शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

सातारा, सांगली, सोलापुरातील पाणी वाटपाची माहिती द्या

By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST

टेंभू योजना : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची ‘जलसंपदा’ ला नोटीस

सातारा : ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील पाणी वाटपाची सद्य:स्थिती काय आहे?, याबाबतची विचारणा करणारी नोटीस राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला धाडली आहे,’ अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. येळगावकर म्हणाले, ‘आघाडी शासनाने माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांना तहानेनं व्याकूळ ठेवून अन्याय केला आहे, या शासनाचं काळेबेरं लवकरच बाहेर काढणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडेही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दि. ५ आॅगस्ट रोजी सुनावणी झाली. शासनाच्या वतीने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर. व्ही. पानसे हे सुनावणीसाठी हजर होते. प्राधिकरणाने दि. २० पर्यंत सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील किती गावांना टेंभू योजनेचा लाभ मिळणार आहे?, दुसऱ्या पाणी योजनेचा किती गावांना लाभ मिळाला?, ज्या गावांना पाणी योजनांचा लाभ मिळणार नाही, अशा गावांची नावे आणि त्यांना पाणी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना, यांची माहिती मागितली आहे.’डॉ. येळगावकर पुढे म्हणाले,‘या योजनेच्या माध्यमातून ८० हजार ४७२ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील केवळ ६०० हेक्टर जमिनीलाच याचा लाभ मिळणार आहे. बाकीचे पाणी जिल्ह्याबाहेर पळविण्यात आले आहे. राज्य शासनाने जलनीतीचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे.’ (प्रतिनिधी)