शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाचा सविस्तर; कोणत्या कारणामुळे सोलापुरातील मंगल कार्यालयास मिळेना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:17 IST

तोंडाने वाद्य वाजवणारे वाजंत्री मास्कचा कसा वापर करतील; महसूल विभाग करीत आहे गांभीर्याने अभ्यास

ठळक मुद्देलग्नकार्य म्हंटले की अजून वाजंत्री आलेच. लग्नासाठी ५० व्यक्तींना परवानगी दिलीफिजिकल डिस्टन्स सॅनिटायझर  व मास्कचा वापर करण्याच्या अटीवर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली हॉटेल वगळता बाजारपेठेतील विविध प्रकारची दुकाने सुरू झाली आहेत

सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आदेश देऊन सुद्धा मंगल कार्यालयाला परवानगी देण्याचे काम अडले आहे, ही परवानगी देताना वाजंत्रीना मास्क वापरण्याची अट कशी घालायची असा अधिकाºयांना प्रश्न पडला आहे.

राज्यात एक जूनपासून टाळेबंदीच्या अटी शिथिल करून विविध व्यवसायांना फिजिकल डिस्टन्स सॅनिटायझर  व मास्कचा वापर करण्याच्या अटीवर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे हॉटेल वगळता बाजारपेठेतील विविध प्रकारची दुकाने सुरू झाली आहेत. प्रशासनाने ५० व्यक्तींचे उपस्थित लग्नकायार्साठी परवानगी दिली आहे. लग्नकार्य व सर्व व्यापार सुरु झाल्याने मंगल कार्यालय व सलून व्यवसायिकांनीही व्यवसायाला परवानगी द्यावी म्हणून आग्रह धरला आहे. पालकमंत्री धरणे यांनी ही मंगल कार्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगल कार्यालय इतर ठिकाणी कशा पद्धतीने परवाने देण्यात आले याचा अभ्यास करण्याच्या अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर अधिकाºयांनी मंगल कार्यालयासाठी कोणत्या अटी घालायच्या याचा अभ्यास सुरु केला आहे.

लग्नकार्य म्हंटले की अजून वाजंत्री आलेच. लग्नासाठी ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. मग यात वाजंत्री गृहीत धरायचे का? तोंडाने वाद्य वाजवणारे वाजंत्री मास्कचा कसा वापर करतील. त्यांना सवलत देण्यासाठी नियमात तरतूद आहे का? तशी सवलत दिली तर विषाणूचा संसर्ग होणार नाही ना? याबाबत माहिती घेतली जात आहे. वाजंत्रीचा त्यांच्या वाद्य वाजविण्याच्या व्यवसायावर चरितार्थ चालतो, त्यामुळे त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी म्हटले आहे. या अडचणीमुळे तुर्तास मंगल कार्यालयास परवानगी देण्याचा विषय लांबला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न