लोकशाही दिनात तक्रारींचा पाऊस

By Admin | Updated: May 6, 2014 17:37 IST2014-05-05T22:19:02+5:302014-05-06T17:37:08+5:30

६२ निवेदने; गारपीटच्या तक्रारींचाही समावेश

Rainfall complaints on democracy day | लोकशाही दिनात तक्रारींचा पाऊस

लोकशाही दिनात तक्रारींचा पाऊस

६२ निवेदने; गारपीटच्या तक्रारींचाही समावेश
फोटो-मिलींद
सोलापूर: लोकसभा निवडणूक आचारसंहितेनंतरच्या लोकशाही दिनात पाच तक्रारींची सुनावणी झाली. सोमवारच्या लोकशाही दिनात ६२ निवेदने आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले. गारपीट पीक नुकसान मिळाले नसल्याच्या दोन गावातून तक्रारी आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन झाला. सकाळी ११ नंतर लोकांची एकच गर्दी झाली. निवेदनाची संख्या तब्बल ६२ इतकी झाली. त्यात महसूलच्या ९, जिल्हा परिषदेच्या ८, जिल्हा पुरवठा व पुनर्वसन शाखेच्या प्रत्येकी ७, जिल्हा उपनिबंधक, दुय्यम चिटणीस, अधीक्षक अभियंता पाटबंधारे खात्याच्या प्रत्येकी चार तर अन्य खात्याच्याही तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. लोकशाही दिनात गारपीट नुकसानीची रक्कम मिळाली नसल्याच्या दोन गावातील तक्रारी आहेत. बार्शीच्या सुशीलकुमार पाटील यांनी बार्शी शहरातील बेकायदा बांधकाम व ऐनापूर रोडवरील मुतारी पाडण्यात आल्याने कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. वाफेगावच्या दादासाहेब गाडे यांनी जमीन पूरग्रस्तांना न देता वाटप केल्याचा तहसीलच्या कर्मचार्‍यांनी उतारा तयार केल्याचा व शासनाची फसवणूक केल्याचा तक्रारी अर्ज दिला आहे.
अवघ्या तीन तक्रारींसाठी...
सुनावणीसाठी अवघ्या पाचच तक्रारी होत्या. त्यापैकी दोनच निकाली काढण्यात आल्या. या तक्रारींच्या सुनावणीसाठी जिल्‘ातील सर्वच खात्याचे प्रमुख अधिकारी सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत कार्यालयात बसून होते. ज्या दोन तक्रारींचा निकाल दिला त्यापैकी दोन तक्रारी एकाच व्यक्तीच्या व सात-बारा उतार्‍यावर नोंद लावण्याचा होत्या. तीन तक्रारींचा निर्णय झाला नाही परंतु दोन तक्रारींच्या सुनावणीसाठी जिल्‘ातील सर्वच कार्यालयाचे अधिकारी ठाण मांडून बसले होते.

Web Title: Rainfall complaints on democracy day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.