शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

खिलाडू वृत्तीने लढलो; पण प्रचारात गांभीर्य नव्हते याचे दु:ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 11:59 IST

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ; चुरस वाढल्याने अटीतटीची झाली लढत

ठळक मुद्देशहराशी संलग्न तीनपैकी दोन मतदारसंघाच्या निकालाचा सर्वांनाच अंदाज आला आहेआता शहर मध्य मतदारसंघातील काही भागातून वेगवेगळे कौल येत आहेतकाँग्रेस आणि शिवसेना आघाडीवर आहे, परंतु एमआयएम आणि महेश कोठे यांना अखेरच्या टप्प्यात चांगली साथ

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. सर्वच उमेदवार खिलाडू वृत्तीने लढले; पण प्रचारात गांभीर्य नव्हते. रोजगार, उद्योग या विषयांवर पुरेशी चर्चा अपेक्षित होती, असे मत या मतदारसंघातील प्रमुख पाच उमेदवारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

एकंदरीत या निवडणुकीत काही लोकांमध्ये गांभीर्य दिसले नाही. कारण प्रचारात ठोस मुद्दे असायला हवे असतात. निवडणूक लढविण्यापूर्वी मतदारसंघाची बांधणी करावी लागते. सतत लोकांशी संपर्क ठेवावा लागतो. केवळ शहर मध्य नव्हे तर राज्यातील अनेक मतदारसंघात लोक इकडून तिकडे उड्या मारताना दिसले. निवडणूक म्हणजे चेष्टा-मस्करीचा विषय झाला. मतदारांकडून मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्याकडून बळ मिळाले म्हणायला हरकत नाही. जनतेने मला माझ्या कामाची जाणीव करून दिली. - प्रणिती शिंदे, उमेदवार, काँग्रेस 

लोकांना विकास हवाय, हे पुन्हा दिसले. शिवसेना-भाजपबद्दल लोकांना विश्वास वाटला. माझ्या प्रचारात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून साथ दिली. नव्याने काही लोक जोडले गेले. प्रचारात रोजगार, उद्योग, शिक्षण असे मुद्दे आले. आमची मुले शिकली आहेत. त्यांना रोजगारासाठी पुण्याला, मुंबईला जावं लागतंय. इथे काहीतरी व्हायला हवे, असे सांगणारे अनेक लोक भेटले. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही निवडणूक खूप वेगळी ठरली. - दिलीप माने, उमेदवार, शिवसेना

अपक्ष म्हणून लढल्यामुळे यंत्रणा उभारताना त्रास झाला. पक्षाच्या उमेदवाराला यंत्रणा सहज मिळते. मला नव्याने बुथबांधणी करावी लागली. काही भागात मी पोहोचू शकलो नाही. पण माझा पूर्व भाग माझ्यासोबत राहिला. सोलापुरात आयटी पार्क करणार, शहराला दररोज पाणीपुरवठा करणार, विडी उद्योगात कार्यरत असलेल्या महिलांना पर्यायी रोजगार मिळवून देणार या तीन मुद्यांवर मी प्रचार केला. रोजगाराचा मुद्दा नंतर सर्वच लोकांच्या प्रचारात दिसला. मला लोकांची सहानुभूती दिसली. - महेश कोठे, अपक्ष उमेदवार 

या मतदार संघात मी पहिल्यांदा लढलो. लोकांनी मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. सर्व समाजातील लोक आम्हाला भेटले. सर्वांना जाणून घेता आले. त्यामुळे निवडणुकीनंतर मला एक आत्मविश्वास मिळाला. ही निवडणूक सर्वच उमेदवारांनी खिलाडू वृत्तीने लढली. कुणीही एकमेकांवर आक्षेपार्ह टीका केली नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेतली. याच पद्धतीने निवडणुका व्हायला हव्यात. - फारुक शाब्दीउमेदवार, एमआयएम. 

ही माझी ११ वी निवडणूक आहे. १९७८, त्यानंतर १९९५ आणि २००४ साली मी निवडून आलो. निवडणुकीचा प्रचार हा कार्यक्रमावर, जाहीरनाम्यावर आणि लोकांच्या प्रश्नांवर व्हायला हवा; पण या निवडणुकीत धर्माची चर्चा झाली. कामाऐवजी जातीची चर्चा झाली, याची खंत आहे. शहर मध्य मतदारसंघात आता हद्दवाढ भागही जोडला गेला आहे. त्यात रस्ते, पाणी आणि ड्रेनेजचे प्रश्न आहेत. यावर फार चर्चा झाली नाही. या मुद्द्यांऐवजी नोटांवर इलेक्शन झाले. हे लोकशाहीला घातक आहे. - नरसय्या आडम उमेदवार, माकप

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्य