शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

खुल्या भरतीतील अटी रद्द करत डाकसेवक बनले मुंबईचे पोस्टमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:22 IST

दीड वर्षाची लढाईला मिळाले यश;  राज्यातल्या १५२ डाकसेवकांनाही खात्यात सामावून घेतले

ठळक मुद्देखुल्या भरतीतील अटी रद्द करायला भाग पाडल्याने राज्यभरातील १५२ ग्रामीण डाकसेवक आता मुंबईत पोस्टमन म्हणून दाखल झाले ग्रामीण डाकसेवकावर अन्याय करणारा नियम पोस्टमनसाठी आणला गेला होता़ दहा-दहा वर्षे सेवा करणाºया सेवकाला संधीच नव्हती़

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : खुल्या भरतीसाठी लावलेल्या नियमाविरोधात दीड वर्षांपासून लढा देऊन ग्रामीण पोस्टमन संघटनेने अटीच रद्द करायला लावल्या़ तसेच मुंबईतल्या रिक्त जागांवर खात्यांतर्गत काम करणाºया ग्रामीण डाकसेवकांना संधी देण्यास भाग पाडले आहे़ मागील महिन्यात पंढरपूर विभागातून दोन तर सोलापूर शहर विभागातील तीन ग्रामीण डाकसेवकांनी मुंबईचे पोस्टमन म्हणून काम करण्याची संधी मिळवली आहे.

काही दिवसांपूर्वी पोस्टामध्ये खुली नोकरभरती सुरू करण्यात आली़ दहावी उत्तीर्ण झालेले खात्यांतर्गत कर्मचारी हे डाकसेवक म्हणून काम करायला लागले़ दहावी इयत्तेवर सेवेत दाखल झालेल्यांना पुढे पोस्टमन म्हणून संधी नव्हती़ मात्र खुल्या भरतीमध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला वाहन परवाना आणि एमएस-सीआयटीची पात्रता लावून कोणत्याही शहरातील उमेदवाराला चक्क पोस्टमन पदावर संधी दिली.

 दुजाभाव करणारा नियम ग्रामीण डाकसेवकांना भेडसावू लागला़ आॅल इंडिया पोस्टमन एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण चाळके यांच्या नेतृत्वाखाली सेके्रटरी राजेश सागर आणि ग्रामीण डाकसेवक राजकुमार आतकरे यांनी मुंबईचे संचालक व्यवहारे आणि दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला़ ‘खुल्या भरतीत उमेदवारांना लावलेल्या अटी रद्द करा आणि खात्यांतर्गत जुन्या पद्धतीच्या अटी लागू करा’ हा एकच मुद्दा घेऊन पाठपुरावा चालवला़ खुल्या भरतीमुळे खात्यांतर्गत ग्रामीण डाकसेवकांवर अन्याय व्हायचा आणि त्यांना पुढे संधी मिळत नव्हती.

अन् मार्चमधील परीक्षा पुढे ढकलली- खुल्या भरतीत लावलेल्या नियम-अटी रद्द झाल्या़ तत्पूर्वी मार्चमध्ये पोस्टमनसाठी होणाºया परीक्षार्थींपैकी जे पात्र ठरले होते त्यांना थांबवत ही परीक्षाच पुढे ढकलायला लावली़ आता ही भरती खात्यांतर्गत होणार असल्याचे ग्रामीण डाकसेवक संघटनेकडून सांगितले जाते़ तसेच आता ग्रामीण डाकसेवकही संगणक प्रशिक्षण घेऊन पोस्टमन होऊ शकतात़ 

मुंबईचे पोस्टमन झालेले ग्रामीण डाकसेवक- पंढरपूर विभाग - पांडुरंग सुरेश काळे (बिटरगाव), संजय देवकुळे (नातेपुते)सोलापूर विभाग - आरशिया जहागीरदार (सय्यद वरवडे), मुल्ला (होनमुर्गी), रत्नाबाई अचलेरे (शिंगडगाव).

ग्रामीण डाकसेवकावर अन्याय करणारा नियम पोस्टमनसाठी आणला गेला होता़ दहा-दहा वर्षे सेवा करणाºया सेवकाला संधीच नव्हती़. खुल्या भरतीतील अटी रद्द करायला भाग पाडल्याने राज्यभरातील १५२ ग्रामीण डाकसेवक आता मुंबईत पोस्टमन म्हणून दाखल झाले आहेत़ तसेच सोलापूर आणि पंढरपूर विभागातून पाच जणांनाही त्यामध्ये संधी मिळाली आहे़ - राजकुमार आतकरे सचिव, ग्रामीण डाकसेवक 

टॅग्स :SolapurसोलापूरPost Officeपोस्ट ऑफिसMumbaiमुंबई