राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे झाली सर्वसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:18+5:302021-02-05T06:45:18+5:30

उत्तर सोलापूर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी निश्चित करण्यात आले. तहसीलदार जयवंत पाटील, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, ...

Politically sensitive villages became commonplace | राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे झाली सर्वसाधारण

राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे झाली सर्वसाधारण

उत्तर सोलापूर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी निश्चित करण्यात आले. तहसीलदार जयवंत पाटील, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, नायब तहसीलदार जयंत जुगदार, सभापती रजनी भडकुंबे, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर आदींसह तालुक्यातील विविध गावांतील लोकांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. प्रथम अनुसूचित जमातीसाठी जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एक गाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी सहा गावे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने निश्चित करण्यात आली.

इतर मागास (नामाप्र) साठी १९९५, २०२० व २००५ मध्ये एकवेळ आरक्षण झालेल्यांपैकी १० गावे निश्चित करण्यात आली.

----

- अनुसूचित जमाती- कारंबा

- अनुसूचित जाती- वांगी, शिवणी, खेड (महिला), पडसाळी, कवठे, रानमसले

- इतर मागास- हगलूर, नंदूर- समशापूर, साखरेवाडी, कोंडी, डोणगाव (महिला), पाकणी, गावडी दारफळ, तळेहिप्परगा, तेलगाव, भागाईवाडी

- सर्वसाधारण महिला- होनसळ, बेलाटी, भोगाव, सेवालालनगर, एकरुख-तरटगाव, मार्डी, अकोलेकाटी, नान्नज, कौठाळी व पाथरी,

- सर्वसाधारण- बीबी दारफळ, वडाळा, नरोटेवाडी, हिरज, तिर्हे, गुळवंची, बाणेगाव, राळेरास व कळमण.

---

वडाळ्यात ३१ वर्षांनंतर साठे...

वडाळ्यात १७ मे १९६५ रोजी बळीरामकाका साठे हे सरपंच झाले होते. काकांनी २४ वर्षे सहा महिने सरपंच म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर जिल्हा परिषदेत सक्रिय झाले. आता वडाळा सरपंचपदासाठी सर्वसाधारण झाल्याने काकांचे पुत्र जितेंद्र साठे सरपंच होण्याची शक्यता आहे.

- तळेहिप्परग्यात सरपंचपद आरक्षित झाल्याने पॅनलप्रमुख कुमार भिंगारे, तसेच बीबी दारफळमध्ये पॅनल प्रमुख हरल्याने सरपंचपद कार्यकर्त्यांना मिळणार आहे.

- खेड अनुसूचित जातीसाठी, तर वांगी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. मात्र, खेडमध्ये अनुसूचित जातीचा सदस्य, तर वांगीत अनुसूचित जातीची महिला नाही.

- नान्नज, अकोलेकाटी, कौठाळी सर्वसाधारण महिलेसाठी, तर हिरज, तिऱ्हे, कळमण, बाणेगाव ही गावे सर्वसाधारण झाली.

- पडसाळी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने धर्मा रोकडे यांची निवड होणार आहे.

----

Web Title: Politically sensitive villages became commonplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.