शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

खिलाडू वृत्तीने लढलो; पण प्रचारात गांभीर्य नव्हते याचे दु:ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 11:59 IST

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ; चुरस वाढल्याने अटीतटीची झाली लढत

ठळक मुद्देशहराशी संलग्न तीनपैकी दोन मतदारसंघाच्या निकालाचा सर्वांनाच अंदाज आला आहेआता शहर मध्य मतदारसंघातील काही भागातून वेगवेगळे कौल येत आहेतकाँग्रेस आणि शिवसेना आघाडीवर आहे, परंतु एमआयएम आणि महेश कोठे यांना अखेरच्या टप्प्यात चांगली साथ

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. सर्वच उमेदवार खिलाडू वृत्तीने लढले; पण प्रचारात गांभीर्य नव्हते. रोजगार, उद्योग या विषयांवर पुरेशी चर्चा अपेक्षित होती, असे मत या मतदारसंघातील प्रमुख पाच उमेदवारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

एकंदरीत या निवडणुकीत काही लोकांमध्ये गांभीर्य दिसले नाही. कारण प्रचारात ठोस मुद्दे असायला हवे असतात. निवडणूक लढविण्यापूर्वी मतदारसंघाची बांधणी करावी लागते. सतत लोकांशी संपर्क ठेवावा लागतो. केवळ शहर मध्य नव्हे तर राज्यातील अनेक मतदारसंघात लोक इकडून तिकडे उड्या मारताना दिसले. निवडणूक म्हणजे चेष्टा-मस्करीचा विषय झाला. मतदारांकडून मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्याकडून बळ मिळाले म्हणायला हरकत नाही. जनतेने मला माझ्या कामाची जाणीव करून दिली. - प्रणिती शिंदे, उमेदवार, काँग्रेस 

लोकांना विकास हवाय, हे पुन्हा दिसले. शिवसेना-भाजपबद्दल लोकांना विश्वास वाटला. माझ्या प्रचारात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून साथ दिली. नव्याने काही लोक जोडले गेले. प्रचारात रोजगार, उद्योग, शिक्षण असे मुद्दे आले. आमची मुले शिकली आहेत. त्यांना रोजगारासाठी पुण्याला, मुंबईला जावं लागतंय. इथे काहीतरी व्हायला हवे, असे सांगणारे अनेक लोक भेटले. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही निवडणूक खूप वेगळी ठरली. - दिलीप माने, उमेदवार, शिवसेना

अपक्ष म्हणून लढल्यामुळे यंत्रणा उभारताना त्रास झाला. पक्षाच्या उमेदवाराला यंत्रणा सहज मिळते. मला नव्याने बुथबांधणी करावी लागली. काही भागात मी पोहोचू शकलो नाही. पण माझा पूर्व भाग माझ्यासोबत राहिला. सोलापुरात आयटी पार्क करणार, शहराला दररोज पाणीपुरवठा करणार, विडी उद्योगात कार्यरत असलेल्या महिलांना पर्यायी रोजगार मिळवून देणार या तीन मुद्यांवर मी प्रचार केला. रोजगाराचा मुद्दा नंतर सर्वच लोकांच्या प्रचारात दिसला. मला लोकांची सहानुभूती दिसली. - महेश कोठे, अपक्ष उमेदवार 

या मतदार संघात मी पहिल्यांदा लढलो. लोकांनी मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. सर्व समाजातील लोक आम्हाला भेटले. सर्वांना जाणून घेता आले. त्यामुळे निवडणुकीनंतर मला एक आत्मविश्वास मिळाला. ही निवडणूक सर्वच उमेदवारांनी खिलाडू वृत्तीने लढली. कुणीही एकमेकांवर आक्षेपार्ह टीका केली नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेतली. याच पद्धतीने निवडणुका व्हायला हव्यात. - फारुक शाब्दीउमेदवार, एमआयएम. 

ही माझी ११ वी निवडणूक आहे. १९७८, त्यानंतर १९९५ आणि २००४ साली मी निवडून आलो. निवडणुकीचा प्रचार हा कार्यक्रमावर, जाहीरनाम्यावर आणि लोकांच्या प्रश्नांवर व्हायला हवा; पण या निवडणुकीत धर्माची चर्चा झाली. कामाऐवजी जातीची चर्चा झाली, याची खंत आहे. शहर मध्य मतदारसंघात आता हद्दवाढ भागही जोडला गेला आहे. त्यात रस्ते, पाणी आणि ड्रेनेजचे प्रश्न आहेत. यावर फार चर्चा झाली नाही. या मुद्द्यांऐवजी नोटांवर इलेक्शन झाले. हे लोकशाहीला घातक आहे. - नरसय्या आडम उमेदवार, माकप

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्य