शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पुण्याचं सांडपाणी ‘खडकवासला’तून उचला, उजनी जलाशय मात्र प्रदूषणमुक्त ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 15:09 IST

मोहिते-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘उजनी’च्या वापरकर्त्यांवर अन्याय होऊ नये

सोलापूर : सोलापूर जिल्हा अवर्षणग्रस्त असून, जिल्ह्यातील ९७ टक्के लोक शेतीवर व ३ टक्के लोक उद्योगांवर अवलंबून आहेत. भीमा खोरे हे पाण्यासाठी तुटीचे खोरे आहे. उजनी धरणावरील लाभधारक व वापरकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी पुण्याचं सांडपाणी खडकवासला कॅनॉलमधून उचलून उजनी जलाशय प्रदूषणमुक्त ठेवावे, असे आवाहन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

आमदार मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात सविस्तर पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी नमूद केले आहे की, उजनी धरणाचे ८४.३४ टी.एम.सी. पाणी वापराचे नियोजन झाले आहे. उजनी धरणावर १० उपसा सिंचन योजना असून, त्याचा एकूण पाणी वापर २१.७७ टी.एम.सी. असून, अद्याप त्यापैकी काही योजना कार्यान्वित न झाल्याने फक्त ७ ते ८ टी.एम.सी. पाणी वापर होतो. उर्वरित उपसा सिंचन योजनेची कामे प्रगतिपथावर असून, राहिलेल्या योजनांचे अंदाजे १३ ते १४ टी.एम.सी शिल्लक पाण्याचा वापर होत असतानासुद्धा सध्या उजनी धरणावरील लाभधारकांना याचा तुटवडा जाणवत आहे.

मोहिते-पाटील म्हणतात की, उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे नवा मुठा उजवा कालव्यामध्ये पाणी टाकून खडकवासला प्रकल्याचे स्थिरीकरण करण्याबाबत ५ टी.एम.सी. पाणी उचलण्यास तत्त्वतः मान्यता देताना उजनी धरणावर अवलंबून असलेल्या लाभक्षेत्र व वापरकर्त्यांवर याचा काय परिणाम होईल, याबाबत जलसंपदा विभागाने अभ्यास केल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता सदर योजनेसाठी पाणी उपलब्ध होत असेल तर पाणीसाठा पुण्याजवळ करून तेथेच प्रक्रिया करून खडकवासला कॅनॉलमध्ये सोडून सिंचनाला दिल्यास खडकवासला कालव्याचे स्थिरीकरण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर उजनीत येणारे दूषित पाणी बंद होऊन उजनी जलाशय प्रदूषणमुक्त होईल.

भीमा खोरे हे तुटीचे असल्याने पाणी उपलब्धता कमी व पाणी मागणी जास्त आहे, तसेच उजनीवर असणाऱ्या अतिरिक्त मागण्यांची उणीव भरून काढणे आवश्यक आहे. शेती व्यवसाय, उद्योगधंद्यांवर परिणाम होऊ नये व सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद व बीड या ६ जिल्ह्यांतीत ३१ तालुक्यांतील ५ लाख ५० हजार २९० हेक्टर सिंचनास पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस सन २००४ साली शासनाने मान्यता दिलेली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना तत्काळ पूर्ण करण्यासाठी हाती घ्यावी.

पुणे जिल्ह्यामध्ये भीमा खोऱ्यामध्ये मावळ व मुळशी तालुक्यामध्ये बांधलेल्या धरणातून साधारणपणे ४७ टी.एम.सी. पाणी टाटा प्रकल्पास वीजनिर्मितीसाठी वापरून ते पाणी घाटातून पश्चिमेकडे वळविल्यामुळे भीमा खोऱ्यात येत नाही. त्यामुळे भीमा खोऱ्यातील लाभधारक शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. सदरचे पाणी भीमा खोऱ्यात आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सांडपाण्याची मोजदादच नाही!

पुणे व पिंपरी चिंचवड शहराला होत असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पुरवठा करतेवेळी जलसंपदा विभागाबरोबर झालेले करार, भीमा नदीकाठावरील लाभधारक उचलत असलेले पाणी व पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये वापरत असलेले पाणी लक्षात घेता पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतून येणारे सांडपाणी उजनी जलाशयात पोहोचत असेल, असे वाटत नाही. त्यामुळेच भीमा नदीवरील दौंडपर्यंतचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे १५ ऑक्टोबरनंतर वरच्या बाजूस असलेल्या धरणाच्या पाणी साठ्यातून सोडून भरावे लागतात. हे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे सांडपाण्याची मोजदाद करण्याची यंत्रणा शासनाने केलेली दिसून येत नाही. याचा अर्थ किती सांडपाणी नदीमध्ये उपलब्ध होते, याची निश्चित आकडेवारी जलसंपदा विभागाकडे नाही, हे सिद्ध असल्याचे आमदार मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केेले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपातVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलUjine Damउजनी धरण