शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचं सांडपाणी ‘खडकवासला’तून उचला, उजनी जलाशय मात्र प्रदूषणमुक्त ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 15:09 IST

मोहिते-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘उजनी’च्या वापरकर्त्यांवर अन्याय होऊ नये

सोलापूर : सोलापूर जिल्हा अवर्षणग्रस्त असून, जिल्ह्यातील ९७ टक्के लोक शेतीवर व ३ टक्के लोक उद्योगांवर अवलंबून आहेत. भीमा खोरे हे पाण्यासाठी तुटीचे खोरे आहे. उजनी धरणावरील लाभधारक व वापरकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी पुण्याचं सांडपाणी खडकवासला कॅनॉलमधून उचलून उजनी जलाशय प्रदूषणमुक्त ठेवावे, असे आवाहन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

आमदार मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात सविस्तर पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी नमूद केले आहे की, उजनी धरणाचे ८४.३४ टी.एम.सी. पाणी वापराचे नियोजन झाले आहे. उजनी धरणावर १० उपसा सिंचन योजना असून, त्याचा एकूण पाणी वापर २१.७७ टी.एम.सी. असून, अद्याप त्यापैकी काही योजना कार्यान्वित न झाल्याने फक्त ७ ते ८ टी.एम.सी. पाणी वापर होतो. उर्वरित उपसा सिंचन योजनेची कामे प्रगतिपथावर असून, राहिलेल्या योजनांचे अंदाजे १३ ते १४ टी.एम.सी शिल्लक पाण्याचा वापर होत असतानासुद्धा सध्या उजनी धरणावरील लाभधारकांना याचा तुटवडा जाणवत आहे.

मोहिते-पाटील म्हणतात की, उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे नवा मुठा उजवा कालव्यामध्ये पाणी टाकून खडकवासला प्रकल्याचे स्थिरीकरण करण्याबाबत ५ टी.एम.सी. पाणी उचलण्यास तत्त्वतः मान्यता देताना उजनी धरणावर अवलंबून असलेल्या लाभक्षेत्र व वापरकर्त्यांवर याचा काय परिणाम होईल, याबाबत जलसंपदा विभागाने अभ्यास केल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता सदर योजनेसाठी पाणी उपलब्ध होत असेल तर पाणीसाठा पुण्याजवळ करून तेथेच प्रक्रिया करून खडकवासला कॅनॉलमध्ये सोडून सिंचनाला दिल्यास खडकवासला कालव्याचे स्थिरीकरण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर उजनीत येणारे दूषित पाणी बंद होऊन उजनी जलाशय प्रदूषणमुक्त होईल.

भीमा खोरे हे तुटीचे असल्याने पाणी उपलब्धता कमी व पाणी मागणी जास्त आहे, तसेच उजनीवर असणाऱ्या अतिरिक्त मागण्यांची उणीव भरून काढणे आवश्यक आहे. शेती व्यवसाय, उद्योगधंद्यांवर परिणाम होऊ नये व सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद व बीड या ६ जिल्ह्यांतीत ३१ तालुक्यांतील ५ लाख ५० हजार २९० हेक्टर सिंचनास पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस सन २००४ साली शासनाने मान्यता दिलेली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना तत्काळ पूर्ण करण्यासाठी हाती घ्यावी.

पुणे जिल्ह्यामध्ये भीमा खोऱ्यामध्ये मावळ व मुळशी तालुक्यामध्ये बांधलेल्या धरणातून साधारणपणे ४७ टी.एम.सी. पाणी टाटा प्रकल्पास वीजनिर्मितीसाठी वापरून ते पाणी घाटातून पश्चिमेकडे वळविल्यामुळे भीमा खोऱ्यात येत नाही. त्यामुळे भीमा खोऱ्यातील लाभधारक शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. सदरचे पाणी भीमा खोऱ्यात आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सांडपाण्याची मोजदादच नाही!

पुणे व पिंपरी चिंचवड शहराला होत असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पुरवठा करतेवेळी जलसंपदा विभागाबरोबर झालेले करार, भीमा नदीकाठावरील लाभधारक उचलत असलेले पाणी व पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये वापरत असलेले पाणी लक्षात घेता पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतून येणारे सांडपाणी उजनी जलाशयात पोहोचत असेल, असे वाटत नाही. त्यामुळेच भीमा नदीवरील दौंडपर्यंतचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे १५ ऑक्टोबरनंतर वरच्या बाजूस असलेल्या धरणाच्या पाणी साठ्यातून सोडून भरावे लागतात. हे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे सांडपाण्याची मोजदाद करण्याची यंत्रणा शासनाने केलेली दिसून येत नाही. याचा अर्थ किती सांडपाणी नदीमध्ये उपलब्ध होते, याची निश्चित आकडेवारी जलसंपदा विभागाकडे नाही, हे सिद्ध असल्याचे आमदार मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केेले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपातVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलUjine Damउजनी धरण