शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जीवनसौंदर्य शब्दातून मांडण्याचे कवीला वेड : अरूणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:00 IST

सोलापुरात स्व. दत्ता हलसगीकर पुरस्काराने अरूणा ढेरे यांचा केला सन्मान

ठळक मुद्दे- अरूणातार्इंच्या लेखनात खुप प्रांजळपणा आहे - पायगुडे- लोकसाहित्याचं अण्णांनी लावलेलं झाड आता वटवृक्ष झालं आहे - पायगुडे- साहित्यविश्वातील कोणतेच लेखन अरुणातार्इंनी सोडलं नाही - पवार

सोलापूर : कवित्वाचं देणं हे फार थोड्या लोकांना मिळतं. कवीला जीवनाचे सौंदर्य शब्दांतून मांडण्याचे वेड असत़े, पण हे वेड दैवी असते. तो आपली ताकद कवितेतून दाखवत असतो़, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर व प्रिसिजन फाउंडेशनच्यावतीने  किर्लोस्कर सभागृह येथे स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुणे मसापचे कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार यांच्या हस्ते डॉ. अरुणा ढेरे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ या पुरस्काराला उत्तर देताना डॉ. ढेरे बोलत होत्या.

पुढे बोलताना ढेरे म्हणाल्या की, कविता दोन शब्दांच्या मधल्या अंतरामधून जे काही दाखविते ती खरी कविता असते़ जसे रेख आणि रंगामधून काढलेल्या चित्रातून आशय दिसतो किंवा नर्तिकेच्या नृत्याद्वारे जे चित्र आपल्यासमोर उभे राहते तसंच कवितेमधून आलेल्या आशयाचं आपण अर्थ समजून घेणे गरजेचे आहे़ उत्तम गीत हे उत्तम कविता असते़ पण प्रत्येक भावना शब्दांतून मांडता येतेच असे नाही़ कवितेचा फार मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे, यात लिहिण्याचे भाग्य मला मिळाले, असे मत डॉ़ अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले़ यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे, उल्हास पवार, सायली जोशी, पद्माकर कुलकर्णी, माधव पवार होते़ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पायगुडे म्हणाले, अरुणातार्इंच्या लेखनात खूप प्रांजळपणा आहे़ त्यांच्या वागण्यात साधेपणा आहे़ इतक्या उंचीवर जाऊनही ते नेहमी साधेपणाने राहतात़ असे खूप कमी लोकांना जमते, असे मत त्यांनी व्यक्त केले़  यावेळी उल्हास पवार म्हणाले, लोकसाहित्याचं अण्णांनी लावलेलं झाड आता वटवृक्ष झालं आहे. दु:खाचे स्वागत कऱ़़ असे म्हणणारे ते कवी होते. त्यांच्यातील गुण हे अरुणातार्इंक डे आहेत़ साहित्यविश्वातील कोणतेच लेखन अरुणातार्इंनी सोडलं नाही. सर्वसमावेशक अशी गुणवैशिष्ट्ये त्यांच्याकडे आहेत़़ पूर्वी आम्ही दिवाळी अंकासाठी वाट पाहत असे, पण आता ती ओढ लोेकांमध्ये दिसत नाही़ ही आवड सर्वांमध्ये निर्माण केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAruna Dhereअरुणा ढेरे