शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

दोघांचंही राजकारण संपलंय; उद्धव-राज एकत्र आले तरी युतीला धोका नाही; आठवलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:41 IST

राज्यमंत्री आठवले हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

Maharashtra Politics ( Marathi News ) : सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कधीही एकत्र येणार नाहीत. दोघे एकत्र आले तरी महायुतीला फटका बसणार नाही. कारण दोघांचेही राजकारण संपलेले आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

राज्यमंत्री आठवले हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, के. डी कांबळे, सुशील सरवदे आदी उपस्थित होते.

नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का

आठवले म्हणाले, येत्या जिल्हा परिषद, मनपा निवडणुकांमध्ये आरपीआयला जागा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. एक एमएलसी तसेच एका मंत्रिपदाची मागणी त्यांच्याकडे केली होती. कार्यकर्त्यांसाठी ही मागणी केली होती. आता महामंडळावर माझे कार्यकर्ते दिसतील. ऑक्टोबरदरम्यान निवडणुका होतील. यात आरपीआयला चांगल्या जागा सुटतील, तशी चर्चा झाली आहे.

याची घ्या काळजी

लव्ह जिहादचा कायदा करताना यात सापडलेल्या मुली धर्मातर करणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कायदा तशाच पद्धतीचा बनवावा, अशी सूचना आठवले यांनी केली आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जातपडताळणी समितीला अध्यक्षच नाहीत. यामुळे अनेक दाखले रखडले आहेत. यावर काय उपाययोजना करणार आहात, अशी विचारणा पत्रकारांनी यावेळी केली. आठवले यांनी सांगितले. समाजकल्याण विभागाची बैठक घेतो. विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत, हे जाणून घेतो. दाखले लवकर वितरीत करण्याची सूचना संबंधितांना करतो.

इतक्या गाड्यांचे काय करतील

दोन मर्सिडीज गाड्या भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्रिपद मिळायचे, अशी टीका नीलम गोन्हे यांनी केली. यावर बोलताना आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे काही गाड्यांची कमतरता आहे का आणि इतक्या गाड्यांचे ते काय करतील. गोन्हे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले, टीकेला उत्तर देताना असंसदीय शब्दांचा वापर करू नये. महिलांना अपमानकारक वाटेल, असे बोलू नये.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे