शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

जीवनसौंदर्य शब्दातून मांडण्याचे कवीला वेड : अरूणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:00 IST

सोलापुरात स्व. दत्ता हलसगीकर पुरस्काराने अरूणा ढेरे यांचा केला सन्मान

ठळक मुद्दे- अरूणातार्इंच्या लेखनात खुप प्रांजळपणा आहे - पायगुडे- लोकसाहित्याचं अण्णांनी लावलेलं झाड आता वटवृक्ष झालं आहे - पायगुडे- साहित्यविश्वातील कोणतेच लेखन अरुणातार्इंनी सोडलं नाही - पवार

सोलापूर : कवित्वाचं देणं हे फार थोड्या लोकांना मिळतं. कवीला जीवनाचे सौंदर्य शब्दांतून मांडण्याचे वेड असत़े, पण हे वेड दैवी असते. तो आपली ताकद कवितेतून दाखवत असतो़, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर व प्रिसिजन फाउंडेशनच्यावतीने  किर्लोस्कर सभागृह येथे स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुणे मसापचे कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार यांच्या हस्ते डॉ. अरुणा ढेरे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ या पुरस्काराला उत्तर देताना डॉ. ढेरे बोलत होत्या.

पुढे बोलताना ढेरे म्हणाल्या की, कविता दोन शब्दांच्या मधल्या अंतरामधून जे काही दाखविते ती खरी कविता असते़ जसे रेख आणि रंगामधून काढलेल्या चित्रातून आशय दिसतो किंवा नर्तिकेच्या नृत्याद्वारे जे चित्र आपल्यासमोर उभे राहते तसंच कवितेमधून आलेल्या आशयाचं आपण अर्थ समजून घेणे गरजेचे आहे़ उत्तम गीत हे उत्तम कविता असते़ पण प्रत्येक भावना शब्दांतून मांडता येतेच असे नाही़ कवितेचा फार मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे, यात लिहिण्याचे भाग्य मला मिळाले, असे मत डॉ़ अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले़ यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे, उल्हास पवार, सायली जोशी, पद्माकर कुलकर्णी, माधव पवार होते़ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पायगुडे म्हणाले, अरुणातार्इंच्या लेखनात खूप प्रांजळपणा आहे़ त्यांच्या वागण्यात साधेपणा आहे़ इतक्या उंचीवर जाऊनही ते नेहमी साधेपणाने राहतात़ असे खूप कमी लोकांना जमते, असे मत त्यांनी व्यक्त केले़  यावेळी उल्हास पवार म्हणाले, लोकसाहित्याचं अण्णांनी लावलेलं झाड आता वटवृक्ष झालं आहे. दु:खाचे स्वागत कऱ़़ असे म्हणणारे ते कवी होते. त्यांच्यातील गुण हे अरुणातार्इंक डे आहेत़ साहित्यविश्वातील कोणतेच लेखन अरुणातार्इंनी सोडलं नाही. सर्वसमावेशक अशी गुणवैशिष्ट्ये त्यांच्याकडे आहेत़़ पूर्वी आम्ही दिवाळी अंकासाठी वाट पाहत असे, पण आता ती ओढ लोेकांमध्ये दिसत नाही़ ही आवड सर्वांमध्ये निर्माण केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAruna Dhereअरुणा ढेरे