शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

शेतकऱ्यांची वीज तोडाल तर याद राखा; रघुनाथदादा पाटलांचा महावितरणला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 12:24 IST

शेतकऱ्यांनी वीजतोडणीस विरोध करावा, अन्यथा आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले.

सोलापूर : महाराष्ट्रातील शेतकरी महावितरणचे देणे लागत नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे महावितरणकडे शिल्लक आहेत. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने त्यांचे डीपी बंद होत आहेत. परिणामी त्यांना प्रति एच.पी १००० रुपये प्रमाणे रक्कम भरून ही कनेक्शन चालू होत नाहीत. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेची भूमिका कर कर्जा नहीं देंगे ! बिजली का बिल भी नही देंगे ! समजावून घेऊन आपली कनेक्शन तोडणी थांबवावे. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश हा शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे . सरकारने महावितरणला  वेळोवेळी दिलेली अनुदाने तेवढ्या रकमेची वीज महावितरण कडून शेतकऱ्यांना मिळाली नाही. शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार करून आपली विना परवानगी, विना नोटीस, वीज तोडणीस विरोध करावा. जर अशा प्रकारची बेकायदेशीर कारवाई होत असेल तर शेतकरी संघटनेशी संपर्क साधून. शेतकरी संघटनेकडून जशास तसे उत्तर महावितरणला दिले जाईल असा इशारा शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी महावितरणला दिला आहे. 

पुढे बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी प्रतिटन दहा रुपये कपातच्या शासन निर्णयाला शेतकरी संघटनेचा विरोध आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दि.६ जानेवारी २०२२ रोजी काढलेला शासन निर्णय हा गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळास शेतकऱ्यांच्या उसातून प्रतिटन दहा रुपये कपात केली जाणार आहे. या शासन निर्णयाला शेतकरी संघटनेचा विरोध असून सरकारने या महामंडळास स्वतः मदत करावी. ज्या प्रकारे सरकार आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, आण्णाभाऊ साठे महामंडळ, बार्टी इत्यादी महामंडळास मदत करते. त्याचप्रकारे याही महामंडळाला मदत करावी. सदर या कपातीस व शासन निर्णयाला शेतकरी संघटनेचा विरोध. 

जिल्ह्यातील उसाचे उत्पादन वाढले असले तरी अनेक कारखाने व कार्यक्षमतेने बंद पडले आहेत. अंतराच्या अटीवर कारखाने निघाल्यामुळे ज्या भागात ऊस आहे त्या भागात कारखाना नाही, आणि ज्या भागात कारखाना आहे त्या भागात ऊस नाही. तरी सरकारने दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट घातली आहे. ती ताबडतोब रद्द करावी. ज्याला जिथे कारखाना काढावयाचा आहे त्या ठिकाणी काढण्याची परवानगी द्यावी असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.

चालू गळीत हंगाम अर्ध्यावर आला असला तरी अजून बहुतांशी ऊस शिल्लक आहे. तोडीसाठी मजुरांना, मुकादम, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना पैसे,जेवण, दारूपार्ट्या यातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हायची असेल तर केंद्रीय साखर आयुक्त तुटेजा,नाबार्डचे तत्कालीन अध्यक्ष यशवंतराव थोरात आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आर्थिक सल्लागार, माजी गव्हर्नर सी रंगराजन यांनी सांगितलेल्या दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट कायमची रद्द व्हावी. तरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गुजरात,उत्तर प्रदेश धर्तीवर दर मिळतील.  नवीन केंद्र सरकारच्या इथेनॉल बाबतच्या धोरणात अंतराची अट घालून महाराष्ट्र सरकार अडथळे आणत आहेत. उसापासून इथेनॉल करण्याच्या कारखान्यांना ही ऊस गाळप करणे आवश्यक आहे. तसेच दोन इथेनॉल कारखान्यामध्ये अंतराची अट असता कामा नये तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशीही मागणी पाटील यांनी यावेळी केली. 

पंतप्रधान पिक विमा योजना अपयशी ठरली असून केवळ कंपन्यांना मलिदा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी कंपन्यांना पैसे देणे ऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६००० रुपये देत आहे. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. विमा कंपन्यांची तिजोरी भरण्याची सरकारने शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६०,००० रुपये अशी मदत करावी. तरच शेतकरी आत्महत्या थांबतील. वरील गोष्टींची सरकारने अंमलबजावणी केली तर शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसून जाईल असेही पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाmahavitaranमहावितरणagricultureशेती