शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या २८८ जागा लढविणार-प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 06:24 IST

वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या राज्यातील सर्व २८८ जागा लढविणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सांगितले.

सोलापूर : वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या राज्यातील सर्व २८८ जागा लढविणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सांगितले.भाजपला बहुमत न मिळाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. अशावेळी तिसरी आघाडी सत्तेत यावी यासाठी आम्ही प्रयत्न करु. राहुल गांधी की मायावती? असा मुद्दा आला तर आम्ही मायावतींना पाठिंबा देऊ. शरद पवारांचा विषय आलाच तर त्यांना विरोध करु,असेही आंबेडकर यांनी सांगितले.दुष्काळी दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही राजकीय विचारांची लढाई आहे. मोदींनी त्याला वैयक्तिक पातळीवर आणून ठेवली आहे. निवडणुकीचा तिसरा आणि चौथा टप्पा संपल्यानंतर त्यांना बिकट परिस्थितीचा अंदाज आला आहे. लोकसभा निवडणुकीत सध्या गृहित धरण्यात येणारे सगळे अंदाज चुकून धक्कादायक निकाल लागतील. ही लढाई आपल्या हातून गेल्याचा अंदाज आल्यामुळे ते वैयक्तिक टीका करू लागले आहेत. लोकसभा निवडणूक लढविताना आम्ही विधानसभेचा निर्णय पक्का केला होता. विधानसभेला काँग्रेससोबत आघाडीचा अजिबात विचार नाही. प्रस्ताव आला तरी विचार होणार नाही. वंचित बहुजन आघाडी सर्व २८८ जागा लढविणार आहे.आंबेडकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. लोकसभा निवडणुकीच्या नादात भाजप आणि शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागाकडे दुर्लक्ष केले आहे. दुष्काळासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर