शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

खुल्या भरतीतील अटी रद्द करत डाकसेवक बनले मुंबईचे पोस्टमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:22 IST

दीड वर्षाची लढाईला मिळाले यश;  राज्यातल्या १५२ डाकसेवकांनाही खात्यात सामावून घेतले

ठळक मुद्देखुल्या भरतीतील अटी रद्द करायला भाग पाडल्याने राज्यभरातील १५२ ग्रामीण डाकसेवक आता मुंबईत पोस्टमन म्हणून दाखल झाले ग्रामीण डाकसेवकावर अन्याय करणारा नियम पोस्टमनसाठी आणला गेला होता़ दहा-दहा वर्षे सेवा करणाºया सेवकाला संधीच नव्हती़

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : खुल्या भरतीसाठी लावलेल्या नियमाविरोधात दीड वर्षांपासून लढा देऊन ग्रामीण पोस्टमन संघटनेने अटीच रद्द करायला लावल्या़ तसेच मुंबईतल्या रिक्त जागांवर खात्यांतर्गत काम करणाºया ग्रामीण डाकसेवकांना संधी देण्यास भाग पाडले आहे़ मागील महिन्यात पंढरपूर विभागातून दोन तर सोलापूर शहर विभागातील तीन ग्रामीण डाकसेवकांनी मुंबईचे पोस्टमन म्हणून काम करण्याची संधी मिळवली आहे.

काही दिवसांपूर्वी पोस्टामध्ये खुली नोकरभरती सुरू करण्यात आली़ दहावी उत्तीर्ण झालेले खात्यांतर्गत कर्मचारी हे डाकसेवक म्हणून काम करायला लागले़ दहावी इयत्तेवर सेवेत दाखल झालेल्यांना पुढे पोस्टमन म्हणून संधी नव्हती़ मात्र खुल्या भरतीमध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला वाहन परवाना आणि एमएस-सीआयटीची पात्रता लावून कोणत्याही शहरातील उमेदवाराला चक्क पोस्टमन पदावर संधी दिली.

 दुजाभाव करणारा नियम ग्रामीण डाकसेवकांना भेडसावू लागला़ आॅल इंडिया पोस्टमन एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण चाळके यांच्या नेतृत्वाखाली सेके्रटरी राजेश सागर आणि ग्रामीण डाकसेवक राजकुमार आतकरे यांनी मुंबईचे संचालक व्यवहारे आणि दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला़ ‘खुल्या भरतीत उमेदवारांना लावलेल्या अटी रद्द करा आणि खात्यांतर्गत जुन्या पद्धतीच्या अटी लागू करा’ हा एकच मुद्दा घेऊन पाठपुरावा चालवला़ खुल्या भरतीमुळे खात्यांतर्गत ग्रामीण डाकसेवकांवर अन्याय व्हायचा आणि त्यांना पुढे संधी मिळत नव्हती.

अन् मार्चमधील परीक्षा पुढे ढकलली- खुल्या भरतीत लावलेल्या नियम-अटी रद्द झाल्या़ तत्पूर्वी मार्चमध्ये पोस्टमनसाठी होणाºया परीक्षार्थींपैकी जे पात्र ठरले होते त्यांना थांबवत ही परीक्षाच पुढे ढकलायला लावली़ आता ही भरती खात्यांतर्गत होणार असल्याचे ग्रामीण डाकसेवक संघटनेकडून सांगितले जाते़ तसेच आता ग्रामीण डाकसेवकही संगणक प्रशिक्षण घेऊन पोस्टमन होऊ शकतात़ 

मुंबईचे पोस्टमन झालेले ग्रामीण डाकसेवक- पंढरपूर विभाग - पांडुरंग सुरेश काळे (बिटरगाव), संजय देवकुळे (नातेपुते)सोलापूर विभाग - आरशिया जहागीरदार (सय्यद वरवडे), मुल्ला (होनमुर्गी), रत्नाबाई अचलेरे (शिंगडगाव).

ग्रामीण डाकसेवकावर अन्याय करणारा नियम पोस्टमनसाठी आणला गेला होता़ दहा-दहा वर्षे सेवा करणाºया सेवकाला संधीच नव्हती़. खुल्या भरतीतील अटी रद्द करायला भाग पाडल्याने राज्यभरातील १५२ ग्रामीण डाकसेवक आता मुंबईत पोस्टमन म्हणून दाखल झाले आहेत़ तसेच सोलापूर आणि पंढरपूर विभागातून पाच जणांनाही त्यामध्ये संधी मिळाली आहे़ - राजकुमार आतकरे सचिव, ग्रामीण डाकसेवक 

टॅग्स :SolapurसोलापूरPost Officeपोस्ट ऑफिसMumbaiमुंबई