि पालखी मार्गाचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण करण्याची घोषणा केल्यामुळे दळणवळणासाठी अच्छे दिन येतील असे चित्र निर्माण झाले आहे़कोंडी ते हत्तूर हा बायपास विजापूर रोडच्या चौपदरीकरणाच्या कामात समाविष्ट आहे मात्र बोरामणी ते हत्तूर हा बायपास झाला तरच तुळजापूर आणि हैदराबादहून येणारी आणि विजापूरकडे जाणाऱ्या जड वाहनांना चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो यासाठी या बायपासकडे देखील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे़ ---------------------------------नॅशनल लाईफ बोर्डाची मंजुरीसोलापूर-विजापूर महामार्गातील कोंडीपासूनचा २२ किमीचा बायपास रोड, सोलापूर-हैदराबाद मार्गावरील १० किमीचा रोड तसेच सोलापूर-येडशी मार्गावरील ६ किमीचा रोड हा वन्यजीव परिक्षेत्रातून जात आहे़ त्याला केंद्राची मंजुरी मिळणे गरजेचे होते़ आता या तीनही ठिकाणचे पर्यावरण विषयक मंजूऱ्या मिळाल्या आहेत़ माळढोक परिक्षेत्रामुळे तसेच वनखात्यामुळे या तीन महामार्गाचे काम पुढे सरकत नव्हते़ नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाने याला मंजुरी दिल्यामुळे ही तीनही कामे लवकरच सुरू होतील़- बी़बी़ इखे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण