एमआरईजीएसच्या कामाला लाल फुली प्रशासनाचा नाकर्तेपणा;
By Admin | Updated: May 9, 2014 00:29 IST2014-05-08T19:45:26+5:302014-05-09T00:29:53+5:30
मागणी नसल्याचे सांगितले जाते कारण

एमआरईजीएसच्या कामाला लाल फुली प्रशासनाचा नाकर्तेपणा;
सोलापूर :
एमआरईजीएसमधून यावर्षी गांडूळ खतनिर्मिती, शेततळे व सिमेंट नालाबांधची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील सांगत असताना मागील दोन वर्षांपासूनच ही कामे प्रस्तावित असली तरी मागणीच नसल्याचे जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी स्पष्ट केले आहे. शेतकर्यांसाठी काहीच करायचे नाही?, असा पवित्रा प्रशासन व पदाधिकार्यांनी घेतल्याचा हा परिणाम आहे.
सध्या जिल्ाला रस्त्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. गावोगावी पाणंद रस्त्याची मागणी आहे. पदाधिकारी व प्रशासनाने गावोगावच्या रस्त्यांची कामे हाती घेण्याची मागणी आहे. अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी त्या शेतकर्यांची तयारी नाही. त्या मोबदल्यात मागणी असलेल्या गावात नव्याने विहिरींचे प्रस्ताव मंजूर करण्याचीही शेतकर्यांची मागणी आहे. याशिवाय जनावरांसाठी गोठा, गांडूळ खतनिर्मितीच्या कामांची मागणी आहे. ही मागणी असताना जिल्हा परिषद व यंत्रणेकडे कसलेच नियोजन नाही. रोहयोच्या उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी गांडूळ खतनिर्मिती, शेततळी व सिमेंट नालाबांधाची कामे यावर्षी घेणार असल्याचे बुधवारी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी यांनी एम.आर.ई.जी.एस. मधून शेततळ्यांची कामे घेण्यासाठी शेतकर्यांची मागणीच नाही, परंतु राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेततळे होऊ शकतात, असे सांगितले. एम.आर.ई.जी.एस. मधून सध्या कोणत्याच कामाची मागणी नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी सांगितले.
-------------------------------------
लोकांनी शेततळे व फलोत्पादनासाठी कृषी खात्याकडे मागणी नोंदवावी. एन.एच.एम.(राष्ट्रीय फलोत्पादन अभियान) मधून शेततळ्याला मागणी आहे़ एम.आर.ई.जी.एस.मधून शेततळे करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. गांडूळ खताची मागणी कोणी केली तर विचार करु.
रफिक नाईकवाडी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
------------------------------------
पाणंद रस्ते, जनावरांचा गोठा, खतनिर्मिती प्रकल्प ही कामे दोन वर्षांपासून प्रस्तावित आहेत. मागणीच नसल्याने ही कामे हाती घेऊ शकलो़ गावागावांतून विहिरींच्या कामांची मागणी आहे. मागणीप्रमाणे रस्त्यांची कामे सुरू आहेत.
मनीषा देसाई
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
------------------------------------
महसूलने कामे करणार्यांना लटकावले
एम.आर.ई.जी.एस. ही योजना केवळ विहिरींच्या कामामुळे जिल्ातील गावोगावी पोहोचली. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने विहिरींची कामे केल्यानेच अनेक कुटुंबांची शेती बागायती झाली आहे. परंतु पैशाच्या मागणीच्या, तांत्रिक बाबीवर बोट ठेवत महसूल खात्याने जि.प. ग्रामपंचायत विभागाला अडचणीत आणले. त्यामुळे आज जि.प.ची यंत्रणाही कामे करण्यास तयार नाही.